भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करुन समता पर्वाचा समारोप कार्यक्रम संपन्न

 


 

 अलिबाग, दि.09(जिमाका):- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद रायगड येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी श्री.सुनील जाधव आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.नितिन मंडलिक यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करुन समारोप कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात सर्वप्रथम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारास अनुसरून शब्दसुमनांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करणारी गीते व पोवाडे सादर करण्यात आली.

तसेच कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या 7 शासकीय वसतिगृहे व 1 निवासी शाळा तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड कार्यालयांतर्गत अलिबाग, महाड, तळा, पनवेल, पाली-सुधागड वस्तीगृहे व माणगाव निवासी शाळा या ठिकाणी तसेच समतादूतांमार्फत खालापूर, आंबोली-मुरुड, पनवेल, पाली-सुधागड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाले असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव यांनी दिली आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज