राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा ---जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी
अलिबाग दि.10 (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 70 वा वर्धापनदिन 15 ऑगस्ट 2017 रोजी विविध
शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी संस्थामार्फत रायगड जिल्ह्यात साजरा
करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य
दिनानिमित्त ध्वजवंदन कार्यक्रम प्रसंगी लहान मुलांना कागदी तसेच प्लास्टिकचे
राष्ट्रध्वज देण्यात येतात. राष्ट्रध्वज
म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे
हे राष्ट्रध्वज वापरल्यानंतर ते कोठेही फेकून देण्यात येऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाचा सन्मान सर्वांनी राखावा याची नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment