Posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत

  रायगड-अलिबाग,दि.26(जिमाका ) :- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 साठी प्रवेशिका मागविण्यात येत आहे. प्रवेशिका जिल्हा माहिती कार्यालयात सादर करण्याची अंतिम मुदत 15 मार्च 2026 असून जास्तीत पत्रकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.             राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी, वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, समाज माध्यम पुरस्कार. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. 2025 या कॅलेंडर वर्षाकरीता दि.01 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 पर्यतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख 15 मार्च, 2026 अशी राहील. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2025 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने यासोबत पाठविण्यात येत आहेत. तसेच सदर माहिती शासनाच्या  www.maharashtra.gov.in , आणि महासंचालनालयाच्या  dgipr.maharashtra.gov.in , य...

विविध कृषी पुरस्कारांकरीता इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गटांनी ऑनलाईन अर्ज करावेत

                   रायगड-अलिबाग,दि.26(जिमाका ) :- डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न ,  वसंतराव नाईक कृषिभूषण ,  जिजामाता कृषिभूषण ,  वसंतराव नाईक शेतीमित्र ,  वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी ,  उद्यानपंडित पुरस्कार ,  कृषिभूषण (सेंद्रिय शेती) ,  युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्काराकरिता इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांनी सन-२०२५ पासूनचे विविध कृषी पुरस्काराकरिता संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करावेत ,  असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी ,  महिला ,  व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. हे पुरस्कार मा.र...

जिल्ह्यामध्ये दि.14 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

  रायगड-अलिबाग,दि.26(जिमाका ) :-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि.14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून या  राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग राजेंद्र द. सावंत यांनी केले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलवित प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, विजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. लोकअदालतीचे फायदे...

जिल्हा कारागृहात त्वचारोग तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न

          रायगड-अलिबाग,दि.25(जिमाका ) :-  समता फांऊडेशन मुंबई या सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक बांधीलकी जपत अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली (दि.24 फेब्रुवारी 2026) रोजी अलिबाग जिल्हा कारागृहात  “ त्वचारोग तपासणी शिबीर ”  कार्यक्रम संपन्न झाला. या आरोग्य शिबीरात डॉ.सुयश विरकर (त्वचारोगतज्ञ) यांनी बंदी बांधवांना त्वचारोगाची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.  तसेच त्वचारोग निदान आणि मोफत उपचार यावर भर देण्याच्या अुनषंगाने कारागृहात दाखल 29 बंद्यांची त्वचारोगबाबतची तपासणी करण्यात आली.             हे आरोग्य शिबीर  अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा,पुणे  डॉ. सुहास वारके (भा.पो.से) व विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा पुणे योगश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.      या शिबिर कार्यक...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा

    रायगड-अलिबाग,दि.24(जिमाका ):-  दि.18 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयान्वये रोहा तहसिलदार कार्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान  कार्यक्रमांतर्गत दि.7 मार्च 2026 रोजी कोलाड, दि.14 मार्च 2026 रोजी नागोठणे, दि.10 एप्रिल 2026 रोजी चणेरा, दि.14 एप्रिल 2026 रोजी निडी तर्फे अष्टमी, दि.17 एप्रिल 2026 रोजी घोसाळे, दि.1 मे 2026 रोजी निडी तर्फे अष्टमी तसेच दि.8 मे 2026 व दि.15 मे 2026 रोजी सकाळी 11.00 वा. नगर परिषद रोहा येथे शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून  या शिबिराचा नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही  तहसिलदार डॉ.किशोर देशमुख यांनी केले आहे. या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती करणे, भोगवटदार वर्ग 2 जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतर करणे, जिवंत 7/12 अंतर्गत वारस नोंदी करणे, तुकडे बंदी कायद्यानुसार कार्यवाही करणे, आधार कार्ड,  जातीचे दाखले, रहिवासी दाखले, वय अधिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड ची सर्व कामे, जेष्ठ नागरिक दाखले, सांगयो, इगायो, फॉर्म...

बौद्ध समाजातील संस्थांना पायाभूत सुविधांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान इच्छूक पात्र संस्थांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत

     रायगड-अलिबाग,दि.24 (जिमाका):-महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र संस्थांना त्यांच्या इमारतीमध्ये पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान उपलब्ध करून दिले जाणार असून इच्छूक पात्र संस्थांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी व सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती रायगड-अलिबाग उमेश सुर्यवंशी यांनी केले आहे. योजनेसाठी पात्रतेचे निकषः  संस्था राज्यातील धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. संस्थेच्या विश्वस्त किंवा सदस्यांमध्ये 51 टक्क्यांपेक्षा जास्त सदस्य हे बौद्ध समाजातील असणे अनिवार्य आहे. संबंधित संस्था सांस्कृतिक, शैक्षणिक किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असावी. एका संस्थेला या योजनेंतर्गत जास्तीत जास्त 5 वेळा अनुदान घेता येईल. अनुदान कोणत्या कामांसाठी मिळेल?- या योजनेतून शासन निर्णयानुसार इमारतीचे किरकोळ न...

संत गाडगे महाराज यांचे जयंतीनिमित्त कारागृहात स्वच्छतेविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

        रायगड-अलिबाग,दि.24(जिमाका ):-  संत गाडगे महाराज हे थेारसमाज सुधारक होते. त्यांनी किर्तनातून समाज प्रबोधन, अंधश्रध्दा निर्मुलन आणि स्वच्छता संदेशाचा प्रसारकेला. त्‍यांचे जयंती निमित्त विविध ठिकाणी स्वच्छता अभियान तसेच समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एकभाग म्हणून अलिबाग जिल्हा कारागृहात दाखल असलेल्या बंद्यांकरीता स्वच्छते विषयी जनजागृती निर्माण व्हावी याकरीता जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.             या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते संतगाडगे महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून झाली. कार्यक्रमाचे सुरुवातीस प्रबोधन सामाजिक सेवा संस्था डॉ. मिलींद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाज सुधारण्याचे चळवळीमध्ये थोर समाजसेवक संतगाडगेबाबा यांचे विसाव्या शतकातमोलाचे योगदान होते यांची जाणीव बंद्यांना करुन दिली.  तसेच संतगाडगे महाराज यांनी स्वच्छतेचे ध्येय हाती घेवून त्यांनी गावागावात जावून समाजातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. थोर समाजसेवक संतगाडगेबाबा यांनी स...