Posts

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता महाड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

             रायगड-अलिबाग,दि.27(जिमाका):-   जिल्हा कौशल्य विकास ,  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,रायगड - अलिबाग आणि  वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड, यांच्या संयुक्त विद्यमाने दि.30 एप्रिल 2026 रोजी वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड ता.महाड   येथे  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती   जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार   यांनी दिली आहे.           जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या/ ॲप्रेंटिसशिपची  भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. सदर मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी ,आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवीधारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या  संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज ...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत ई-केवायसी करण्याची दि.३० एप्रिल पर्यंत संधी उपलब्ध

    रायगड-अलिबाग,दि.27(जिमाका):-   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि ही प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य निर्यामत/कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे, अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दि.३० एप्रिल २०२६ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली असून याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.  ज्या महिलांची -KYC करताना चुक झाली होती त्या महिलांनी दि.३० एप्रिल २०२६ पर्यंत -KYC करुन घ्यावी, यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार नाही, दि.३० एप्रिल २०२६ पर्यंत -KYC नाही केली तरी सदरचा लाभ बंद होईल, असे आवाहन कार्यालयाकडून करण्यात येत आहे. 0000000

कोकण विभागातील पहिला ‘अमृत आनंद मेळा’ वरसोली अलिबाग येथे उत्साहात संपन्न

               रायगड-अलिबाग,दि.27 (जिमाका ):-   रायगड जिल्ह्यातील वरसोली ,  अलिबाग येथे कोकण विभागातील पहिला ‘अमृत आनंद मेळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन ,  उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत ) च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत वर्ग’ या  किशोर विकास उपक्रमांतर्गत  आयोजित या निवासी मेळाव्याला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शारंग हॉलिडे होम ,  वरसोली येथे  13  एप्रिल  2026  रोजी सायंकाळी सुरू झालेला हा मेळावा  14  एप्रिलपर्यंत विविध उपक्रमांनी रंगला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुतार काका व अविनाश धाट काका यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. या मेळाव्यात बौद्धिक खेळ ,  संस्कारमूल्ये रुजविणारे उपक्रम ,  शारीरिक क्रियाकलाप तसेच प्रेरणादायी सत्रांचा समावेश होता. सौ. गुंजाळ ताईंनी मुलींकरिता स्वसंरक्षणाच्या दृष्टीने ...

“आजच्या डिजिटल काळात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त ही काळाची गरज— जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
  रायगड-अलिबाग, दि.२७ (जिमाका): आजच्या डिजिटल युगात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त ही काळाची गरज बनली असून प्रत्येक नागरिकाने उत्पन्नाचे योग्य नियोजन, खर्चावर नियंत्रण, गुंतवणुकीचे भान आणि कर्जाचे जबाबदारीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. Reserve Bank of India, Mumbai आणि जिल्ह्याची अग्रणी बँक Bank of India यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 एप्रिल 2026 रोजी प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित Training of Trainers (ToT) कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद रायगड यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, रिझर्व्ह बँकेच्या उपमहाप्रबंधक डॉ. ज्योती सक्सेना, बँक ऑफ इंडिया रायगड विभाग प्रमुख दीपनविता सहानी, उप विभागीय प्रमुख भारत सहाय, जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, तसेच रिझर्व्ह बँकेचे रायगड जिल्हा अधिकारी विशाल गोंडखे, बेंजामिन डिकोस्टा, विविध शाळांतील शिक्षक, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. मार्...

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा --जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
    रायगड अलिबाग,(जिमाका)दि,22 :-  रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय  आवश्यक आहे. आपत्ती काळात सर्व यंत्रणानी सतर्क व दक्ष रहावे, तसेच मान्सून पूर्व तयारी करताना सर्व बाबींची काटेकोरपणे तपासणी आणि उपाययोजना करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक 2026 चे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी जिल्हाधिकारी  श्री.जावळे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, भारतीय तटरक्षक दलाचे अभिषेक कुमार, आपत्ती व्यवस्थापन अधिकार सागर पाठक  उपस्थित होते.  जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले, पावसाळा सुरु होण्याकरिता एक महिन्याचा कालावधी बाकी असून सर्व शासकीय यंत्रणानी अतिधोकादायक व धोक्याची संभावना असलेल्या ठिकाणांची पाहणी करावी. या ठिकाणच्या नागरिकांना मान्सून कालावधीमध्ये सुरक्षित जागी स...

पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी MH46DH ही नवीन मालिका पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज सादर करावेत

  रायगड अलिबाग,(जिमाका) दि,21:-  प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी MH46DH ही नवीन मालिका सुरु करण्यात येणार आहे. यासाठी ज्यांना दुचाकी वाहनांकरिता आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दि.23 एप्रिल 2026 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.00 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात डीडी, निवासी पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिहवन अधिकारी पनवेल यांनी केले आहे. एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि.23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4.00 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि. 24 एप्रिल 2026 रोजी कार्यालयीन वेळेत दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा धनाकर्ष (DD) बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयात जमा करावा. या  अर्जासाठी त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवीन...

गांधी शांती परिक्षेत जिल्हा कारागृहातील 23 महिला व पुरुष बंद्यांचा सहभाग

Image
  रायगड अलिबाग,(जिमाका) दि,21:-  अलिबाग जिल्हा कारागृहात दाखल बंद्यांमध्ये नैतिक मुल्यांचा विकास आणि हिंसामुक्त समाज घडविण्यासाठी मुंबई सर्वोदय मंडळ, मुंबई या सामाजिक संस्थेच्या वतीने कारागृहातील बंद्यांकरीता आयोजित करण्यात आलेल्या गांधी शांती परिक्षेत जिल्हा कारागृहातील 23 महिला व पुरुष बंद्यांनी सहभाग घेतला असल्याची माहिती   जिल्हा कारागृह अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल यांनी दिली आहे. संस्थेचे स्वयंसेवक प्रेमशंकर तिवारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शांततापूर्ण जगाची निर्मिती करण्यासाठी तसेच भावी पिढीसाठी बंद्यांमध्ये प्रेम, बंधुत्व, मैत्रीभाव, सहिष्णुता, सेवाभाव, सत्य, अहिंसा आणि शांततेचे बिज रुजवुन शांतिमय जिवन जगण्याकरीता बंद्यांना प्रवृत्त करण्यासाठी गांधी शांती परिक्षेचे आयोजन करीत असल्याचे सांगितले. तसेच महात्मा गांधीजींची आत्मकथा वाचून बंद्यांचे हृदय परिवर्तन व्हावे, त्यांना भावी जीवन जगण्याची प्रेरणा मिळावी व बंद्यांनी सत्य व अहिंसेच्या मार्गावर जावून त्यांचे विचार परिवर्तन होण्यास मदत करण्याच्या उद्देशाने या संस्थेमार्फत कारागृह ग्रंथालयात बंद्यां...