पालकमंत्री आदिती तटकरेंनी जिल्हावासियांना दिल्या "राष्ट्रीय मतदार दिना" निमित्त शुभेच्छा

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका) :-  पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील जनतेला ‘राष्ट्रीय मतदार दिना’च्या शुभेच्छा दिल्या असून देशातील लोकशाही व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक  युवक-युवतीने मतदारयादीत नाव नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

    लोकशाही व्यवस्थेत मतदार हाच खरा राजा असून घटनेने त्याला दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा त्याने सदुपयोग करायला हवा. प्रत्येक मतदाराने  त्याला मिळालेल्या मतदानाच्या अधिकारात विवेक बुद्धीने मतदान करून चांगले लोकप्रतिनिधी निवडून देणे, ही काळाची गरज आहे. मात्र मतदानाचा हक्क बजाविण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने मतदारयादीत आपले नाव असल्याची खात्री करायला हवी. स्थानिक स्वराज संस्था, विधानसभा, लोकसभा अशा प्रत्येक निवडणुकीत आपण मतदानाचा हक्क बजाविणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्यच आहे, त्यामुळेच देशाची लोकशाही सुदृढ होणार असल्याचे सांगून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी प्रत्येक नागरिकाने मतदारयादीत आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी तसेच मतदारयादीत नाव नसल्यास  मतदारयादीत नाव समाविष्ट करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी,असे आवाहन केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज