Posts

जवाहर नवोदय विद्यालयासाठी इयत्ता 11 वी च्या रिक्त जागांसाठी प्रवेश परीक्षा

  अलिबाग,दि.15(जिमाका) :-  जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, रायगड येथे शैक्षणिक वर्ष 2023- 24 मध्ये इयत्ता 11 वी च्या रिक्त जागांच्या प्रवेशाकरिता निवड चाचणी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेश अर्ज दि.11 मे 2023 पासून भरण्यास सुरुवात झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच या निवड परीक्षेत बसण्याची संधी मिळेल. ही निवड चाचणी करिता ऑनलाईन प्रवेश अर्ज  https://navodaya.gov.in  या संकेतस्थळावर नि:शुल्क उपलब्ध आहेत. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 मे 2023 आहे, अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचेचे प्राचार्य के. वाय. इंगळे यांनी दिली आहे. 0000000

रायगड जवाहर नवोदय विद्यालयाचे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

    अलिबाग,दि.15(जिमाका) :-    केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (C.B.S.E.) यांनी दि.12 मे 2023 रोजी घोषित केलेल्या इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी (विज्ञान शाखा) या दोन्ही वर्गाच्या निकालात जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, रायगड यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, रायगड चे एकूण 76 विद्यार्थी इयत्ता दहावी तर 34 विद्यार्थी इयत्ता बारावी परीक्षेकरिता बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले असून दोन्ही इयत्तांचा निकाल 100 टक्के लागला आहे. इयत्ता 10 वीत प्रथम क्रमांक साक्षी अनिल कराड (93.40 टक्के) आणि प्रणेश पांडुरंग मोरे (93.40 टक्के), द्वितीय क्रमांक सिद्धार्थ सचिन घरात (93.20 टक्के) आणि दीप्ती सिंग (93.20 टक्के) तर तृतीय क्रमांक संचित सुभाष कासारे (93 टक्के) आणि श्रीजित श्रवणकुमार जैसवार (93 टक्के) यांनी प्राप्त केला आहे. इयत्ता 12 वीत प्रथम क्रमांक प्रियांशू दिनेश शुक्ला (85.20 टक्के), द्वितीय क्रमांक जयेश दीपक बाविस्कर (80.80 टक्के) तर तृतीय क्रमांक कार्तिक वरुण शर्मा (79.80 टक्के) यांनी प्रा...

कर्जत येथील रक्षा संस्थेच्या सदस्यांनी वाचवले तीन युवकांचे प्राण

Image
    अलिबाग,दि.15(जिमाका) :-  कर्जत परिसरातील ढाक बहिरी येथे जाण्यासाठी कल्याण येथील शशांक पाटील, वय 17, हर्षल घावटे, वय 17, मोहित नारखेडे रा.कल्याण हे तीन युवक कर्जत येथून सांडशी येथे पोहोचले. तिथून पुढे काही काळ पायवाटेवर त्यांनी मार्गक्रमण केले परंतु काही चढ चढून गेल्यानंतर त्यांना पायवाट सापडली नाही. त्यानंतर त्यांनी एका कातळ कड्यावर चढून वर जाण्याचा प्रयत्न केला व त्या ठिकाणी ते अडकले.  येथून त्यांना वरही चढून जाता येईना व खालीही उतरता येईना, अशा अवघड ठिकाणी ते अडकून पडले. याबद्दलची माहिती प्रसिद्ध गिर्यारोहक श्री.गणेश गिध यांना मिळाली. त्यांनी याबद्दलची माहिती कर्जत येथील रक्षा सामाजिक विकास मंडळाचे कार्यकर्ते श्री.अमित गुरव यांना दिली. या माहिती बरोबरच त्यांनी या युवकांचे लोकेशन व त्यांचे संपर्क क्रमांकही श्री.गुरव यांना दिले. हे युवक अडकल्याची माहिती मिळताच त्यांचे लोकेशन पाहून रेस्क्यू टीमच्या सदस्यांना तयार राहण्यास कळविले व थोड्याच वेळात श्री.सुमित गुरव, राहुल कोनेकर हे सांडशी येथे जाण्यासाठी रवाना झाले. बचाव पथकातील श्री.सुमित गुरव हे गिर्यारोहक असून रायगड...

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी -- पालकमंत्री ना.उदय सामंत

                                                 अलिबाग,दि.12(जिमाका) :-   शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बियाणे, पीककर्ज पुरवठा सुरळीत होईल, याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी त्याचबरोबर जिल्ह्यात भात वरी पिकांबरोबरच नाचणी, तूर पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले.              पालकमंत्री श्री.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक आज जिल्हा नियेाजन भवन येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे दूरदृष्यप्रणालीद्वारे तर जिल्हा नियोजन सभागृहात आमदार रविंद्र पाटील, आ...

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या अलिबाग येथील मुलांचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

    अलिबाग,दि.12 (जिमाका):  सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हे गौरीनंदन अपार्टमेंट, गणेशमंदीर शेजारी, विजय नगर, वरसोली- अलिबाग, जि. रायगड येथे कार्यरत आहे. या वसतिगृहाची मान्य संख्या 75 आहे. या वसतिगृहात इ.8  वी पासून प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे:- अनुसूचित जाती- 80 टक्के अनुसूचित जमाती- 03 टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमाती- 05 टक्के, आर्थिक मागास व इतर मागास वर्गातील दारिद्रयरेषेखालील कुटूंबातील विद्यार्थी 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग- 02 टक्के, अनाथ- 02 टक्के, अपंग- 03 टक्के. या वसतिगृहामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.वसतिगृहात विद्यार्थ्याकरिता मोफत निवासव्यवस्था आहे. वसतिगृहामध्ये नाष्टा व भोजनाची विनामूल्य व्यवस्था आहे.  नाश्ता :-  दररोज पोहे/ शिरा/उपीट इ. पैकी एक आलटून पालटून तसेच उकडलेली दोन अंडी, एक सफरचंद, आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध दररोज नाष्ट्यासाठी विनामूल्य देण्यात येते.   भोजन व्यवस्था :-  दुपार व सायंकाळी जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड, सलाड इ.सह आठवडयातून दोन वेळा म...

मराठा, कुणबी समाजासाठी काम करणाऱ्या "सारथी" संस्थेचे मुंबई विभागीय कार्यालय खारघर येथे सुरु

Image
  अलिबाग,दि.12 (जिमाका):-  राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. संस्थेच्या मुंबई विभागीय कार्यालयांतर्गत ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आहे. हे मुंबई विभागीय कार्यालय एमटीएनएल इमारत, रेनट्री मार्ग, सेक्टर 21, खारघर ता.पनवेल, जि.रायगड येथे सुरु करण्यात आले आहे.  या कार्यालयाचा ई-मेल आयडी  sarthikharghar@gmail.com , असून Website  https://sarthi-maharashtragiv. in/en , ही आहे.                रायगड जिल्ह्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील समाज बांधवांनी विभागीय कार्यालयास भेट द्यावी व सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन  मुंबई विभागीय कार्यालयाचे प्रमुख व सारथी संस्थेचे उपव्यवस्था...

महिला लोकशाही दिनात तक्रारी मांडण्याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांचे आवाहन

                 अलिबाग,दि.12 (जिमाका):-  महिलांचे प्रश्न तसेच समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर महिन्याच्या तिसऱ्या तर तालुका स्तरावर महिन्याच्या चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. या महिला लोकशाही दिनात तक्रारी मांडण्याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा परिविक्षा अधिकारी श्रीमती वाघमारे एस.एम. यांच्याशी 9834746068 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.विनीत म्हात्रे यांनी केले आहे.              सर्व स्तरातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा,या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणींची सोडवणूक करण्यासाठी व पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी महिला लोकशाही दिन राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुका पातळीवर राबविण्यात येतो.              जिल्हास्तराव...