प्रधानमंत्री किसान सन्मान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

 

अलिबाग,दि.16 (जिमाका):- रायगड जिल्ह्यामध्ये  1 लाख 74 हजार 216 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील लाभार्थी असून 1 लाख 34 हजार 289  शेतकऱ्यांनी आधारकार्ड जोडलेले आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार नुकत्याच जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या ई-केवायसी अद्ययावतीकरणानुसार आत्तापर्यंत एक लाख 16 हजार 540 (88.61%) लोकांनी ई-केवायसी अपडेट केले आहे.

ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड, ज्यामध्ये पीक लागवडीसाठी, पशुधन संगोपनासाठी, मच्छी पालनासाठी, बँकेकडून खेळते भांडवल मंजूर करण्यात येते, त्या शेतकऱ्यांनी आपले खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेत संबंधित कागदपत्रे जमा करून किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केली आहे.

यासाठी संबंधित कृषी विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत, बँका यांना आपापल्या क्षेत्रांमध्ये एकमेकांच्या संहयोगाने मेळावा घेऊन किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश माननीय जिल्हाधिकारी दिले आहेत. तरी संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज ग्रामपंचायत, कृषी विभाग, बँका यामध्ये जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज