मच्छिमारांसाठी खबरदारीचा इशारा
अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका)- अरबी समुद्रात
दक्षीण्पूर्व दिशेला कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो उत्तरेकडे अतिवेगाने वाटचाल
करीत आहे. त्यामुळे येत्या 24 तासात समुद्र खवळलेला असल्याने किनारपट्टीवरील मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा
इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. अशी
माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
०००००
Comments
Post a Comment