अनधिकृतरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई- जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी



 रायगड दि २६: निवडणूक यंत्रणेत जिल्हा प्रशासन गुंतले आहे असा समज करून अनधिकृतरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तहसीलदार , रेती गट तसेच पोलिसांनी या वाळू माफियांच्या हालचाली वर लक्ष ठेवावे व तातडीने कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिली.
यासंदर्भात आज प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तांकडे लक्ष वेधून ते म्हणाले कि, ई लिलावास फारसा प्रतिसाद मिळाला नाही परंतु हातपाटीद्वारे वाळू उपसा लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कुंडलिका नदी, रेवदंडा खाडी येथे बेकायदेशीररित्या रेती उपसा होत असेल तर तो लगेच थाब्विण्यात येईल आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असेही ते म्हणाले.
------------------

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज