Posts

श्री गणेशा आरोग्याचा-२०२६ नियोजन आढावा बैठक संपन्न

  रायगड-अलिबाग, दि.११ (जिमाका): मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष,रायगड  यांच्या वतीने आगामी “ श्री गणेशा आरोग्याचा २०२६ ” या आरोग्य अभियानाच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी किशन यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित अधिकारी पदाधिकारी व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गणेश मंडळे अध्यक्ष, CMRF,MJPJAY,Charity, Government Hosptals यांची आढावा बैठक संपन्न झाली . या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक (CS), जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO), वैद्यकीय आरोग्य अधिकारी (MOH), VVCMC, धर्मादाय रुग्णालय कार्यालय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) समन्वयक तसेच संबंधित रुग्णालये, गणेश मंडळे अध्यक्ष,आरोग्य सुविधांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीमध्ये आगामी अभियानाच्या नियोजन,समन्वय, आरोग्य शिबिरांचे आयोजन, आवश्यक मनुष्यबळ व सुविधा तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास पवार यांनी श्री गणेशा आरोग्याचा अभियान नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली तसेच जिल्हाधिकारी रायगड,यांच्या मार्ग...

गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्गांचा वापर करा

  रायगड-अलिबाग, दि. ११ (जिमाका) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ तसेच पाली फाटा (खोपोली)-वाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ (अ) वरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रण व पर्यायी मार्गांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पालघर परिसरातील गणेशभक्त गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी, तळ कोकणात जात असतात. त्यामुळे दि. १४ सप्टेंबर रोजीच्या गणेश प्रतिष्ठापना तसेच त्यानंतरच्या कालावधीत महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी झाल्यास वाहनचालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे : पेण येथे कोंडी झाल्यास- तरणखोप – पेण बायपास – गागोदे – वरसई – पाली फाटा – परळी – जांभुळपाडा – पाली – वा कण. वडखळ येथे कोंडी झाल्यास-वडखळ-पोयनाड – पेझारी चेकपोस्ट – कुडूस – नागोठणे – वाकण. नागोठणे येथे...

गणेशोत्सव काळात माणगाव-इंदापूर येथे ‘नो पार्किंग झोन’

  रायगड-अलिबाग, दि. ११ (जिमाका) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वाहतूक कोंडी होऊ नये तसेच वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी, यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने माणगाव व इंदापूर येथील महामार्गालगतच्या काही भागात दोन्ही बाजूंनी ‘नो पार्किंग झोन ’ घोषित केला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पालघर परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी कोकणातील आपल्या मूळ गावी जातात. यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वाहनांची मोठी वर्दळ वाढते. त्यातच दि. ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान मोठ्या संख्येने एस.टी. बसेस कोकणाकडे रवाना होणार असल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. माणगाव व इंदापूर येथील बाजारपेठा मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची मोठी वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताची शक्यताही लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात आली आहे.   माणगाव येथील- रेड्डीज हॉटेल ते ढालघर फाटा, निजामपूर नाका ते कालवा रोड, मोर्बा नाका ते पवार वाडा हॉटेल तसेच इंदापूर येथील- माहि हॉटेल...

नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक,सुलभ व विहित कालमर्यादेत मिळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ लागू

    रायगड-अलिबाग,दि.११ (जिमाका):- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ हा नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक, सुलभ व विहित कालमर्यादेत मिळण्यासाठी लागू करण्यात आला आहे. नागरीकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या शेकडो सेवा जसे जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, जन्म-मृत्यु दाखले यासरख्या विविध शासकीय विभागांच्या एकुण १२१२ सेवा या कायद्याखाली अधिसूचित करण्यात आलेल्या असून या सेवा नागरीकांना 'आपले सरकार' पोर्टलवरुन मिळवता येतील. याशिवाय नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रामधूनही या सेवा नागरीकांना उपलब्ध करुन घेता येतील. पात्र नागरीकांना या सेवा विहित वेळेत न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय सेवा नाकारण्यात आली तर प्रथम व द्वितीय अपील संबंधित कार्यालयातील प्रथम व द्वितीय अपिलीय प्राधिकाऱ्याकडे करण्याचा अधिकार आहे. तद्नंतरही सेवा न मिळाल्यास संबंधित कसूरदार अधिकाऱ्याविरुद्ध सेवा हक्क आयोगाकडे तृतीय अपिल करता येईल. तसेच पुरेशा व वाजवी कारणाशिवाय सेवा देण्यास विलंब झाल्यास संबंधित कसूरदार अधिकाऱ्यास रु.५०००/- पर्यंत दंड होवू शकतो. संकेतस्थळ - https://aaplesarkar. mahaonli...

शिक्षकांच्या हातूनच ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार-पालकमंत्री भरत गोगावले महाडमध्ये आदर्श शिक्षकांचा सन्मान; शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव

रायगड-अलिबाग,दि.१० (जिमाका):- ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षक करत असतात. शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक नसून संपूर्ण गावाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे. त्यामुळे शिक्षकांवर मोठी सामाजिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री भरत गोगावले यांनी केले. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम गुरुवारी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री.गोगावले बोलत होते.   कार्यक्रमास आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत कळंबे, महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विषय समित्यांचे सभापती, सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. गोगावले म्हणाल...

‘अमृत’तर्फे विश्वबंधुत्व पंधरवड्याचे आयोजन विविध संस्थांनी सहभागी व्हावे

    रायगड-अलिबाग,दि.10(जिमाका ):- स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्म संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणातून जगाला दिलेला सर्वधर्मसमभाव , सहिष्णुता , मानवता , परस्पर सन्मान आणि विश्वबंधुत्वाचा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत व्यापक स्वरूपात पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन , उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने सन 2026 पासून दरवर्षी दि.11 सप्टेंबर ते दि.26 सप्टेंबर 2026 दरम्यान ‘विश्वबंधुत्व पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार असून विविध संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे. आजच्या बदलत्या सामाजिक व जागतिक परिस्थितीत विविधता , मतभिन्नता आणि सामाजिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक ऐक्य , सहिष्णुता , परस्पर सन्मान आणि बंधुभावाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर विश्वबंधुत्वाचा विचार केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या उद्देशाने हा पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे. ‘ शिकागो भाषण कृती कार्यक्रम’ विशेष आकर्षण या पंधरवड्याचे प्रमुख आकर्षण ‘ शिकागो भाषण कृत...

महाडच्या हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा निधी ! हुतात्मा कमलाकर दांडेकर यांच्या नावाने स्मारक ओळखले जाणार; महाडच्या हुतात्मा दिनाचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी कॅबिनेटमध्ये विषय मांडणार : पालकमंत्री भरतशेठ गोगावले

    रायगड-अलिबाग,दि.10(जिमाका ):- भारताच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात वीरांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह स्वातंत्र्यवीर, हुतात्मे आणि सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या बलिदानाचे स्मरण करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले की, महाडच्या हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल. १० सप्टेंबर १९४२ रोजी क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली महाड तहसील कार्यालयावर निघालेल्या किसान मोर्चावर पिंपळपार परिसरात तत्कालीन इंग्रज सरकारच्या पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात कमलाकर दांडेकर, अर्जुन भोई, वसंत दाते, नथु टेकावला आणि विठ्ठल बिरवाडकर या पंचवीरांना वीरमरण आले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आयोजित ८४व्या हुतात्मा दिनानिमित्त पालकमंत्...