चक्रीवादळात जीवितहानी झालेल्या आपदग्रस्तांच्या वारसांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द




अलिबाग,जि.रायगड, दि. 11 (जिमाका) :-  जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. 
या चक्रीवादळात जीवितहानी झालेल्या आपद्ग्रस्तांच्या वारसांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते काल (दि.10 जून रोजी) धनादेश सुपूर्द करण्यात आले.  माणगाव तालुक्यातील मांजरोणी येथील भाटेची वाडीतील मयत सुरेश बाळकृष्ण काते, वय वर्षे 25 यांच्या वारसांना, उणेगाव, ता.माणगाव येथील मयत निलम नथुराम सत्वे, वय वर्षे 41 यांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचे धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार भरतशेठ गोगावले, सुभाष केकाणे, माणगाव प्रांताधिकारी प्रशाली  जाधव-दिघावकर उपस्थित होते.
 0000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज