कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक-2018 :मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता घ्यावी-जिल्हाधिकारी यावलकर




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- कोकण विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी सोमवार दि.25 रोजी मतदान होणार असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक कर्मचारी व निवडणूक बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलीस यंत्रणेने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी आज येथे दिले.
 जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवडणूक यंत्रणेची कायदा व सुव्यवस्था व वाहतुक आराखड्याच्या नियोजनासाठी बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी यावलकर यांच्या सह उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रतिमा पुदलवाड,  नवी मुंबई पोलीस उपायुक्त राजकुमार चाफेकर, जिल्हा विशेष शाखेचे अविनाश पाटील, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
 दरम्यान आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकीसाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व केंद्राधिकाऱ्यांचे द्वितीय क्रमांकाचे प्रशिक्षण पार पडले. यावेळी निवडणूकीसाठी नियुक्त सुक्ष्म निरीक्षकही प्रशिक्षणास उपस्थित होते. कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतांना श्री. यावलकर यांनी निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर जारी करावयाचे प्रतिबंधात्मक आदेशांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेतला.
मतदान साहित्य व कर्मचारी वर्गाच्या जाण्याच्या व येण्याच्या वाहतुकीच्या  आराखड्याबाबत, वाहन व्यवस्था व  आवश्यक सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. रायगड जिल्ह्यात पनवेल येथील 9 मतदान केंद्रे ही नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील असल्याने तेथील व जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षेत्राच्या हद्दीतील उर्वरित सर्व मतदान केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
प्रत्येक मतदान केंद्रांवर महिला पोलीस कर्मचाऱ्यासह पुरेसे पोलीस बळ, मतदान केंद्रावर मोबाईल व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास बंदी असल्याने केंद्र परिसरात बंदोबस्त या तयारीचा आढावा त्यांनी घेतला.मतदान केंद्रावरील सुरक्षेबाबत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सुरक्षा सुचनांचे पालन संबंधित यंत्रणांनी करावे, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज