हाराष्ट्र आणि देशाच्या उभारणीत कामगारांचे मोलाचे योगदान - महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात संपन्न
म रायगड-अलिबाग(जिमाका) दि.1:- उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून शेतकरी , मजूर , औद्योगिक कामगार , बांधकाम क्षेत्रातील कामगार तसेच विविध सेवा क्षेत्रातील कष्टकरी बांधव यांच्या परिश्रमामुळेच विकासाची गती कायम राहत असून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीत कामगारांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती वरदा सुनील तटकरे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे,...