Posts

मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत ‘प्रोजेक्ट आशादीप’ जिल्ह्यात 100 हून अधिक विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन

    रायगड-अलिबाग,( जिमाका) दि.16 : मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त  जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरे अंतर्गत ‘प्रोजेक्ट आशादीप राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाभरात 100 हून अधिक विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावर 56, खाजगी संलग्नित रुग्णालयांमध्ये 20, पनवेल महानगरपालिका uhwc,uphc & hbt स्तरावर 28  तसेच विविध स्तरांवर इतर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, एकूण शिबिरांची संख्या 100 पेक्षा अधिक असणार आहे. आरोग्य शिबिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची सर्वंकष आरोग्य तपासणी, आवश्यक निदान व उपचार, आयुष्यमान वय वंदना कार्ड व आभा (ABHA) कार्ड नोंदणी, रक्तदान शिबिरे, लेप्टोस्पायरोसिसबाबत जनजागृती, दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विशेष महाआरोग्य शिबिरांचे ...

मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

    रायगड-अलिबाग,(जिमाका) दि.16: मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरे अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या "प्रोजेक्ट आशादीप" अभियानाला  जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 13 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमधून 867 लाभार्थ्यांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, पोयनाड येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, पंचायत समिती अलिबागच्या सभापती भाग्यता पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.पद्मश्री आंधळकर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिरात लाभार्थ्यांची रक्तदाब (BP), रक्त तपासणी (CBC), रक्तातील साखर (BSL), ईसीजी (ECG), नेत्र तपासणी, आयुष्मान कार्ड व आभा (ABHA) कार्ड नोंदणी करण्यात आली. तसेच आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एएनसी (ANC) क्लिनिकचे आयोजन करण्यात आले असून एका लाभार्थ्यास एचपीव्ही (HPV) लसीकरण करण्यात ...

खरीप हंगाम पिकस्पर्धेमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा

    रायगड-अलिबाग,दि.१६ (जिमाका):- खरीप हंगाम पिकस्पर्धेमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी केले आहे. या  स्पर्धेत समाविष्ट पिके भात, नाचणी (रागी) असून  पात्रता निकष  पुढीलप्रमाणे आहेत.  शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमिन असणे व ती तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.  शेतकऱ्याला एका वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकास स्वतःच्या शेतात भात पिकासाठी कमीत कमी 20 गुंठे व इतर पिकांसाठी 40 गुंठे (1) एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक. अर्ज करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र- अ), प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12 उतारा, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ अदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक / पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत. भात, नाचणी पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख  31 ऑगस्ट अशी आहे.  स्पर्धेसाठी शुल...

ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026 करिता इच्छुक उद्योजकांनी अर्ज सादर करावेत

    रायगड-अलिबाग, दि.१६(जिमाका): महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने "ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026 साठी नामांकने मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून विशेष करून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने ही पुरस्कार योजना सुरु केली आहे.  यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे पुरस्कार योजनेत प्रथम , व्दितीय व तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येतात व काही उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. संकल्पनेतुन उद्योगाच्या वृध्दीसाठी व उद्योगाला चालना व गती देण्यासाठी सन 2023 पासून राज्यस्तरीय "ग्रामोद्योग भरारी पुरस्कार" सुरु करून माध्यमातून प्रथम , व्दितीय व तृतीय , उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येत आहेत. मंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय घेवून यशस्वीपणे उद्योग उभारणी करून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध केलेल्या मंडळाच्या यशस्वी उद्योजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व त्यांचा यथोचित सन्मान व्हावा याकरिता दि.13 जुलै...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

    रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका): रायगड जिल्ह्यातील मांग समाजातील मांग, मातंग, मिनी मादिगा, मादगी, दानखणी मांग, मांग महाराशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 22 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेले व सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी 60 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती" करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्तापूर्वक उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, मार्कशीट, 2 फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादींसह दोन प्रतीत आपले पूर्ण पत्त्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), केमेज हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड, हॉटेल मीरा माधव, ऑफिस क्र. 208, पहिला मजला, अलिबाग डेपोच्या समोर, पोस्ट-अलिबाग, ता.अलिबाग येथे दि. 27 ज...

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

  रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका): शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ व महामंडळाच्या इतर 13 उपकंपन्यामार्फत लघुउद्योग व व्यवसायाकरीता इतर मागासप्रवर्गातील गरजू व होतकरु व्यक्तींना कर्ज पुरवठा केला जातो. त्या अनुषंगाने सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरीता विविध योजनांचे रायगड जिल्ह्याकरीता भौतिक व आर्थिक उदिष्ट प्राप्त झाले आहे. या ऑनलाईन योजनांमध्ये 20 टक्के बीज भांडवल योजना व 1.00 लक्षपर्यंत थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा व महिला स्वयंसिध्दी कर्ज व्याज परतावा योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे. रु.1.00 लक्ष थेट कर्ज योजनेकरिता अर्जदाराचा सिबिल क्रेडीट स्कोर हा किमान 500 असणे बंधनकारक आहे. सर्व ऑनलाईन योजनांसाठी सर्वप्रथम महामंडळांच्या www.msobcfdc.org ,  या वेबसाईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करुन घ्यावी. अर्जदाराने स्वतःच्या जातप्रमाणपत्रातील नमूद जातीनुसार लागू असलेले महामंडळाच्या उपकंपनीमध्ये जाऊन आवश्यक ती योजना निवडावी. तद्नंतर अर्जदाराने महामंडळाच्या नियमानुसार आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या PDF सुस्पष्...

जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्ज सादर करावेत

    रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका): सामाजिक न्याय विभागातंर्गत तृतीयपंथी नागरिकांना शासन निर्णय दि.13 मार्च 2026 उद्योगासाठी बीजभांडवल कर्ज योजना मंजूर करण्यात आली आहे. एकूण 21 योजनांना लघु, मध्यम व दिर्घ कर्जाच्या योजनेकरीता कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच 12 व्यवसायांकरिता आवश्यक साधने संच (tool kit) करिता कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त, समाज कल्याण  सुनिल जाधव यांनी दिली आहे. योजनेचे निकष, अटी शर्ती व लाभाचे स्वरूप :-अर्जदार महाराष्ट्र राज्याचा किमान 10 वर्ष रहिवासी असावा. तृतीयपंथी ओळख प्रमाणपत्र आवश्यक आहे. लाभार्थी हा 18 ते 50 वर्ष वयोगटातील व्यवसाय करण्यास सक्षम असावा.या योजनेत लघु कर्ज (रु. 25,000/-) मध्यम कर्ज (रु 50,000/-) व दिर्घ कर्जासाठी (रु.,2,00,000/-) एक कर्ज अनुज्ञेय राहील. या योजनेत स्वंयहिस्सा 5 टक्के, शासन अनुदान 45 टक्के व राष्ट्रीयीकृत बँकेकडून 50 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. लाभार्थ्यांना व्यवसाय परवाना, व्यवसायासाठी लागणाऱ्या यंत्र सामुग्रीचे कोटेशन, जागेचा पुरावा (7/12 किंवा भाडेकरार पत्र) व्यवसायासाठी स्थानिक...