Posts

Showing posts from May 10, 2026

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना

  रायगड-अलिबाग, दि.13 (जिमाका): राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) तसेच हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यक्रम (NPCCHH) यांच्या सूचनांनुसार नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेचा परिणाम कमी करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य, पंचायत, शिक्षण, कामगार, परिवहन, कृषी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, महिला व बालविकास, MIDC तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी सावली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ORS सुविधा, शीतपेय केंद्रे, प्रथमोपचार किट, तसेच जनजागृती फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य व...

जनगणना-2027 अंतर्गत स्व-गणना सुविधेचा लाभ घ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन

    रायगड-अलिबाग, दि.13 (जिमाका) : भारताची जनगणना-2027 ही प्रथमच डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असून नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. भारत सरकारच्या जनगणना संचालनालयामार्फत जनगणना-2027 अंतर्गत घरगुती व घरगणना टप्प्याचे क्षेत्रीय कार्य दि. 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत पार पडणार आहे. यंदाची जनगणना ही पूर्णतः डिजिटल स्वरूपात होत असून नागरिकांना  https://se.census.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन स्व-गणना करता येणार आहे. स्व-गणना प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याने सर्व शासकीय कार्यालये तसेच अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांनी या मोहिमेचा प्रसार करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना स्व-गणनेबाबत मार्गदर्शन करावे तसेच कार्यालयीन संकेतस्थळ, सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप समूह आदी माध्यमांतून जनजागृती करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. जन...

ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्पामुळे पर्यटन व मत्स्यव्यवसायाला चालना -- मत्स्यव्यवसाय,बंदरे मंत्री नितेश राणे

Image
  रायगड-अलिबाग,दि.13 (जिमाका): जंजिरा किल्ला हा राज्याच्या पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधा वाढीसाठी जंजिरा किल्ला परिसरात उभारण्यात येणारा ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले.       मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला येथे महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘जंजिरा किल्ला ब्रेकवॉटर व प्रवासी जेटी बांधकाम’ प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी खासदार सुनील तटकरे अध्यक्षस्थानी होते. तसेच मुरुड-जंजिरा नगराध्यक्षा आराधना दांडेकर, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, तहसिलदार आदेश डफळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.      मंत्री श्री.राणे म्हणाले की, सुमारे तीन किलोमीटर परिसरात लाटरोधक भिंत उभारण्यात येत असून या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित व सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध होण...