Posts

1 जून ते 31 जुलै कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी

    रायगड-अलिबाग (जिमाका) दि.20: महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी दि.1 जून  ते 31 जुलै 2026 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) रायगड-अलिबाग संजय पाटील यांनी केले.     या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी करणारे मच्छिमार खालील कारवाईस पात्र होतील. सदर पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. सदर पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर- यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही.  समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका दि.1 जून 2026 पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच दि. 31 जुलै 2026 वा त्यापुर्वी सदर नौकांना समुद्रात मासेम...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना महाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला होणार सुरुवात

  रायगड-अलिबाग,दि.22(जिमाका): ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ देणारी व पशुपालन व्यवसायाला उद्योजकतेचे आधुनिकस्वरूप देणारी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनाअत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कटिबद्ध आहे. महाआयटीकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी सुविधा निर्माण करणे सुरु असून, हे काम पूर्ण होताच इच्छुक लाभार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ.किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी दिली आहे. राज्यातील पशुसंवर्धन व्यवसायाला नवीन दिशा देण्यासाठी व ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीनिर्माण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना देणारीही योजना राज्याच्या आर्थिक विकासात भरीव योगदान देणारी ठरणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील युवा वर्गासह शेतकरी व पशुपालकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर योजनेची अंमलबजावणी वेळेवर व पारदर्शकपणे व्हावी, यासाठी पशुसंवर्धन विभागानेसूक्ष्म नियोजन सुरू केले आहे.  महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज प्रक्रिय...

काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश "रोबोटिक बोयो" ची उपयुक्तता पुन्हा झाली अधोरेखित

Image
रायगड-अलिबाग,दि.22(जिमाका): ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काशीद बीचवर आलेल्या एका पुणेकर कुटुंबावर आज सकाळी काळाने झडप घातली होती. मात्र, पोलिसांच्या प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून, एका २० वर्षीय तरुणीला समुद्रात बुडताना अगदी ऐनवेळी सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण च्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या "रोबोटिक बोयो" ची उपयुक्तता या प्रसंगामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. या रिमोट ऑपरेटेड वॉटरक्राफ्टमुळे वीस वर्षीय तरुणीचा जीव वाचविण्यास प्रशासनाला यश मिळाले आहे.      आज सकाळी 7.40 वाजताच्या सुमारास, पुणे येथील रहिवासी असलेले आकाश साबळे आणि सिद्धी साबळे हे आपल्या कुटुंबासह काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. हे कुटुंब पोहण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने सिद्धी साबळे (वय 20 वर्षे) ही तरुणी अचानक समुद्राच्या खोल पाण्यात ओढली जाऊ लागली आणि बुडत असल्याचे लक्षात आले.  या कठीण प्रसंगी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई (बकल नंबर 1028) प्रविण रोटकर आणि पोल...

रोबोटिक बोयो ठरतोय खऱ्या अर्थाने जीवनरक्षक..! -विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल

Image
रायगड-अलिबाग,दि.22(जिमाका):- पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या "रोबोटिक बोयो" जीवरक्षक यंत्राचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल या येथील नागाव बीच येथे आज सकाळी उपस्थित होत्या. यावेळी रोबोटिक बोयोच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेतल्यानंतर त्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली की, "रोबोटिक बोयो" ठरतोय खऱ्या अर्थाने जीवन रक्षक..!     याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ.सचिन राऊळ, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी डॉ.रवींद्र शेळके, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आणि जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.     या भेटीच्या वेळी विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रशासनाला बीचवरील सोयीसुविधा तसेच शौचालयांची संख्या वाढविण्याबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांची माहिती आपल्याकडे संकलित करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. 000000

01 ऑक्टोंबर, 2026 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम जाहीर

Image
  रायगड-अलिबाग(जिमाका)दि.20:- भारत निवडणूक आयोगाने 01 ऑक्टोंबर 2026 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम जाहिर केला असून हा कार्यक्रम जिल्ह्यात दि.20 जून 2026 पासून सुरु होणार  असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. या कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे- विशेष सखोल पुनरिक्षणासाठी अर्हता दिनांक 01 ऑक्टोबर 2026, तयारी, प्रशिक्षण व छपाई-20 जून, 2026 ते 29 जून 2026, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी भेटी- 30 जून, 2026 ते 29 जुलै 2026, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण- 29 जुलै, 2026 पर्यंत, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी- 05 ऑगस्ट, 2026, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी- 05 ऑगस्ट, 2026 ते 04 सप्टेंबर 2026, नोटीस टप्पा/दावे व हरकती निकालात काढणे- 05 ऑगस्ट, 2026 ते 03 ऑक्टोबर, 2026, अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी-07 ऑक्टोबर 2026. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमानुसार प्रथम टप्प्यात 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घर...

रस्ता सुरक्षतेच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्यामार्फत विशेष तपासणी मोहिम

  रायगड-अलिबाग(जिमाका)दि.20:- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्यामार्फत रस्ते सुरक्षेसाठी तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सातत्याने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून सर्व सुजान नागरिकांनी रस्त्यावरील होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व रस्ता सुरक्षिततेसाठी वाहतुक नियमांचे पालन करावे. तसेच वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, आवश्यक कागदपत्रे (विमा, परवाना, प्रदूषण प्रमाणपत्र इ.) अद्ययावत ठेवावीत व सुरक्षित वाहन चालन करावे, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल निलेश धोटे यांनी केले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल कार्यालयाने सन 2025-2026 व माहे एप्रिल 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत रस्ता सुरक्षतेच्या अनुषंगाने विना हेल्मेट, अवैध विमा (Invalid Insurance), वाहन चालविताना मोबाईलचा वापर, वैद्य पीयुसी प्रमाणपत्रे नसलेली वाहने, अवैध प्रवासी वाहतूक, विना नंबरप्लेट रस्त्यावर चालणारी वाहने, ऑटो रिक्षा नियमभंग, ओडिसी वाहतूक करणारी वाहने, वैद्य परवाना नसलेली वाहने,अशा प्रकारच्या विविध गुन्हयांसाठी या कार्यालयातर्फे निरंतर विश...

बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा --- पशुसंवर्धन आयुक्त डॉ.किरण पाटील

    रायगड-अलिबाग(जिमाका)दि.20:- राज्यातील गाई-म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा करण्यासाठी व प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने “ महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम , 2023 ” लागू केला आहे. मात्र, अद्यापही क्षेत्रीय स्तरावरील खाजगी कृत्रिम रेतन सेवादाता व संस्थांनी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणी केली नसल्याची बाब समोर आली असल्याने संबंधितांवर या अधिनियमांतर्गत नियमोचित कारवाई करण्याचे निर्देश पशुसंवर्धन आयुक्त डॉ.किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी अधिनस्त अधिकारी वर्गाला दिले आहेत. राज्यामध्ये या कायद्याची अंमलबजावणी 5 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. उत्तम दर्जाच्या वळूंचा वापर करून कृत्रिम रेतनाद्वारे दु धाळ जनावरांची पैदास वाढवणे आणि प्रजननाशी संबंधित गैरप्रकारांना आळा घालणे , हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे .  या कायद्यांतर्गत राज्यातील सर्व रेत केंद्र ), भ्रूण प्रत्यारोपण केंद्रे , कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था आणि सेवा पुरवठादारांना प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक असून त्यांना केवळ प्रमाणित व उच्च वंशावळीच्या वळूंचेच रे...