अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा -पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांचे प्रशासनाला आदेश




अलिबाग,दि.30 (जिमाका)- जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रोहा,खालापूर, खोपोली, कर्जत यासह अनेक तालुक्यात काल (दि.29रोजी)  झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बऱ्याच ठिकाणी भात, आंबा, काजू, सुपारी बाग आदी पिकांसंबंधी नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश जिल्हयाच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
               करोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने जगात आधीच मोठे संकट उभे राहिले आहे. त्यात काल (दि.29 रोजी) रायगड जिल्ह्यात देखील काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतपिकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.     
               कोकणातील भात, आंबा, काजू, सुपारी बाग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडून घरांची पडझड झाली आहे.
              या सर्वांची नुकसान भरपाई लवकर मिळवून देण्यासाठी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज