म.रा.मा.प. महामंडळाकडून आंतर जिल्हा प्रवासासाठी प्रासंगिक करारावर बसेस देण्याचे निश्चित



अलिबाग,जि.रायगड, दि. 11 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आंतर जिल्हा प्रवासासाठी सोशल डिस्टंन्सिंग व काही अटी शर्तींच्या अधीन राहून प्रासंगिक करारावर बसेस देण्याचे निश्चित केले आहे. 
             राज्य परिवहन रायगड विभागातील आगारांमधून पुणे, मुंबई, बोरीवली, ठाणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर व अन्य आंतरजिल्हा प्रवास करावयाचा असल्यास नजिकच्या आगारामार्फत प्रासंगिक कराराच्या दरात 22 प्रवासी उपलब्ध झाल्यास बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
            तरी गरजूंनी राज्य परिवहन महामंडळाच्या या सेवेचा लाभ घ्यावा. प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे आंतरजिल्हा प्रवासाचा पास व आधारकार्ड असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी नजिकच्या आगारातील आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विभाग नियंत्रक रा.प. रायगड विभाग अनघा बारटक्के यांच्याकडून करण्यात आले आहे. 
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज