Posts

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त रायगडमध्ये विविध उपक्रम; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 5 विद्यार्थी पात्र

Image
  रायगड(जिमाका) दि.15:- आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या वतीने रायगड जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या नियोजनानुसार हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अलिबाग समुद्रकिनारी 13 ऑगस्ट रोजी झालेल्या 5 किलोमीटर रेड रन स्पर्धेत 17 ते 25 वयोगटातील 41 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुलांमध्ये स्वागत समीर पाटील प्रथम, अक्षय राजा लेंडी द्वितीय तर मुलींमध्ये करिष्मा प्रकाश म्हात्रे प्रथम आणि मुग्धा नरेश पाटील द्वितीय ठरल्या. तृतीय क्रमांक अनुक्रमे यश दत्ताराम म्हात्रे व करिष्मा यशवंत हिरवे यांनी मिळविला. 14 ऑगस्ट रोजी झालेल्या एचआयव्ही/एड्स विषयावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत स्नेहा मुंडे प्रथम, वैष्णवी प्रमोद मोकल द्वितीय आणि रुचिता धारसे तृतीय ठरल्या. रेड रनमधील मुलांचे व मुलींचे प्रथम-द्वितीय क्रमांकाचे विजेते तसेच प्रश्नमंजुषेतील प्रथम क्रमांकाची स्नेहा मुंडे हे २३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे होणाऱ...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Image
    रायगड(जिमाका) दि.15:- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या 80 व्या वर्धापनदिनी ध्वजारोहण जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.रविंद्र शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नितीन वाघमारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) भारत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते ०००००

रायगडचा सर्वांगीण विकास ही आपली सामूहिक जबाबदारी -मंत्री भरत गोगावले स्वातंत्र्यदिनानिमित्त अलिबाग येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Image
  रायगड-अलिबाग,दि.15 (जिमाका): नागरिकांच्या आशा-आकांक्षांचा विचार करून विकासप्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग, योग्य नियोजन, उत्पन्नाच्या स्रोतांची वाढ आणि विविध विकास प्रकल्पांचा गतीने पाठपुरावा करून भविष्यातील 'विकसित रायगड जिल्हा' साकारणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.                   भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीत 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात मंत्री गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.               या सोहळ्यास आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आणि उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिक...

मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत ‘प्रोजेक्ट आशादीप’ जिल्ह्यात 100 हून अधिक विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन

    रायगड-अलिबाग,( जिमाका) दि.16 : मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त  जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरे अंतर्गत ‘प्रोजेक्ट आशादीप राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाभरात 100 हून अधिक विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावर 56, खाजगी संलग्नित रुग्णालयांमध्ये 20, पनवेल महानगरपालिका uhwc,uphc & hbt स्तरावर 28  तसेच विविध स्तरांवर इतर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, एकूण शिबिरांची संख्या 100 पेक्षा अधिक असणार आहे. आरोग्य शिबिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची सर्वंकष आरोग्य तपासणी, आवश्यक निदान व उपचार, आयुष्यमान वय वंदना कार्ड व आभा (ABHA) कार्ड नोंदणी, रक्तदान शिबिरे, लेप्टोस्पायरोसिसबाबत जनजागृती, दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विशेष महाआरोग्य शिबिरांचे ...

मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

    रायगड-अलिबाग,(जिमाका) दि.16: मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरे अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या "प्रोजेक्ट आशादीप" अभियानाला  जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 13 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमधून 867 लाभार्थ्यांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, पोयनाड येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, पंचायत समिती अलिबागच्या सभापती भाग्यता पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.पद्मश्री आंधळकर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिरात लाभार्थ्यांची रक्तदाब (BP), रक्त तपासणी (CBC), रक्तातील साखर (BSL), ईसीजी (ECG), नेत्र तपासणी, आयुष्मान कार्ड व आभा (ABHA) कार्ड नोंदणी करण्यात आली. तसेच आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एएनसी (ANC) क्लिनिकचे आयोजन करण्यात आले असून एका लाभार्थ्यास एचपीव्ही (HPV) लसीकरण करण्यात ...

खरीप हंगाम पिकस्पर्धेमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा

    रायगड-अलिबाग,दि.१६ (जिमाका):- खरीप हंगाम पिकस्पर्धेमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी केले आहे. या  स्पर्धेत समाविष्ट पिके भात, नाचणी (रागी) असून  पात्रता निकष  पुढीलप्रमाणे आहेत.  शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमिन असणे व ती तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.  शेतकऱ्याला एका वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकास स्वतःच्या शेतात भात पिकासाठी कमीत कमी 20 गुंठे व इतर पिकांसाठी 40 गुंठे (1) एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक. अर्ज करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र- अ), प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12 उतारा, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ अदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक / पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत. भात, नाचणी पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख  31 ऑगस्ट अशी आहे.  स्पर्धेसाठी शुल...

ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026 करिता इच्छुक उद्योजकांनी अर्ज सादर करावेत

    रायगड-अलिबाग, दि.१६(जिमाका): महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने "ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026 साठी नामांकने मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून विशेष करून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने ही पुरस्कार योजना सुरु केली आहे.  यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे पुरस्कार योजनेत प्रथम , व्दितीय व तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येतात व काही उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. संकल्पनेतुन उद्योगाच्या वृध्दीसाठी व उद्योगाला चालना व गती देण्यासाठी सन 2023 पासून राज्यस्तरीय "ग्रामोद्योग भरारी पुरस्कार" सुरु करून माध्यमातून प्रथम , व्दितीय व तृतीय , उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येत आहेत. मंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय घेवून यशस्वीपणे उद्योग उभारणी करून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध केलेल्या मंडळाच्या यशस्वी उद्योजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व त्यांचा यथोचित सन्मान व्हावा याकरिता दि.13 जुलै...