Posts

रायगड जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रायगड-अलिबाग,दि.०६(जिमाका):-  समाजमाध्यमावर पेट्रोल-डिझेल विक्रीमध्ये तुटवडा निर्माण होणार असल्याची प्रसारीत झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थाच्या मुक्त विक्रीमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्य:स्थितीचा विचार करून पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदी विचारात घेता पेट्रोल किंवा डिझेल खुल्या प्लॉस्टिक बाटली किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये पेट्रोल पंपावरून भरून देणे, विकणे नियमांविरुद्ध आणि बेकायदेशीर असल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.  जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक,मालक यांनी पेट्रोल, डिझेल हे केवळ वाहनाच्या इंधन टाकीतच वितरित करावे. कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल, डिझेल खुले (कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांडयात) विक्री पुरवठा करू नये. पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी व विक्री नोंदी नियमित ठेवाव्यात.  अनाधिकृतप...

कॉल बेसिसवर भाडोत्री वाहन सेवा पुरवठा करण्याकरीता पात्र पुरवठादार,कंपन्यांनी दरपत्रक,कोटेशन सादर करावीत

    रायगड-अलिबाग,दि.०६(जिमाका):-  मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) प्रकल्पांतर्गत जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाकरीता कॉल बेसिसवर भाडोत्री वाहन सेवा पुरवठा करण्याकरीता प्रमुख, जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट, रायगड यांच्या कार्यालयात विहित प्रपत्रात दरपत्रक कार्यालयीन वेळेत ऑफलाईन पद्धतीने दि.१६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सादर करावीत, असे आवाहन प्रमुख, जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट तथा प्रकल्प संचालक आत्मा रायगड वंदना शिंदे यांनी केले आहे. पुरवठादारांना पुरवठ्याच्या अटी व शर्तीचे दरपत्रक, मागणीपत्र तसेच दरपत्रकाचा विहित नमुना प्रपत्र विनामूल्य या कार्यालयात तसेच स्मार्ट प्रकल्पाच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://www.smart-mh.org/ ) उपलब्ध करुन दिले जातील. पात्र पुरवठादार, कंपन्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन दरपत्रक, कोटेशन सादर करावीत. ०००००००

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व बीज भांडवल कर्ज योजना १०० टक्के उद्दिष्टपूर्ती

  रायगड-अलिबाग,दि.०२(जिमाका)  :- सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती यांना स्वता:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरिता शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत सन २०२५-२६ करीता  जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग या अंमलबजावणी यंत्रणेस ५७६ व खादी ग्रामोद्योग मंडळ  रायगड-अलिबाग या अंमलबजावणी यंत्रणेस ३८४ असे ९६० चे भौतिक उद्दिष्ट होते. त्यानुषंगाने सन २०२५-२६ अंतर्गत जिल्ह्यातील विविध बँक शाखेकडे  एकूण २ हजार ४२७ प्रस्ताव शिफारस करण्यात आले होते. या प्रकरणांपैकी एकूण ९६५ प्रकरणात बँक शाखेद्वारे मंजूरी असून उद्दिष्टांच्या १०० टक्के जास्त उद्दिष्टांची पूर्तता यावर्षी केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडून सूक्ष्म नियोजन करुन सलग दुसऱ्या वर्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.      केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग या अंमलबजावणी यंत्रणेस १४ व खादी ग्रामोद्योग मंडळ ...

शहीद दिनानिमित्त मेरा युवा भारत,युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने पदयात्रा संपन्न

  रायगड-अलिबाग दि.25 (जिमाका) :-    भारतात दरवर्षी 23 मार्च रोजी शहीद दिन साजरा केला जातो 1931 मध्ये याच दिवशी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या तीन थोर क्रांतिकारकांना लाहोर जेलमध्ये ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती त्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी दिलेल्या त्याबद्दल हा दिवस साजरा केला जातो. तरुणांमध्ये देश प्रेमाची भावना जागृत करण्याकरिता तसेच क्रांतिकारकांचे बलिदान स्मरणात ठेवणे आणि त्यांच्या त्यागाला अभिवादन करणे याकरिता मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार, रायगड अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या सहकार्याने व अमित पुंडे जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत रायगड अलिबाग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पदयात्रेचे आयोजन अलिबाग मध्ये केले होते.  यावेळी भारत माता की, जय, शहीद जवान,अमर रहे, वंदे मातरम, या घोषणांचा  जयघोष करण्यात आला. पदयात्रेत स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तथा स्वयंसिद...

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम संपन्न

रायगड-अलिबाग दि.25 (जिमाका) :-    जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने  जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अलिबाग समुद्रकिनारा येथे आयोजित मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमादरम्यान क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते क्षयरोग निर्मूलनासाठी योगदान देणाऱ्या ‘निक्षय मित्र’ यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हयात विविध ठिकाणी टी बी डे साजरा करण्यात आला व त्यानिमित्ताने क्षयरुग्णांना पोषण आहार किट (फूड बास्केट) देखील वितरित करण्यात आले. कार्यक्रमास उपाध्यक्ष मधुकर पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री संजना काळे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, सभापती तथा गटनेते वैकुंठ पाटील, नारायण डामसे, रसिका केणी, जि. प. सदस्या मानसी दळवी, जि. प. सदस्य अमित नाईक, जनार्दन भस्मा, प्रभाकर म्हात्रे, संतोष बैलमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प...

होय,आपण क्षयरोग संपवू शकतो-पनवेल मनपाचा निर्धार ; टी.बी.मुक्त भारत अभियान अंतर्गत 100 दिवसीय मोहिमेची दमदार सुरुवात

    रायगड-अलिबाग दि.25 (जिमाका) :-   पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत ‘टी.बी. मुक्त भारत अभियान’ अंतर्गत 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेचा उद्घाटन समारंभ  24 मार्च 2026 रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न झाला. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्तरावर मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने थेट प्रक्षेपण कार्यक्रम फडके नाट्यगृहात येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे तसेच नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. 0000000

विविध कृषी पुरस्कारांकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन संगणक प्रणालीवर अर्ज करावेत

रायगड-अलिबाग दि.25 (जिमाका) :-   महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. सदर पुरस्कार मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते प्रदान करून संबंधितांना सन्मानित करण्यात येते. यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतीमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी खर्च येत असल्याने सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपारिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलनासाठ...