Posts

Showing posts from February 14, 2021

पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना चला विकसित करु या आपले पशुधन...!

  विशेष लेख क्र.5                                                                                   दिनांक :- 17 फेब्रुवारी 2021 सन 2020-21 या वर्षात महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राज्यात राबविण्यात येणार आहेत. ही योजना रायगड जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे. चला तर मग या योजनांचा लाभ घेऊन आपले पशुधन विकसित करु या...! 6/4/2 दुधाळ संकरीत गायी/म्हशींच्या गटाचा पुरवठा करणेः - या योजनेमध्ये पशुपालकास 6/4/2 दुधाळ संकरित गायी, म्हशी खरेदी करता येतात. 6 जनावरांच्या गट खरेदीसाठी प्रकल्प अहवालानुसार एकूण रू.3 लाख 35 हजार 184/-, 4 जनावरांच्या गटासाठी रू.1 लाख 70 हजार 125/- व 2 जनावरांच्या गटासाठी रू.85 हजार 061/- रक्कम निश्चित करण्यात आली असून या रक्कमेच्या 50 टक्के अनुदान सर्वसाधारण प्रवर्गातील लाभधारकास व 75 टक्के शासकीय अनुदान विशेष घटक प्रवर्गातील लाभधारकास अनुज्ञेय आहे. उर्वरित रक्कम लाभार्थीने स्वतः अथवा वित्तीय संस्थामार्फत कर्ज घेवून उभारावयाची आहे. लाभधारक निवडीचा प्राधान्यक्रम महिला बचतगट लाभार्थी, अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार याप्रमाण

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर “छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2021” करिता जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

    अलिबाग, जि.रायगड, दि.10 (जिमाका):- कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि. 19 फेब्रुवारी, 2021 रोजी साजरी होणारी “ छत्रपती शिवाजी महाराज जयंती ” साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुषंगाने शासनाकडून व जिल्हा प्रशासनाकडून पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत :- 1) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दि.19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि.18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12.00 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-19 चा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. 2) दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प

वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारासाठी अर्ज करावेत

  अलिबाग,जि.रायगड,दि.17 (जिमाका) : - वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या राज्यातील व्यक्ती व संस्थांना दरवर्षी महसूल   विभाग व राज्यस्तरावर विविध 5 संवर्गात “ छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन 2019 या वर्षाकरिता या पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हास्तरावरील विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांच्या कार्यालयास दि.28 फेब्रुवारी 2021 पर्यंत सादर करावेत तसेच अधिक माहितीकरिता सामाजिक वनीकरण मध्यवर्ती रोपवाटिका, अलिबाग-रेवस रोड, मु.लोणारे, पो.थळ, ता.अलिबाग येथे प्रत्यक्ष वा 02141-238474 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, रायगड-अलिबाग आप्पासाहेब निकत यांनी केले आहे.          ००००००

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2020 साठी प्रवेशिका 28 फेब्रुवारी पर्यंत स्विकारणार

  अलिबाग,जि.रायगड,दि.17 (जिमाका) : - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2020 ते 31 डिसेंबर, 2020 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले होते. यासाठी मागविण्यात येणाऱ्या प्रवेशिका स्विकारण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.                राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने   dgipr.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.   प्रवेशिका दि.15 फेब्रुवारी ऐ

“ एक पाऊल…समृद्धीकडे”

Image
  यशकथा क्र.7                                                                  दिनांक :- 17/02/2021      आमच्या आई एकविरा स्वयंसहाय्यता महिला समूहाची स्थापना दि. 02 सप्टेंबर 2013 रोजी झाली. सुरुवातीस प्रत्येकी रु.100 प्रमाणे सभासद फी गोळा करण्यास सुरुवात केली.   ती बचत अल्प व्याज दराने गटातील महिलांना स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर गट स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेमध्ये जोडला गेला. गट स्थापन झाला, बचत जमा व्हायला लागली पण पुढे काय..? हा प्रश्न आम्हाला सतावत होता...   मग तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पेणच्या तालुका व्यवस्थापक शितल माळी व श्रीमती प्रीती पाटील (प्रभाग समन्वयक-पेण ) यांच्या सहकार्याने सर्व महिलांनी मिळून पापड व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले.    व्यवसाय सुरू तर केला परंतु अनुभव हाताशी नव्हता. मग   जमेल तिथून मार्गदर्शन व अनुभवाचे बोल मिळवून व्यवसाय सुरू केला. कष्टकरी व शेतकरी वर्गातील आम्ही महिला एकत्र येऊन घरातील आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करण्यासाठी तसेच घरातील आर्थिक परिस्थितीला थोडाफार हातभार लागावा, या उद्देशाने सुरू केलेला व्यवसाय यश

प्रामाणिक प्रयत्न, आत्मविश्वास, चिकाटी अन् जिद्दीने अष्टविनायक महिला बचतगटाने मिळविले यश

Image
  यशकथा क्र.6                                                                  दिनांक :- 17/02/2021     बऱ्याचदा आर्थिक अडचणीच्यावेळी महिलांना कौटुंबिक व इतर आर्थिक गरजा भागविण्याकरिता पैशांची गरज भासते. त्यावेळी त्यांना वेळेत आर्थिक सहाय्य उपलब्ध होत नाही, अशा वेळी प्राथमिक गरजा पूर्ण करणे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे असते. मग कुठून तरी उसनवारी करून गरज भागविली जाते. पण त्याची परतफेड करतानाचे प्रयत्न कधी-कधी जीवघेणे ठरतात.   ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन स्वयंसहाय्यता समूहाची स्थापना करून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मार्ग बदलून समाजावर आधारित शाश्वत उपजिविकेची तरतूद केली. यासाठी तालुका व्यवस्थापक शितल माळी व श्रीमती प्रीती पाटील (प्रभाग समन्वयक-पेण ) यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. ही यशोगाथा आहे अष्टविनायक महिला समूहाची. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत समूहाची स्थापना झाली. RDCC-बँकेत समूहाचे खाते उघडण्यात आले होते. दरमहा प्रत्येकी 100 रु. प्रमाणे मासिक बचत गोळा करून ती बचत अल्प व्याजदराने अंतर्गत कर्ज स्वरूपात दिली जात होती. आता हा समूह महाराष्ट्र राज्य ग्रा

संघर्षमय प्रगतीची वाटचाल...

Image
         मी ज्योती दिपक पाटील, पेण तालुक्यातील हमरापूर येथे माझ्या पती व दोन लहान मुलींसह राहणारी एक सर्वसामान्य कुटुंबातील महिला. नोकरी नसल्यामुळे मिळेल ते काम करून नवऱ्याच्या कमाईवर चालणारे आमचे कुटुंब. मुलींच्या शिक्षणाचा खर्च होताच..एक मुलगी पाचवीत तर दुसरी आठवीत.   मी स्वतः गृहिणी असल्यामुळे संसाराचा गाडा जेमतेम ढकलत होतो. त्यात चांगली गोष्ट घडली की, आमच्या वाडीतील महिलांना उमेद अभियानाविषयी माहिती मिळाली आणि वाडीतील 10 महिलांनी मिळून अष्टविनायक स्वयंसहाय्यता बचतगट स्थापन केला. नियमित बैठका होऊ लागल्या, मासिक बचत करण्यासाठी पदरमोड केलेली बचत उपयोगी आली .   सर्व सुरळीत सुरू असतानाच माझ्यावर अस्मानी संकट कोसळले. माझ्या नवऱ्याचा अकस्मात मृत्यू झाला, माझ्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे घरखर्च, मुलींच्या पालनपोषणाचा, त्यांच्या शिक्षणाचा खर्चाचा? माहेरची व सासरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे हातभार कुणाचाच नाही. करायचं काय? डोकं सुन्न करणारे ते दिवस. पण त्यातूनही मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करीत होते. मग काहीतरी करण्याचा निश्चय केला...पण काहीही करायचे झाले तरी भांडवलाचा प्रश

पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी‌ आणखी जोमाने काम करुन राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत -- पालकमंत्री आदिती तटकरे “आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव” पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले वितरण शिवकर व खामगाव ग्रामपंचायतींना “जिल्हास्तरीय सुंदर गाव” पुरस्कार

Image
  वृत्त क्रमांक 151                                                            दिनांक 16 फेब्रुवारी 2021   अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका) : - रायगड जिल्हा परिषदेतर्फे आर.आर.( आबा) पाटील तालुका व जिल्हा सुंदर गाव पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा आज (दि.16 फेब्रु.रोजी) जिल्हा परिषदेच्या स्व. प्रभाकर पाटील सभागृहात संपन्न झाला. यावेळी सन-2018-19 व 2019-20 या वर्षातील जिल्हास्तरावरील पुरस्कारप्राप्त पनवेल तालुक्यातील शिवकर व म्हसळा तालुक्यातील खामगाव या ग्रामपंचायतींसह तालुकास्तरावरील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते तर आमदार बाळाराम पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, समाजकल्याण समिती सभापती दिलीप भोईर, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, ॲड.आस्वाद पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शितल पुंड यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

  अलिबाग, जि.रायगड, दि.15 (जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-- मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 8.30 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने अलिबागकडे प्रयाण.  सकाळी 10.00 वा. अलिबाग येथे आगमन व “ आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना ” सन 2018-19 व सन 2019-20 करिता स्मार्ट ग्रामपंचायतींना पारितोषिक पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : टिपणीस सभागृह, जिल्हा परिषद अलिबाग. सकाळी 11.00 वा. जि.प.अलिबाग येथून शासकीय वाहनाने मांडवा जेट्टीकडे प्रयाण. सकाळी 11.30  वा मांडवा जेट्टी येथे आगमन व बोटीने मुंबईकडे प्रयाण. 000000

राज्य परिवहन दि.15 ते दि. 25 फेब्रुवारी 2021 या कालावधीत राबविणार तिकीट तपासणी विशेष मोहीम

  अलिबाग,जि.रायगड,दि.15 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत विशेष मार्ग तपासणी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.                सध्या करोना आटोक्यात आल्याने राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक पूर्व नियोजनानुसार सुरू करण्यात आलेली आहे. गर्दीचा फायदा घेऊन काही प्रवासी रा.प.बस मधून फुकट प्रवास करताना आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. अशा फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे रा.प.महामंडळ उत्पन्नापासून वंचित राहत असून रा.प.महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.                फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी व प्रवास तिकीट घेण्यास भाग पाडण्यासाठी तसेच प्रवाशांमध्ये प्रवास तिकीट घेण्याची जागृती निर्माण करण्यासाठी विभागीय कार्यालय, पेण व रायगड विभागातील सर्व आगारांमार्फत दिनांक 15   ते दि.25 फेब्रुवारी 2021 या कालावधीत तिकीट तपासणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यामुळे फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अटकाव करून त्यांच्यात तिकीट काढण्याची प्रवृत्ती तयार हाेईल व   रा.प.महामंडळाचे सार्थ उत्पन्न रा.प.महामंडळास मिळेल, अशी अपेक्षा आहे.         तरी

कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी जिल्ह्यातील विविध भागांचा केला दौरा विविध कृषी योजनांचा घेतला आढावा अन् लाभार्थी शेतकऱ्यांशी केली चर्चा

  अलिबाग,जि.रायगड,दि.15 (जिमाका):- कृषी विद्यान के़ंद्र किल्ला ता.रोहा येथे (दि.13 फेब्रुवारी) रोजी कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या शुभहस्ते "विकेल ते पिकेल" अंतर्गत विवेकानंद रिसर्च इन्स्टिट्यूट, रोहा व आत्मा, रायगड यांच्या संयुक्त निधीमधून भाजीपाला विक्रीसाठी विक्री किटचे   वाटप करण्यात आले.       यावेळी विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग- ठाणे श्री.लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम.उज्वला बाणखेले, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर, उपविभागीय कृषी अधिकारी,माणगाव सतिश बोराडे, उपप्रकल्प संचालक आत्मा सिताराम कोलते, व्ही.आर.टी.आय संस्थेचे सुशील रुळेकर, तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव, मंडळ कृषी अधिकारी महादेव करे, अमोल सुतार, कृषी सहायक कु.उबाळे, श्रीम.दोरूगडे, शेतकरी   लिंबाजी थिटे, नारायण जाधव, अशोक जाधव उपस्थित होते.        मौजे.कुडली ता.रोहा   येथे (दि.13 फेब्रुवारी) रोजी कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी "एकात्मिक फलोत्पादन अभियान" अंतर्गत मोहन राव यांच्या शेतावर सामूहिक शेततलाव पाहणी केली. यावेळी या गावामधील एकूण 8 सामूहिक शेततलावांबाबतची माहिती शेतकरी लाभार्

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी घेतली कोविशिल्ड लस जिल्हा परिषद यंत्रणेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या “कोविशिल्ड” लसीकरण मोहिमेस प्रारंभ

    अलिबाग, जि.रायगड, दि.15 (जिमाका) :- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नुकतीच येथील जिल्हा रूग्णालयातील विशेष लसीकरण कक्षात   “ कोविशिल्ड ” लस घेतली.   अशा प्रकारे   जिल्हा परिषद यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या “ कोविशिल्ड ” लसीकरणास प्रारंभ झाला.             यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ.ब्यंकट आर्ले, सहाय्यक जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ.खुरकुटे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ,प्रमोद गवई, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ,गजानन गुंजकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू तांभाळे, डॉ.दिपाली राजपूत, डॉ.अमोल खरात, अधिसेविका जयश्री मोरे, सहाय्यक अधीक्षक सिद्धार्थ चौरे, सार्वजनिक आरोग्य सेविका उषा वावरे, अधिपरिचारिका नम्रता नागले व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. ००००००

क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे अभिवादन

Image
  अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :- क्रांतिकारी संत सेवालाल महाराज   यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अभिवादन केले.     यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार सतीश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000000

जिल्हयातील दिव्यांग बांधवांनी रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील

    अलिबाग,जि.रायगड,दि.15 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,मुंबई यांच्यामार्फत राज्यातील दिव्यांग व्यक्तींना रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण घेण्यासाठी   http://forms.gle/2sf7Rtd5ByVn2GVx6   या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी करण्याची अखेरची तारीख 28 फेब्रुवारी 2021 आहे.               तरी जिल्हयातील दिव्यांग बांधवांनी या सूवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे. ००००००

जिल्ह्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आदेश जारी

            अलिबाग,जि.रायगड,दि.15(जिमाका):- सार्वजनिक आरोग्य विभागाकडील अधिसूचनेद्वारे साथरोग अधिनियम 1897 मधील खंड 2, 3 व 4 ची अंमलबजावणी राज्यात अधिसूचनेच्या प्रसिध्दी दिनांकापासून सुरु करण्यात आलेली आहे.             जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग (World Pandemic) घोषित केला असून सार्वजनिक आरोग्य विभागाकडील अधिसूचनेद्वारे करोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 प्रसिध्द केले आहेत.                   त्यानुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील परिपत्रकान्वये राज्यातील सर्व अकृषी   विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि.15 फेब्रुवारी 2021 पासून सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. तसेच यापूर्वीच जिल्ह्यात इ.9 वी ते 12 वी आणि इ. 5 वी ते इयत्ता 8 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.             आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 व 30 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 मधील नियम 10 अन्वये प्राप्त अधिकारानुस