गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत करा; माणगाव व इंदापूर बायपासची कामे विहित मुदतीत पूर्ण करा--- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले टोलमाफीसाठी थेट दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना संपर्क
रायगड-अलिबाग,दि.3(जिमाका): गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, वाहतुकीची कोंडी होणार नाही तसेच गणेशभक्त व सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात,असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. तसेच गणेशोत्सव काळात या ठिकाणच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित देखरेख ठेवून त्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांबाबतचा आढावा घेण्यासाठी महाड येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री श्री. भोसले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या...