Posts

गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत करा; माणगाव व इंदापूर बायपासची कामे विहित मुदतीत पूर्ण करा--- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले टोलमाफीसाठी थेट दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना संपर्क

Image
    रायगड-अलिबाग,दि.3(जिमाका): गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, वाहतुकीची कोंडी होणार नाही तसेच गणेशभक्त व सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात,असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.         नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. तसेच गणेशोत्सव काळात या ठिकाणच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित देखरेख ठेवून त्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.      गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांबाबतचा आढावा घेण्यासाठी महाड येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री श्री. भोसले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.          या...

ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी ज्ञान, तंत्रज्ञान व एआयचा वापर करा विद्यार्थ्यांनो केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे, नवनिर्मिती करणारे आणि समस्या सोडवणारे बना –राज्यपाल जिष्णुदेव वर्मा

Image
  ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी ज्ञान, तंत्रज्ञान व एआयचा वापर करा   विद्यार्थ्यांनो केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे, नवनिर्मिती करणारे आणि समस्या सोडवणारे बना   –राज्यपाल जिष्णुदेव वर्मा   रायगड-अलिबाग,दि.३(जिमाका): भारताचा विकसित राष्ट्राचा प्रवास महानगरांपुरता मर्यादित राहणार नसून तो गावांमध्ये, लहान शहरांमध्ये आणि विद्यापीठांमध्येही घडणार आहे. त्यामुळे पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधी शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे, नवनिर्मिती करणारे आणि समाजाच्या समस्या सोडविणारे अभियंते बनावे. शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण उपजीविकेतील प्रत्यक्ष समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी ज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केले.     लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या 28 व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल श्री. वर्मा बोलत होते.     यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रोजगार हमी योजना म...

अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी किशन जावळे प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; नावांबाबत हरकती व दावे असल्यास सादर करावेत

Image
    रायगड-अलिबाग,(जिमाका)दि.01:- विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR 2026) प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रारुप मतदार यादी तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नितीन वाघमारे उपस्थित होते. मा.भारत निवडणूक आयोग यांच्याकडील निर्देशानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघात दिनांक 01 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाच्या सुधारीत वेळापत्रकानुसार सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत अंमलबजावणी पार पाडण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :-मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण/पुनर्रचना, सुधारीत वेळापत्रक, दि.24 ऑगस्ट 2026, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी सुधारीत वेळापत्रक, दि.31 ऑगस्ट 2026, दावे व हरकती दाखल करण्याचा कालाव...

धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी

  रायगड-अलिबाग,(जिमाका)दि.31:- दि.01 सप्टेंबर ते दि.15 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदत असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक बाबींची वेळेत पूर्तता करुन आपली ऑनलाईन नोंदणी धान खरेदी केंद्रावर करुन घ्यावी व किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र.जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.रविंद्र शेळके यांनी केले आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये, म्हणून ही योजना राबविण्यात येते.  हंगाम 2016-2017 पासून विकेंद्रीत खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आधारभूत किंमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना लाभ मिळावा या हेतूने राज्यात धान/भरडधान्य खरेदी केंद्र सुरु केली आहेत. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शासनाकडे धान्य विक्री करु इच्छीणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतक-यांनी आपले धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यापूर्वी धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंद...

अलिबाग येथे दि.07 सप्टेंबर रोजी डाक अदालतीचे आयेाजन

  रायगड-अलिबाग,(जिमाका)दि.31:- अधीक्षक डाकघर, रायगड विभाग यांच्या कार्यालयामार्फत दि.07 सप्टेंबर 2026 रोजी, दुपारी ठीक दुपारी 03.00 वा.डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतींमध्ये, अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांच्याकडे दि.03 सप्टेंबर 2026 पर्यंत पोहोचेल अशा रीतीने पाठवावी,असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग राजेश रनाळकर यांनी केले आहे. रायगड विभागातील डाक सेवेसंबंधित ज्या तक्रारी/समस्या 6 आठवड्यांच्या कालावधीत निकाली काढण्यात आलेल्या नाहीत, अशा टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर इत्यादी सेवांशी संबंधित तक्रारींचा डाक अदालतीमध्ये विचार करण्यात येईल. तक्रारीमध्ये सविस्तर माहिती जसे की तक्रारीचा दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. विशेष नोंदः त्रैमासिक होणारी डाक अदालत आता दरमहा होणार आहे. दि. 07 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणारी डाक अदालत ही या उपक्रमाची प्रथम डाक अदालत असेल. त्यानंतर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी 03.00 वाजता डाक अदा...

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचे आयोजन

    रायगड-अलिबाग,(जिमाका)दि.31:- समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत  न्याय आणि हक्क पोहोचवणे  हे क्रांतीसूर्य  महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचे मूळ सूत्र होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले काम अमिट आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे जलद गतीने व तडजोडीने निपटारा करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार दि.1 सप्टेंबर 2026 ते दि 31  मार्च 2027 या कालावधीत महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग यांच्याकडील 13 ऑगस्ट 2026  चे शासन निर्णयानुसार राज्यात महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनींशी संबंधित महसूली दावे मोठया प्रमाणावर दाखल होतात. प्रकरणांमध्ये एका स्तरावर निकाल लागल्यानंतर असंतुष्ट पक्षकार ...

जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर हा महत्वपूर्ण उपक्रम—पालकमंत्री भरतशेठ गोगावले

Image
  रायगड-अलिबाग(जिमाका)दि.21:- शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" ( Maha Walkathon-Walk for Water) या महत्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून "पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा" हा जलसंधारणाचा संदेश नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, शेतकरी व विविध सामाजिक घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी या अभियानामध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी  आज येथे केले.  अलिबाग बीच येथे जिल्हा प्रशासन व जलसंधारण विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय महा वॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर आयोजित कार्यक्रमात ते  बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील आदि उपस्थित होत...