Posts

01 ऑक्टोंबर, 2026 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम जाहीर

Image
  रायगड-अलिबाग(जिमाका)दि.20:- भारत निवडणूक आयोगाने 01 ऑक्टोंबर 2026 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम जाहिर केला असून हा कार्यक्रम जिल्ह्यात दि.20 जून 2026 पासून सुरु होणार  असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. या कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे- विशेष सखोल पुनरिक्षणासाठी अर्हता दिनांक 01 ऑक्टोबर 2026, तयारी, प्रशिक्षण व छपाई-20 जून, 2026 ते 29 जून 2026, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी भेटी- 30 जून, 2026 ते 29 जुलै 2026, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण- 29 जुलै, 2026 पर्यंत, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी- 05 ऑगस्ट, 2026, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी- 05 ऑगस्ट, 2026 ते 04 सप्टेंबर 2026, नोटीस टप्पा/दावे व हरकती निकालात काढणे- 05 ऑगस्ट, 2026 ते 03 ऑक्टोबर, 2026, अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी-07 ऑक्टोबर 2026. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमानुसार प्रथम टप्प्यात 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घर...

रस्ता सुरक्षतेच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्यामार्फत विशेष तपासणी मोहिम

  रायगड-अलिबाग(जिमाका)दि.20:- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्यामार्फत रस्ते सुरक्षेसाठी तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सातत्याने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून सर्व सुजान नागरिकांनी रस्त्यावरील होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व रस्ता सुरक्षिततेसाठी वाहतुक नियमांचे पालन करावे. तसेच वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, आवश्यक कागदपत्रे (विमा, परवाना, प्रदूषण प्रमाणपत्र इ.) अद्ययावत ठेवावीत व सुरक्षित वाहन चालन करावे, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल निलेश धोटे यांनी केले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल कार्यालयाने सन 2025-2026 व माहे एप्रिल 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत रस्ता सुरक्षतेच्या अनुषंगाने विना हेल्मेट, अवैध विमा (Invalid Insurance), वाहन चालविताना मोबाईलचा वापर, वैद्य पीयुसी प्रमाणपत्रे नसलेली वाहने, अवैध प्रवासी वाहतूक, विना नंबरप्लेट रस्त्यावर चालणारी वाहने, ऑटो रिक्षा नियमभंग, ओडिसी वाहतूक करणारी वाहने, वैद्य परवाना नसलेली वाहने,अशा प्रकारच्या विविध गुन्हयांसाठी या कार्यालयातर्फे निरंतर विश...

बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा --- पशुसंवर्धन आयुक्त डॉ.किरण पाटील

    रायगड-अलिबाग(जिमाका)दि.20:- राज्यातील गाई-म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा करण्यासाठी व प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने “ महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम , 2023 ” लागू केला आहे. मात्र, अद्यापही क्षेत्रीय स्तरावरील खाजगी कृत्रिम रेतन सेवादाता व संस्थांनी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणी केली नसल्याची बाब समोर आली असल्याने संबंधितांवर या अधिनियमांतर्गत नियमोचित कारवाई करण्याचे निर्देश पशुसंवर्धन आयुक्त डॉ.किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी अधिनस्त अधिकारी वर्गाला दिले आहेत. राज्यामध्ये या कायद्याची अंमलबजावणी 5 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. उत्तम दर्जाच्या वळूंचा वापर करून कृत्रिम रेतनाद्वारे दु धाळ जनावरांची पैदास वाढवणे आणि प्रजननाशी संबंधित गैरप्रकारांना आळा घालणे , हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे .  या कायद्यांतर्गत राज्यातील सर्व रेत केंद्र ), भ्रूण प्रत्यारोपण केंद्रे , कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था आणि सेवा पुरवठादारांना प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक असून त्यांना केवळ प्रमाणित व उच्च वंशावळीच्या वळूंचेच रे...

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना

  रायगड-अलिबाग, दि.13 (जिमाका): राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) तसेच हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यक्रम (NPCCHH) यांच्या सूचनांनुसार नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेचा परिणाम कमी करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य, पंचायत, शिक्षण, कामगार, परिवहन, कृषी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, महिला व बालविकास, MIDC तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी सावली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ORS सुविधा, शीतपेय केंद्रे, प्रथमोपचार किट, तसेच जनजागृती फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य व...

जनगणना-2027 अंतर्गत स्व-गणना सुविधेचा लाभ घ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन

    रायगड-अलिबाग, दि.13 (जिमाका) : भारताची जनगणना-2027 ही प्रथमच डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असून नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. भारत सरकारच्या जनगणना संचालनालयामार्फत जनगणना-2027 अंतर्गत घरगुती व घरगणना टप्प्याचे क्षेत्रीय कार्य दि. 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत पार पडणार आहे. यंदाची जनगणना ही पूर्णतः डिजिटल स्वरूपात होत असून नागरिकांना  https://se.census.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन स्व-गणना करता येणार आहे. स्व-गणना प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याने सर्व शासकीय कार्यालये तसेच अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांनी या मोहिमेचा प्रसार करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना स्व-गणनेबाबत मार्गदर्शन करावे तसेच कार्यालयीन संकेतस्थळ, सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप समूह आदी माध्यमांतून जनजागृती करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. जन...

ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्पामुळे पर्यटन व मत्स्यव्यवसायाला चालना -- मत्स्यव्यवसाय,बंदरे मंत्री नितेश राणे

Image
  रायगड-अलिबाग,दि.13 (जिमाका): जंजिरा किल्ला हा राज्याच्या पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधा वाढीसाठी जंजिरा किल्ला परिसरात उभारण्यात येणारा ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले.       मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला येथे महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘जंजिरा किल्ला ब्रेकवॉटर व प्रवासी जेटी बांधकाम’ प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी खासदार सुनील तटकरे अध्यक्षस्थानी होते. तसेच मुरुड-जंजिरा नगराध्यक्षा आराधना दांडेकर, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, तहसिलदार आदेश डफळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.      मंत्री श्री.राणे म्हणाले की, सुमारे तीन किलोमीटर परिसरात लाटरोधक भिंत उभारण्यात येत असून या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित व सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध होण...

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी -- रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

Image
  रायगड-अलिबाग (जिमाका)दि.8 : आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करा तसेच कोणत्याही परिस्थितीत खते, बियाणे यांची टंचाई भासणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले.             जिल्हा नियोजन भवन सभागृहात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले   बोलत होते. या बैठकीला आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सभापती वैकुंठ पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ.रुपाली सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे आदी उपस्थित होते.             यावेळी मार्गदर्शन करताना रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले म्हणाले की, खरीप हंगामामध्ये बियाणे आणि खतांचा प्रश्न मो...