संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या जीवनदूतांचे कार्य अतुलनीय --पालकमंत्री भरतशेठ गोगावले
रायगड-अलिबाग, दि.07 (जिमाका):- अपघात, पूर, दरड कोसळणे, अतिवृष्टी तसेच अन्य आपत्तीच्या प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या ‘जीवनदूतां ’ चे कार्य अतुलीनीय आहे. त्यांच्या या धैर्याचा आणि सेवाभावाचा सन्मान करणे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले. रायगड पोलीस आयोजित ‘रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत जीवनदूत सन्मान सोहळा 2026 चे येथील आर.सी.एफ. सभागृह, कुरुळ येथे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री. गोगावले बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उप नगराध्यक्षा श्रीमती मानसी म्हात्रे, रिलायन्स ग्रुपचे शशांक गोयल आदी मान्यवर उपस्थित होते. ...