ओखी चक्रीवादळः जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा





अलिबाग,जि. रायगड, दि.2,(जिमाका)- प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या 2 डिसेंबर रोजीच्या पूर्वसूचनेनुसार पुढील 72 तासांमध्ये ओखी चक्रीवादळामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस (अतिवृष्टी) पडण्याची व समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार असल्याची पूर्वसूचना दिली आहे.
त्यामुळे मासेमारीसाठी खोल समुद्रात मच्छिमार गेले असल्यास त्यांना तात्काळ समुद्र किनाऱ्यावर परतण्याचा इशारा देण्यात येत आहे. तसेच चक्रीवादळाचा धोका कमी होईपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा तसेच किनाऱ्यावरील गावांमधील नागरीकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
पूर्वसूचना लक्षात घेवून आपल्या विभागाकडून च्रकीवादळामुळे व अतिवृष्टीमुळे जिवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या प्रमाणात उपाय योजना कराव्यात. तसेच अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी आपल्या विभागाकडील बचाव पथक, बचाव साहित्य, रुग्णवाहिका इत्यादी अत्यंत आवश्यक सुविधा तत्पर ठेवण्यात याव्यात. चक्रीवादळामुळे झाडे पडून वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता विचारात घेवून पूर्वतयारी करण्यात यावी. नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. कार्यवाहीचा व घडलेल्या घटनांचा अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141-222118/222097/223222 कळविण्यात यावा, असे जिल्हा आपत्कालीन  कार्यकेंद्राच्या वतीने कळविण्यात आले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज