राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2020 साठी प्रवेशिका 28 फेब्रुवारी पर्यंत स्विकारणार
अलिबाग,जि.रायगड,दि.17 (जिमाका) :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता,
उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज
माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा
जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2020 ते 31 डिसेंबर,
2020 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या
प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा
महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले होते. यासाठी मागविण्यात येणाऱ्या
प्रवेशिका स्विकारण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.
राज्यातील विविध
भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई
उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा
राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज
प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशिका दि.15 फेब्रुवारी
ऐवजी दि.28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत स्विकारण्यात
येतील.
000000
Comments
Post a Comment