अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त मात्र पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांनी गुगल लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज भरावेत

 

अलिबाग, जि.रायगड, दि.22(जिमाका) :- ऑक्टोबर 2020 मध्ये रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. पिकांच्या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.  

       अदयापही शासकीय यंत्रणा पंचनामा करण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचली नसेल, तर संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी  https://docs.google.com/forms/d/1W944r3a8eXfK_H8V8zEiOhl7vLDHr8I4pvqLm93BJL0/edit  या गुगल लिंकवर नुकसानीचा अर्ज भरावा, तसेच ज्यांचे नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, त्यांनीच हा अर्ज भरावा, याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.  

000000

 

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत