जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी -- रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले
रायगड-अलिबाग (जिमाका)दि.8 : आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करा तसेच कोणत्याही परिस्थितीत खते, बियाणे यांची टंचाई भासणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले. जिल्हा नियोजन भवन सभागृहात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले बोलत होते. या बैठकीला आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सभापती वैकुंठ पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ.रुपाली सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले म्हणाले की, खरीप हंगामामध्ये बियाणे आणि खतांचा प्रश्न मो...