Posts

Showing posts from November 15, 2020

शाश्वत स्वच्छता अन् सार्वजनिक शौचालय अभियानासाठी जिल्हा परिषदेने कसली कंबर

  अलिबाग,जि.रायगड, दि.20 (जिमाका) :- जिल्ह्यात हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहण्यासाठी तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता यानुषंगाने जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन टप्पा दोनची सुरुवात झाली आहे.             याचाच एक भाग म्हणून दि. 17 ते दि.27 नोव्हेंबर 2020 या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा कु.योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता डॉ.दीप्ती पाटील यांनी दिली आहे.                या अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालयांमध्ये पाण्याची उपलब्धता करणे, सार्वजनिक शौचालय यांना वीज जोडणी देणे, सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात स्वच्छता करणे, कुटुंबस्तर शौचालय परिसरात स्वच्छता करणे व सुशोभीकरण, ग्रामपंचायत कार्यालयातील नादुरस्त शौचालयांची दुरुस्ती, वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम व प्रोत्साहन अनुदान वाटप, वैयक्तिक शौचालय वापर दुरुस्ती परिसर स्वच्छता व सुशो

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

                  अलिबाग,जि.रायगड,दि.20 (जिमाका) :   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील कुशल, अकुशल उमेदवारांसाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.   हा मेळावा दि. 24 ते दि.26   नोव्हेंबर 2020 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत फक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.   जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता   विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर या वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील आपली सर्व माहिती अद्यावत करावी.   तसेच ज्यांनी   या विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर Employment-Job Seeker (Find a Job)-

स्थानिक लोकाधिकार समितीने कौशल्य प्रशिक्षण संस्थेची उभारणी करावी- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे 'दैवत' विश्रामगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

    अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :-   स्थानिक लोकाधिकार समितीने   विविध उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम हाती घ्यावे, त्यासाठी समर्पित आणि अद्ययावत   अशी कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था स्थापन करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय विमा कर्मचारी संघटना आणि स्थानिक लोकाधिकार समिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून अलिबाग येथील वरसोली गावात न्यू इंडिया इन्शुरंस कंपनीचे “ दैवत ” नावाचे विश्रामगृह बांधण्यात आले असून आज त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते   ई-लोकार्पण करण्यात आले.   त्यावेळी ते बोलत होते. यावेळी न्यू इंडिया इन्शुरंस कंपनीचे सीएमडी अतुल सहाय, खासदार अनिल देसाई, स्थानिक लोकाधिकार समितीचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, न्यू इंडिया इन्शुरंस कंपनीच्या वाढीत स्थानिक लोकाधिकार समितीचे   योगदान खूप मोठे आहे. महाराष्ट्रीयन माणसाला विशेषत: मराठी माणसाला त्याचा हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकाधिकार समितीने जो संघर्ष केला त्यातून आज कंपनीमध्ये मराठी माणसाचा टक्का वाढलेला दिसून येत आहे.   करोना

रायगड जिल्हा परिषदेमध्ये स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांचे अभिवादन

    अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा परिषदेमध्ये स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.             यावेळी सहाय्यक लेखा अधिकारी संजीव मोरे यांनी उपस्थितांना   राष्ट्रीय एकात्मतेची "मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो/घेते की, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी मी निष्ठापूर्वक काम करीन.मी अशीही प्रतिज्ञा करतो/करते की, मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही.तसेच मी सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडण्याचा प्रयत्न ठेवीन", अशी शपथ दिली.             या कार्यक्रमास शिक्षण विभागाचे अधीक्षक गणेश गिते, सहाय्यक लेखाधिकारी समीर धर्माधिकारी, कनिष्ठ सहाय्यक प्रशांत जुईकर, संवाद तज्ञ सुरेश पाटील, दत्तात्रय नाईक, देवेंद्र भगत, आनंद जीवन आदी उपस्थित होते. 0000000

हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनचे प्रस्ताव कंपनीकडे सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत

    अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना आंबिया बहार 2020-21 मध्ये कोकणात आंबा व काजू पिकासाठी जिल्ह्याकरिता बजाज अलायन्स जनरल इन्सुरन्स कंपनी लि.पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना   विमा संरक्षण देवून नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही   शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी ही याेजना सुरू करण्यात आली आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार   शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक असून विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता 5 टक्के असा मर्यादित आहे. या योजनेंतर्गत विविध कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस नमूद कालावधीपर्यंत विमा संरक्षण दिले जाईल. आंबा फळपिकांसाठी विमा संरक्षित रक्कम रु. 1 लाख 40   हजार, विमा हप्ता दर प्रति हेक्टरी रु.7 हजार, समाविष्ट धोके अवेळी पाऊस-विमा संरक्षण कालावधी   दि.1 डिसेंबर ते दि.15 मे , कमी तापमान-दि.1 जानेवारी ते दि.15 मार्च, जास्त तापमान-दि.1 मार्च दि.15 मे,

माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे अभिवादन

Image
  अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :-   माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले. तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्ताने उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथही दिली.        यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000000