Posts

शहीद दिनानिमित्त मेरा युवा भारत,युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने पदयात्रा संपन्न

  रायगड-अलिबाग दि.25 (जिमाका) :-    भारतात दरवर्षी 23 मार्च रोजी शहीद दिन साजरा केला जातो 1931 मध्ये याच दिवशी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या तीन थोर क्रांतिकारकांना लाहोर जेलमध्ये ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती त्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी दिलेल्या त्याबद्दल हा दिवस साजरा केला जातो. तरुणांमध्ये देश प्रेमाची भावना जागृत करण्याकरिता तसेच क्रांतिकारकांचे बलिदान स्मरणात ठेवणे आणि त्यांच्या त्यागाला अभिवादन करणे याकरिता मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार, रायगड अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या सहकार्याने व अमित पुंडे जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत रायगड अलिबाग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पदयात्रेचे आयोजन अलिबाग मध्ये केले होते.  यावेळी भारत माता की, जय, शहीद जवान,अमर रहे, वंदे मातरम, या घोषणांचा  जयघोष करण्यात आला. पदयात्रेत स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तथा स्वयंसिद...

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम संपन्न

रायगड-अलिबाग दि.25 (जिमाका) :-    जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने  जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अलिबाग समुद्रकिनारा येथे आयोजित मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमादरम्यान क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते क्षयरोग निर्मूलनासाठी योगदान देणाऱ्या ‘निक्षय मित्र’ यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हयात विविध ठिकाणी टी बी डे साजरा करण्यात आला व त्यानिमित्ताने क्षयरुग्णांना पोषण आहार किट (फूड बास्केट) देखील वितरित करण्यात आले. कार्यक्रमास उपाध्यक्ष मधुकर पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री संजना काळे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, सभापती तथा गटनेते वैकुंठ पाटील, नारायण डामसे, रसिका केणी, जि. प. सदस्या मानसी दळवी, जि. प. सदस्य अमित नाईक, जनार्दन भस्मा, प्रभाकर म्हात्रे, संतोष बैलमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प...

होय,आपण क्षयरोग संपवू शकतो-पनवेल मनपाचा निर्धार ; टी.बी.मुक्त भारत अभियान अंतर्गत 100 दिवसीय मोहिमेची दमदार सुरुवात

    रायगड-अलिबाग दि.25 (जिमाका) :-   पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत ‘टी.बी. मुक्त भारत अभियान’ अंतर्गत 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेचा उद्घाटन समारंभ  24 मार्च 2026 रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न झाला. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्तरावर मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने थेट प्रक्षेपण कार्यक्रम फडके नाट्यगृहात येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे तसेच नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. 0000000

विविध कृषी पुरस्कारांकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन संगणक प्रणालीवर अर्ज करावेत

रायगड-अलिबाग दि.25 (जिमाका) :-   महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. सदर पुरस्कार मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते प्रदान करून संबंधितांना सन्मानित करण्यात येते. यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतीमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी खर्च येत असल्याने सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपारिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलनासाठ...

लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी जिल्ह्यात 22 हजार 375 महिलांची प्रक्रिया प्रलंबित

    रायगड-अलिबाग दि.25 (जिमाका) :-  लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण 63 हजार 782 महिलांनी ई-केवायसी   प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु तांत्रिक कारणांस्तव ती प्रक्रिया चुकीची किंवा अपूर्ण असल्याचे आढळून आले आहे.  सध्या 22 हजार 375 महिलांनी ई-केवायसी   प्रक्रिया पुन्हा पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थींना योजनेचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे. याकरिता लाभार्थी महिलांना तात्काळ  https://ladakibahin. maharashtra.gov.in , या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन दि.31 मार्च 2026 पूर्वी आपली ई-केवायसी   प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे. तालुकानिहाय प्रलंबित ई-केवायसी   प्रकरणांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. अलिबाग- 2 हजार 633, कर्जत-1 हजार 962, खालापूर- 1 हजार 772, महाड- 1 हजार 656, माणगाव- 1 हजार 799, म्हसळा-808, मुरुड-713, पनवेल-5 हजार 140, पेण-1 हजार 533, पोलादपूर- 427, रोहा-844, श्रीवर्धन- 787, सुधागड-पाली-489, उरण-1 हजार 376, तळा-436.  महाराष्ट्र शासनाची "लाडकी बहीण" य...

मेरा युवा भारत अंतर्गत पी.एन.पी कॉलेज येथे जिल्हा क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

    रायगड-अलिबाग, दि.23 (जिमाका):-  मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने पी.एन.पी. कॉलेज वेश्वी, अलिबाग येथे (दि.21 मार्च रोजी) जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धां संपन्न झाल्या. यावेळी चित्रलेखा पाटील- कार्यवाह पी.एन.पी.एज्युकेशन सोसायटी अलिबाग, अमित पुंडे - जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत, तपस्वी नंदकुमार गोंधळी - राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा अध्यक्षा प्रिझम सामाजिक विकास संस्था, सुचिता साळवी - संचालिका स्पर्धा विश्व अकॅडमी, क्रीडा शिक्षक तेजस म्हात्रे, यतीराज पाटील, पंच पुरुषोत्तम पिंगळे, नंदकुमार वरसोलकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी उपस्थित बहुसंख्य खेळाडूंना शुभेच्छा व मार्गदर्शन करताना खेळाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व पटवून दिले.  तसेच चित्रलेखा पाटील यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त खेळाडू  पुढे यावेत याकरिता खेळाडूंना नेहमीच सहकार्य क...

लघुलेखन परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

  रायगड-अलिबाग, दि.23 (जिमाका):-  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या माध्यमातून शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (GCC-TBC) लघुलेखन परीक्षा व ऑनलाईन दरवर्षी जून व डिसेंबर महिन्यात घेण्यात येतात. माहे जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दि.10 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कागा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी) विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर ( https://mahaamrut.org.in/ ) ऑनलाईन पद्धतीने अर्ज दि. 30 एप्रिल, 2026 पर्यंत मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्जासोबत  गत आर्थिक वर्षाचे (सन 2025-26) अथवा पुढील आर्थिक वर्षासाठी (सन 2026-27) लागू असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा EWS प्रमाणपत्र,  राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र (Do...