Posts

धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी

  रायगड-अलिबाग,(जिमाका)दि.31:- दि.01 सप्टेंबर ते दि.15 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदत असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक बाबींची वेळेत पूर्तता करुन आपली ऑनलाईन नोंदणी धान खरेदी केंद्रावर करुन घ्यावी व किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र.जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.रविंद्र शेळके यांनी केले आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये, म्हणून ही योजना राबविण्यात येते.  हंगाम 2016-2017 पासून विकेंद्रीत खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आधारभूत किंमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना लाभ मिळावा या हेतूने राज्यात धान/भरडधान्य खरेदी केंद्र सुरु केली आहेत. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शासनाकडे धान्य विक्री करु इच्छीणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतक-यांनी आपले धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यापूर्वी धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंद...

अलिबाग येथे दि.07 सप्टेंबर रोजी डाक अदालतीचे आयेाजन

  रायगड-अलिबाग,(जिमाका)दि.31:- अधीक्षक डाकघर, रायगड विभाग यांच्या कार्यालयामार्फत दि.07 सप्टेंबर 2026 रोजी, दुपारी ठीक दुपारी 03.00 वा.डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतींमध्ये, अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांच्याकडे दि.03 सप्टेंबर 2026 पर्यंत पोहोचेल अशा रीतीने पाठवावी,असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग राजेश रनाळकर यांनी केले आहे. रायगड विभागातील डाक सेवेसंबंधित ज्या तक्रारी/समस्या 6 आठवड्यांच्या कालावधीत निकाली काढण्यात आलेल्या नाहीत, अशा टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर इत्यादी सेवांशी संबंधित तक्रारींचा डाक अदालतीमध्ये विचार करण्यात येईल. तक्रारीमध्ये सविस्तर माहिती जसे की तक्रारीचा दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. विशेष नोंदः त्रैमासिक होणारी डाक अदालत आता दरमहा होणार आहे. दि. 07 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणारी डाक अदालत ही या उपक्रमाची प्रथम डाक अदालत असेल. त्यानंतर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी 03.00 वाजता डाक अदा...

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचे आयोजन

    रायगड-अलिबाग,(जिमाका)दि.31:- समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत  न्याय आणि हक्क पोहोचवणे  हे क्रांतीसूर्य  महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचे मूळ सूत्र होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले काम अमिट आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे जलद गतीने व तडजोडीने निपटारा करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार दि.1 सप्टेंबर 2026 ते दि 31  मार्च 2027 या कालावधीत महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग यांच्याकडील 13 ऑगस्ट 2026  चे शासन निर्णयानुसार राज्यात महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनींशी संबंधित महसूली दावे मोठया प्रमाणावर दाखल होतात. प्रकरणांमध्ये एका स्तरावर निकाल लागल्यानंतर असंतुष्ट पक्षकार ...

जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर हा महत्वपूर्ण उपक्रम—पालकमंत्री भरतशेठ गोगावले

Image
  रायगड-अलिबाग(जिमाका)दि.21:- शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" ( Maha Walkathon-Walk for Water) या महत्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून "पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा" हा जलसंधारणाचा संदेश नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, शेतकरी व विविध सामाजिक घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी या अभियानामध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी  आज येथे केले.  अलिबाग बीच येथे जिल्हा प्रशासन व जलसंधारण विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय महा वॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर आयोजित कार्यक्रमात ते  बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील आदि उपस्थित होत...

जिल्ह्यामध्ये दि.12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

    रायगड-अलिबाग,दि.20 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि.12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग एस.बी.अग्रवाल यांनी केले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, विजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच...

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त रायगडमध्ये विविध उपक्रम; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 5 विद्यार्थी पात्र

Image
  रायगड(जिमाका) दि.15:- आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या वतीने रायगड जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या नियोजनानुसार हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अलिबाग समुद्रकिनारी 13 ऑगस्ट रोजी झालेल्या 5 किलोमीटर रेड रन स्पर्धेत 17 ते 25 वयोगटातील 41 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुलांमध्ये स्वागत समीर पाटील प्रथम, अक्षय राजा लेंडी द्वितीय तर मुलींमध्ये करिष्मा प्रकाश म्हात्रे प्रथम आणि मुग्धा नरेश पाटील द्वितीय ठरल्या. तृतीय क्रमांक अनुक्रमे यश दत्ताराम म्हात्रे व करिष्मा यशवंत हिरवे यांनी मिळविला. 14 ऑगस्ट रोजी झालेल्या एचआयव्ही/एड्स विषयावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत स्नेहा मुंडे प्रथम, वैष्णवी प्रमोद मोकल द्वितीय आणि रुचिता धारसे तृतीय ठरल्या. रेड रनमधील मुलांचे व मुलींचे प्रथम-द्वितीय क्रमांकाचे विजेते तसेच प्रश्नमंजुषेतील प्रथम क्रमांकाची स्नेहा मुंडे हे २३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे होणाऱ...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Image
    रायगड(जिमाका) दि.15:- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या 80 व्या वर्धापनदिनी ध्वजारोहण जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.रविंद्र शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नितीन वाघमारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) भारत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते ०००००