Posts

महाडमध्ये साहित्याचा जागर दोन दिवसीय रायगड जिल्हा ग्रंथोत्सव 2026 उत्साहात संपन्न होणार

    रायगड-अलिबाग,दि.09 (जिमाका):  ग्रंथसंस्कृतीचा वारसा जपणे आणि वाचन चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवणे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या वतीने 'ग्रंथोत्सव 2026' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.         भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे गुरुवार, दि.12 आणि शुक्रवार, दि.13 मार्च 2026 रोजी हा ज्ञानोत्सव रंगणार आहे.      ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी, गुरुवार दि. 12 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता भव्य ग्रंथदिंडी निघणार आहे. महाडचे नगराध्यक्ष सुनिल कविस्कर, उपविभागीय अधिकारी पोपटराव ओमासे आणि उपनगराध्यक्ष संदिप जाधव यांच्या शुभहस्ते या दिंडीचे उद्घाटन होईल. यावेळी ग्रंथालय संचालक  अशोक गाडेकर, सहायक ग्रंथालय संचालक प्रशांत व. पाटील, पोलीस उपअधीक्षक शंकरराव भा. काळे, श्रीमती शोभाताई सावंत, श्रीमती सीमाताई मपारा,  गंगाधर साळवी आणि प्रकाश जमदाडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल.    ...

अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ अभिनव संकल्पनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे खोपोली येथे आयोजन

  रायगड-अलिबाग,दि.04(जिमाका ) :-   महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अशा जाती-जमातींना, ज्यांना स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत कोणताही थेट लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी ‘अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ’ या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ कार्यक्रम दि. 06 मार्च ते दि.08 मार्च 2026 दरम्यान खोपोली येथील लोहाना समाज हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. या बाजारपेठेमुळे स्थानिक लघु उद्योजक, लक्षित गट, स्वयंरोजगार करणारे युवक-युवती, कारागीर व उत्पादक यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी, स्वतःची उत्पादने विक्रीस ठेवण्याचे व्यासपीठ आणि स्वदेशी उद्योगांना चालना मिळणारआहे.‘अमृतपेठ ’ही केवळ बाजारपेठ नसून रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास आणि आर्थिक स्वावलंबनाचा सेतू ठरणार आहे.या उपक्रमाचे नेतृत्व युवा उद्योजक संजय तन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, स्थानिक उद्योजक व व्यवसायिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केलेआहे.   बाजारपेठेत स्टॉल सहभाग,नोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी शैलेश मराठे 9112228759, अमित कुलकर्णी 9545...

काढणीपश्चात प्रक्रिया युनिट घटकाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावेत

    रायगड-अलिबाग,दि.04(जिमाका ) :-  देशाला कडधान्यामध्ये स्वयंपूर्ण बनविण्याकरिता व आयातीवरील अवलंबित्वता कमी करण्याच्या उद्देशाने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.11 ऑक्टोबर, 2025 रोजी सन 2025-26 ते सन 2030-31 पर्यंत  “ कडधान्य आत्मनिर्भरता अभियान ”   कार्यक्रमाची राबविण्याची घोषणा केली आहे. या अनुषंगाने शेतकरी बांधवानी काढणीपश्चात प्रक्रिया युनिट ( Processing Unit)  घटकाचा लाभ घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. राज्यात  हे  अभियान रब्बी हंगाम सन 2025-26  पासून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तूर ,  उडीद व मसूर या प्रमुख कडधान्य पिकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनास चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने   कडधान्य आत्मनिर्भरता अभियान   अंतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी   काढणीपश्चात प्रक्रिया युनिट  ( Processing Unit)   स्थापन करण्यास सन 2026-27 या वर्षात आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. या घटकासाठी वैयक्ति...

श्री गुरु तेग बहादूर ३५० वा शहीदी समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांची अलोट गर्दी ‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’च्या जयघोषात भाविकांनी घेतले पावन दर्शन

    नवी मुंबई, दि. ०१ :    “ हिंद-दी-चादर ”  अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही लाखो भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. “ वाहे गुरु ”  व  “ बोले सो निहाल सत श्री अकाल ”  च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले जात आहे. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. अखंड कीर्तन, गुरुवाणी आणि प्रार्थनेमुळे वातावरण अधिकच आध्यात्मिक झाले होते. लंगर व सोयी-सुविधांची उत्तम व्यवस्था भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. प्रशासन, स्वयंसेवक आणि विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने कार्यक्रम सुरळीत सुरू आहे. देशातील विविध राज्यातून आलेल्या सर्व धर्माच्या भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत.             भाविकांसाठी भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली असून लाखो भाविक त्याचा लाभ...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत

  रायगड-अलिबाग,दि.26(जिमाका ) :- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 साठी प्रवेशिका मागविण्यात येत आहे. प्रवेशिका जिल्हा माहिती कार्यालयात सादर करण्याची अंतिम मुदत 15 मार्च 2026 असून जास्तीत पत्रकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.             राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी, वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, समाज माध्यम पुरस्कार. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. 2025 या कॅलेंडर वर्षाकरीता दि.01 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 पर्यतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख 15 मार्च, 2026 अशी राहील. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2025 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने यासोबत पाठविण्यात येत आहेत. तसेच सदर माहिती शासनाच्या  www.maharashtra.gov.in , आणि महासंचालनालयाच्या  dgipr.maharashtra.gov.in , य...

विविध कृषी पुरस्कारांकरीता इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गटांनी ऑनलाईन अर्ज करावेत

                   रायगड-अलिबाग,दि.26(जिमाका ) :- डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न ,  वसंतराव नाईक कृषिभूषण ,  जिजामाता कृषिभूषण ,  वसंतराव नाईक शेतीमित्र ,  वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी ,  उद्यानपंडित पुरस्कार ,  कृषिभूषण (सेंद्रिय शेती) ,  युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्काराकरिता इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांनी सन-२०२५ पासूनचे विविध कृषी पुरस्काराकरिता संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करावेत ,  असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी ,  महिला ,  व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. हे पुरस्कार मा.र...

जिल्ह्यामध्ये दि.14 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

  रायगड-अलिबाग,दि.26(जिमाका ) :-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि.14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून या  राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग राजेंद्र द. सावंत यांनी केले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलवित प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, विजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. लोकअदालतीचे फायदे...