Posts

Showing posts from August 17, 2025

गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टनापेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या सर्व वाहनांना पूर्णत: बंदी

  रायगड(जिमाका)दि.21:- दि.27 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाचे अनुषंगाने गणेशभक्त कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई, व मुंबई येथून मोठ्या प्रमाणावर कोकण व गोवा या भागात जाण्याकरिता खाजगी व प्रवासी वाहनांचा वापर करतात. त्यामुळे या कालावधीत दोन्ही (पुणे व कोकणमार्गे) मार्गावर प्रचंड प्रमाणात बाहतुकीची वर्दळ वाढते. याकरिता गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी इ. वाहने) अशा वाहनाच्या वाहतुकीस पूर्णतः बंदी सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल निलेश धोटे यांनी लागू केली आहे. दि.23 ऑगस्ट 2025 रोजी 00.01 वाजेपासून ते दि.28 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 23.00 वाजेपर्यंत, दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 08.00 वाजेपासून ते रात्री 23.00 वाजेपर्यत आणि दि. 02 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 08.00 वाजेपासून ते रात्री 23.00 वाजेपर्यंत तसेच दि. 06 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 08.00 नंतर ते दि. 07 सप्टेंबर 2025 रोजी 20.00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाह...

पनवेल येथे उद्योग सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

    रायगड(जिमाका)दि.21:- आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे जिल्हा उद्योग केंद्र रायगड व लघु उद्योग भारती, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील सर्व उद्योजकांसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत शनिवार, दि.23 ऑगस्ट रोजी पनवेल येथे उद्योग सुसंवाद-2025 या कार्यक्रमाचे सकाळी 11.00 वा आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा, उद्योजक यांनी उपस्थितीत राहावे, असे आवाहन  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया यांनी केले आहे. या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षकअ आचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, नेहा भोसले आयुक्त, पनवेल महानगर पालिका, मंगेश चितळे व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया तसेच जिल्ह्यातील सुमारे 300-400 उद्योजक उपस्थितीत राहणार आहेत. शनिवार, दि.23 ऑगस्ट रोजी पनवेल औद्योगिक सहकारी वसाहत मर्या.पनवेल येथे "हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र" वृक्ष लागवड अभियानांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सकाळी 10.00 वा. आणि जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक  सकाळी 10:30 वा. होणार आहे...

आंतरराष्ट्रीय युवा दिन, सदभावना दिनानिमित्त बाईक रॅली कार्यक्रम संपन्न

Image
  रायगड (जिमाका)दि.20:- आंतरराष्ट्रीय युवा दिन  12 ऑगस्ट व  20 ऑगस्ट  सदभावना दिन या दोन्ही कार्यक्रमाचे औचित्य साधून युवकांमध्ये एच.आय.व्ही. एड्स विषयी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग  व   मेरा युवा भारत,अलिबाग-रायगड  यांच्या संयुक्त विद्यमाने  अलिबाग समुद्रकिनारा येथे आयोजित बाईक रॅली उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. अलिबाग समुद्र किनारा येथून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.

नवीन आधार केंदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

रायगड (जिमाका) दि.20:- रायगड जिल्ह्यातील नागरीकांचे नवीन आधार काढणे व आधार कार्ड वरील माहिती अद्ययावत करण्याकरीता जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत एकूण 74 आधार संच कार्यान्वित आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या व आधार केंद्रांची मागणी पाहता नवीन आधार केंद्रांची स्थापना करण्याची आवश्यकता आहे.  जिल्ह्यामध्ये नव्याने 99 आधार केंद्रांची स्थापना करण्याकरीता 15 तालुक्यांमध्ये नवीन आधार केंद्र सुरु करण्यासाठी इच्छुक पात्र असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  https://raigad.gov.in  या संकेतस्थळावर अर्जाचा नमूना, पात्रतेचे निकष ही माहिती उपलब्ध आहे. इच्छुकांनी विहीत कागदपत्रासह आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील नोंदणी शाखा मध्ये समक्ष दि. 21 ऑगस्ट ते दि. 08 सप्टेंबर  या कालावधीमध्ये सायंकाळी 06.15 वाजेपर्यंत जमा करावेत. प्राप्त आधार सेवा केंद्रांच्या मागणी अर्जाची छानणी दि.09 ते दि.16 सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. प्राप्त आधार केंद्रांच्या मागणी अर्जावर जिल्हास्तरीय कार्यवाही दि.17 ते दि.25 सप्टेंबर दरम्यान करण्यात ये...

अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता यंत्रणांनी अधिक अलर्ट रहावे- जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
      रायगड (जिमाका)दि.19:-  भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दरडप्रवण अन पूरप्रवण गावांवर जिल्हा प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तसेच सर्व यंत्रणेला सुसज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रशासनाच्या तयारीचा, उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील नदयाची पातळी इशारास्तरापर्यंत आहे. या नद्यांजवळच्या गावातील प्रशासनाने घेतलेली खबरदारी, पर्यायी व्यवस्था, यंत्रणेची सुसज्जता याची माहिती घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील पाऊस, संभाव्य अतिवृष्टी, पूरस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, जिल्हा प्रशासन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. तहसीलदारांना आवश्यक त्या साधन, सुविधा सज्ज  असतील याची खात्री करण...