Posts

32-रायगड लोकसभा मतदार संघात शेवटच्या दिवशी 19उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी एकूण 28 उमेदवारांचे 40 नामनिर्देशनपत्र

  रायगड,दि.19(जिमाका) :-  32 रायगड लोकसभा मतदार संघांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी (दि.19 एप्रिल) 19 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदार संघात एकूण 28 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली. 32-रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. प्राप्त सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया दिनांक 20 एप्रिल रोजी होणार आहे. माघार घेण्याची दिनांक 22 एप्रिल 2024  आहे. आज अखेरच्या दिवसापर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या सर्व उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे .. 1) श्री.अनंत गिते, (अपक्ष) (1 अर्ज ), 2)श्री.अनंत बाळोजी गिते, (अपक्ष)) (1 अर्ज ), 3) श्री. अनंत गंगाराम गिते, (1+ 3 अर्ज) (शिवसेना)उद्धव बाळासाहेब ठाकरे), 4) श्री. नितीन जगन्नाथ मयेकर, अपक्ष (1), 5)श्री. आस्वाद जयदास पाटील, अपक्ष (1). 6)श्री. मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष)(1अर्ज), 7)श्री.प्रकाश बाळकृष्ण चव्हाण,3 अर्ज,(भारतीय जवान किसान पार्टी) 8) श्री.पांडुरंगदामोदर चौले,1

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यात विशेष मोहिम मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्ज दाखले करण्याचे आवाहन

  रायगड (जिमाका) दि.15:-  सामाजिक न्याय व विशेष  सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यात दि.10 ते दि. 25 एप्रिल 2024 या कालावधीत समता पंधरवडयात जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे.  इ.11 वी व इ. 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या, तसेच अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत असलेल्या व पुढील उच्च शिक्षणाकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळावे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये, याकरिता विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.      ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरीत अर्ज सादर करावेत.  ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत, परंतु अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. अशा विद्यार्थ्यांनी दि.22  ते 26 एप्रिल 2024 या कालावधीत समिती कार्यालयात हजर राहून त्रुटींची पूर्तता करावी.  वेळेत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा. तसेच वेळेत जात व

निवडणूक खर्च निरीक्षक श्री.त्रिपाठी यांची जिल्हा माध्यम कक्षास भेट

Image
  रायगड(जिमाका),दि.13:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024,  32 रायगड लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक धिरेंद्रमणी त्रिपाठी यांनी जिल्हा माध्यम कक्षात भेट देऊन जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला.           जिल्हा माध्यम कक्षातून जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संबंधी प्रसार माध्यम व वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात आहे. यासाठी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आले असून उमेदवारांच्या प्रचार जाहिराती याचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही केली जाते. यासह निवडणुकीची मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीमध्ये या पक्षाचा सहभाग आहे आधी बाबतची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी यावेळी दिली.               श्री.त्रिपाठी यांनी माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल, समाज माध्यम द्वारे प्रसिद्धी, तसेच विविध दैनंदिन अहवाल बाबत पाहणी त्यांनी केली. निवडणूक निरीक्षक श्री. त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी दिले. तसेच पेडन्यूज बाबत अधिक दक्ष रहावे

अलिबाग येथे"वॉक फॉर वोट रॅली"ला जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते शुभारंभ मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचा मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी चांगला उपयोग --जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
  रायगड(जिमाका),दि.13:-  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत .  पथनाट्य, प्रभात फेरी आदी द्वारे नागरिकांमध्ये मतदानासाठी प्रेरित केले जात आहे, याचा जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी चांगला उपयोग होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले.  "वॉक फॉर वोट रॅली"चा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात  करण्यात आली. "वॉक फॉर वोट"रॅलीसाठी जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी निर्मला कुचिक, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे,अलिबाग तहसिलदार विक्रम पाटील,  अलिबाग नगरपरिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी सेविका वैशाली पाटील यांनी  लोकशाहीचा उत्सव पोवाडा सादर केला . जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून आज सकाळी आठ वाजता सुरु झालेली रॅली त्यांच्यासह जिल्हा पोलिस

मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मीडियामधील जाहिरातीचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक--निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे

    रायगड दि.12 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मीडियामध्ये प्रसिध्द करावयाची जाहिरात राज्य अथवा जिल्हास्तरावरील माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून पूर्व-प्रमाणित करणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यानी दिली.   भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस पूर्व प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नयेत, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश  सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना 1 एप्रिल रोजीच्या पत्राद्वारे दिले आहेत. कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मीडियामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य अथवा जिल्हास्तरावरील माध्यम प्रमा

आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील --जिल्हाधिकारी किशन जावळे आदिवासी वाडया, वस्ती, गावामध्ये पथनाट्य आयोजन

Image
    रायगड(जिमाका)दि.12:- आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या बोली भाषेतील पथ नाट्याद्वारे मतदार जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते सिद्धेश्वर बु.येथे  मतदार जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या जनजागृती कार्यक्रमाच्या वेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री.जावळे बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प पेण, प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या सहकार्याने आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हा पथदर्शी उपक्रम राबविला जात आहे. आदिवासी समाजाची युवक आणि प्राथमिक शिक्षक हे पथनाट्य सादर करीत आहेत. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक सिद्धेश्वर बु. येथे आयोजित या कार्यक्रमासाठी निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसिलदार उत्तम कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले, आदिवासी वाड्या वस्त्या, गावे येथील मतदानाच

वरंध घाट 30 मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

    रायगड(जिमाका)दि.9:-  रायगड जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वरील मौजे वरंध ते  रायगड जिल्हा हद्दीत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने  रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षण भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे दि.8 एप्रिल पासून ते 30 मे 2024 पर्यंत वरंध घाटातील रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसा महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग 965डीडी किमी 88/100 (राजेवाडी) ते किमी 96/700 (रायगड जिल्हा हद्द) या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम संरक्षण भिंती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्यासाठीची कामे प्रगतीत आहे.  वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून बहूतांश काम पूर्ण झालेले आहे,. परंतू साखळी क्रमांक 88/100 (मौजे वरंघ) ते 96/700 (रायगड जिल्हा हद्द) या लांबीमध्ये काम सुरु करावयाचे आहे. सदरच्या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करावयास अपुरी आहे. सदरच्या लांबीमध्ये चालू वाहतूकीमध्ये काम करताना अपघा