Posts

Showing posts from September 14, 2025

कलोते-विनेगाव व तासगाव आदिवाडी येथे जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्याहस्ते आदि कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ

Image
  रायगड(जिमाका),दि.18:- :आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारने 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन हा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 113 गावांमध्ये हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रमाला सुरुवात झाली असून रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात आज विकासाची नवी पहाट उगवली आहे.  या आदि कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ (दि.17 सप्टेंबर रोजी) खालापूर तालुक्यातील कलोते-विनेगाव कातळाची वाडी तसेच माणगाव तालुक्यातील तासगाव आदिवासी वाडी येथे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, उपविभागीय अधिकारी माणगाव संदीपान सानप, सानप, तहसीलदार श्री.काळे, गटविकास अधिकारी श्रीम. शुभदा पाटील, खालापुर तालुक्याचे तहसीलदार. अभय चव्हाण, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच ...

महाविस्तार अॅपचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा

  रायगड-अलिबाग,दि.18(जिमाका):-  शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी एक नवीन अॅप सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र असे या अॅप विषयी वर्णन केले जाते. आपल्या शेतकरी बांधवांना आता या एका अॅपमध्येच शेती विषयक योजनाविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान विषयक माहिती, पीक सल्ला पिकासाठी लागणारी खताची मात्रा, कीड व रोगाविषयी माहिती तसेच तुम्ही पिकविलेल्या मालाचा बाजारभावही बघता येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी दिली आहे.     अगदी एका क्लिकवर शेतीसाठी लागणारी यंत्र अवजारे भाडेतत्त्वावर मिळविण्याकरिता त्यांच्या गावाच्या जवळपास असणाऱ्या अवजारे बँकांची माहिती देखील या अॅपवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व महाडीबीटीवर असणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती अर्थात त्यातील विविध घटकाकरिता अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे या सर्वांची माहिती या अॅपमध्ये समाविष्ट आहे. ऑनलाईन शेती शाळा नवनवीन तंत्रज्ञानाचे व्हिडिओ देखील या अॅपच्या माध्यमातून शेतकरी बंधू ब...

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ संपन्न

Image
    रायगड-अलिबाग,दि.17(जिमाका):- गावांचा शाश्वत विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची घोषणा करण्यात आली असून जिल्ह्यात हे अभियान दि.17 सप्टेंबर ते दि.31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.  या अभियानाचा शुभारंभ पळस्पे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या ग्रामसभेस उपस्थित राहून ग्रामस्थांसोबत संवाद साधून महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.   यावेळी मुख्य कार्यकारी नेहा भोसले, गटविकास अधिकारी पनवेल समीर वाठारकर यांच्यासह मंडळ अधिकारी, ग्रामसेवक तसेच महिला बचतगटाच्या महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.     यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान आजपासून संपूर्ण राज्यात सुरु होत आहे. मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व सर्व ग्रामस्थांनी मिळून यशस्वी प्रयत्न करावेत व सर्वोत्तम कामगिरी करावी. या अभियानांतर्गत राज्य श...

खोपोली येथे विशेष वित्तीय समावेशन शिबिर संपन्न रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती

   रायगड (जिमाका), दि.14 :- खोपोली येथे (दि.12 सप्टेंबर) रोजी विशेष वित्तीय समावेशन शिबिर कार्यक्रम संपन्न झाले. या शिबिरांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी निर्देशक  नीरज निगम, प्रादेशिक निर्देशक (मुंबई) सुमन रे, बँक ऑफ महाराष्ट्र चे मुख्य  महाप्रबंधक दिनकर संकपाळ, बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक सुनील शर्मा, युनियन बँक ऑफ इंडियाचे  महाप्रबंधक दिलीप मिश्रा, बँक ऑफ बडोदा बँकेचे  महाप्रबंधक  सुनील कुमार शर्मा, सेंट्रल  बँक ऑफ इंडिया चे रिजनल मॅनेजर विभोर अग्रवाल, बँक ऑफ इंडिया च्या रायगड विभाग प्रमुख श्रीमती दीपन्विता सहानी, स्टेट बँक ऑफ इंडिया चे उप महाप्रबंधक  दया शंकर  यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या शिबिरामध्ये खोपोली आणि परिसरातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला बचतगट, लघुउद्योग प्रतिनिधी आदींना खाते उघडणी, पुनःकेवायसी (Re-KYC) प्रक्रिया, पीएम जनधन योजना, सामाजिक सुरक्षा विमा योजना, मुद्रा कर्ज योजना, डिजिटल व्यवहार, तसेच डिजिटल फ्रॉड विषयी मार्गदर्शन तसेच विविध बँकिंग सुविधा उपलब्ध  करून देण्यात आल्या. प्रमुख पाहुणे नीरज...

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण 9 हजार 650 प्रकरणे निकाली 60 कोटी 42 लाख 83 हजार 637 रुपयाची तडजोड रक्कम वसूल

    रायगड,(जिमाका)दि.14 :- दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने (दि.13 सप्टेंबर) रोजी जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते. लोकन्यायालयाचे उदघाटन उच्च न्यायालयाचे न्यायामुर्ती रियाज इ. छागला यांच्याहस्ते मा.उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मिलींद म. साठे यांच्या उपस्थिीतीत दुकश्राव्य माध्यमाद्वारे करण्यात आले.  लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण 9 हजार 650 प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी दिली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकराणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  राजेंद्र  सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्य...