जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर हा महत्वपूर्ण उपक्रम—पालकमंत्री भरतशेठ गोगावले
रायगड-अलिबाग(जिमाका)दि.21:- शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" ( Maha Walkathon-Walk for Water) या महत्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून "पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा" हा जलसंधारणाचा संदेश नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, शेतकरी व विविध सामाजिक घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी या अभियानामध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी आज येथे केले. अलिबाग बीच येथे जिल्हा प्रशासन व जलसंधारण विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय महा वॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील आदि उपस्थित होत...