Posts

शिवराज्याभिषेक सोहळा-2026 करिता जड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी

      रायगड-अलिबाग,दि.02(जिमाका):- श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून दि.05 जून रोजी सायं.4.00 ते दि.06 जून 2026 रोजी रात्रौ 10.00 वाजेपर्यतच्या कालावधीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा नागोठणे ते कशेडी पर्यत तसेच  माणगांव-निजामपुर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावरील होणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतुक बंदी अधिसूचना जारी केली आहे. श्री शिवराज्याभिषेक सोहळा-2026 हा कार्यक्रम दि.05 जून  व दि.06 जून 2026 रोजी किल्ले रायगड येथे साजरा होणार आहॆ.  या कार्यक्रमासाठी  रायगड, पुणे, सातारा, कोल्हापुर, मुंबई वैगेरे ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने श्री शिवभक्त हे आपआपली वाहने घेवून येत असतात. तसेच या कार्यक्रमाकरीता आयोजकांच्या सामानाची वाहने देखील मोठ्या प्रमाणात श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येत असतात.  या सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त हे रायगड किल्ला येथे माणगांव-निजामपुर म...

1962 हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉट द्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

    रायगड-अलिबाग,दि.2(जिमाका):- गेल्या पाच वर्षांत , भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड , इंडसइंड बँक व पशुसंवर्धन विभाग , महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या 1962 या टोल-फ्री हेल्पलाइनने राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे जाळे बळकट केले आहे. ' मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स ' म्हणजेच फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांच्या माध्यमातून या उपक्रमाने विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या दारात पशुवैद्यकीय आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत 8 लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले असून , यामुळे पशुधनाची वेळेवर , सुलभ व विश्वासार्ह काळजी घेणे शक्य झाले आहे. या उपक्रमाच्या यशानंतर , भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड (इंडसइंड बँक) व पशुसंवर्धन विभाग , महाराष्ट्र शासन यांनी सेवा अधिक गतिमान करण्यासाठी ' व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा ' सुरू केली आहे. या डिजिटल उपक्रमाचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सेवा मिळवणे सोपे करणे , संवाद सुलभ करणे व रिअल-टाइम (तात्काळ) पशुवैद्यकीय साहाय्य प्रदान करणे हा आहे. व्हॉट्सॲप चॅटबॉट ...

अमृत संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन

    रायगड-अलिबाग, दि.2(जिमाका):- अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या "अमृत पर्यटन" उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम ( Entrepreneurship Development Programme - EDP ) आयोजित करण्यात आला आहे. अमृत पर्यटन हा महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी, स्थानिक रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी तसेच पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे राज्यातील पर्यटन स्थळे, पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादने व पर्यटन व्यवसायांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून, या क्षेत्रात व्यवसाय विस्तार, रोजगार निर्मिती व आर्थिक प्रगतीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ अधिकाधिक उद्योजकांना मिळावा आणि त्यांना आधुनिक व्यवसाय व्यवस्थापन कौशल्ये प्राप्त व्हावीत, या उद्देशाने या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे...

महाराष्ट्रात मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरिक्षण मोहिम मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे

  रायगड-अलिबाग,दि.26(जिमाका) :-   भारतीय संविधानाच्या कलग 324 अन्वये प्राप्त अधिकारात भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) घेण्याबाबत दि.24 जून 2025 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशात नमूद केल्याप्रमाणे यापूर्वी देशामध्ये 1952-56, 1957, 1961, 1965-1966, 1983-84, 1987-89. 1992-1995, 2002-2004 यावर्षी विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाने देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. संविधानाच्या कलम 326 प्रमाणे मतदार यादीमध्ये मतदारांचे नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असणे तसेच वयाची 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. मागील 20 वर्षामध्ये विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आलेले नाही. दरवर्षी केवळ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण घेण्यात आलेले आहे. मागील 20 वर्षात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प...

1 जून ते 31 जुलै कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी

    रायगड-अलिबाग (जिमाका) दि.20: महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी दि.1 जून  ते 31 जुलै 2026 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) रायगड-अलिबाग संजय पाटील यांनी केले.     या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी करणारे मच्छिमार खालील कारवाईस पात्र होतील. सदर पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. सदर पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर- यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही.  समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका दि.1 जून 2026 पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच दि. 31 जुलै 2026 वा त्यापुर्वी सदर नौकांना समुद्रात मासेम...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना महाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला होणार सुरुवात

  रायगड-अलिबाग,दि.22(जिमाका): ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ देणारी व पशुपालन व्यवसायाला उद्योजकतेचे आधुनिकस्वरूप देणारी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनाअत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कटिबद्ध आहे. महाआयटीकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी सुविधा निर्माण करणे सुरु असून, हे काम पूर्ण होताच इच्छुक लाभार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ.किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी दिली आहे. राज्यातील पशुसंवर्धन व्यवसायाला नवीन दिशा देण्यासाठी व ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीनिर्माण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना देणारीही योजना राज्याच्या आर्थिक विकासात भरीव योगदान देणारी ठरणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील युवा वर्गासह शेतकरी व पशुपालकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर योजनेची अंमलबजावणी वेळेवर व पारदर्शकपणे व्हावी, यासाठी पशुसंवर्धन विभागानेसूक्ष्म नियोजन सुरू केले आहे.  महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज प्रक्रिय...

काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश "रोबोटिक बोयो" ची उपयुक्तता पुन्हा झाली अधोरेखित

Image
रायगड-अलिबाग,दि.22(जिमाका): ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काशीद बीचवर आलेल्या एका पुणेकर कुटुंबावर आज सकाळी काळाने झडप घातली होती. मात्र, पोलिसांच्या प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून, एका २० वर्षीय तरुणीला समुद्रात बुडताना अगदी ऐनवेळी सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण च्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या "रोबोटिक बोयो" ची उपयुक्तता या प्रसंगामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. या रिमोट ऑपरेटेड वॉटरक्राफ्टमुळे वीस वर्षीय तरुणीचा जीव वाचविण्यास प्रशासनाला यश मिळाले आहे.      आज सकाळी 7.40 वाजताच्या सुमारास, पुणे येथील रहिवासी असलेले आकाश साबळे आणि सिद्धी साबळे हे आपल्या कुटुंबासह काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. हे कुटुंब पोहण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने सिद्धी साबळे (वय 20 वर्षे) ही तरुणी अचानक समुद्राच्या खोल पाण्यात ओढली जाऊ लागली आणि बुडत असल्याचे लक्षात आले.  या कठीण प्रसंगी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई (बकल नंबर 1028) प्रविण रोटकर आणि पोल...