Posts

माणगावात फिरता पशु वैद्यकीय दवाखान्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

Image
               अलिबाग, जि.रायगड, दि.25(जिमाका): महाराष्ट्र   शासन   व   पशूसंवर्धन   विभागाच्या   उपक्रमांतर्गत   मुख्यमंत्री   पशूसंवर्धन   योजनेतून   माणगाव   तालुक्यासाठी   फिरता   पशू   वैद्यकीय   दवाखाना   सुरु   करण्यात   आला   असून   याचा   उद्घाटन   आज गुरुवार,   दि.25   फेब्रुवारी   रोजी   माणगाव   प्रांत   कार्यालय   या ठिकाणी   पालकमंत्री   कु.आदिती   तटकरे   यांच्या हस्ते   संपन्न झाले. यावेळी   पालकमंत्री कु.आदिती   तटकरे   यांनी   फिरत्या   दवाखान्याच्या   रुग्णवाहिकेची   व   त्यातील   औषधांची   पाहणी   केली. या   उद्घाटन   प्रसंगी     जिल्हा परिषदेचे कृषी   सभापती   बबन   मनवे, माजी   उपनगराध्यक्ष   दिलीप   जाधव,   जिल्हा   पशु...

जिल्ह्यात दि.01 ते दि.26 मार्च 2021 या कालावधीत फिरते लोक अदालत व कायदे विषयक शिबिराचे आयोजन उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते होणार संपन्न

  अलिबाग,जि.रायगड,दि.25(जिमाका):- मा. उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या निर्देशानुसार सोमवार, दि. 01 मार्च ते दि.26 मार्च 2021 या कालावधीत जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदे विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या फिरते लोकअदालतीचा उद्घाटन समारंभ सोमवार, दि.01 मार्च 2021 रोजी सकाळी 10.30 वा. रायगड जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात रायगड-अलिबाग प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती विभा प्र.इंगळे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव संदिप वि.स्वामी यांनी कळविले आहे. ००००००

“दिलखुलास” कार्यक्रमात रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग-2 प्रसारित

  अलिबाग,जि.रायगड,दि.25(जिमाका):- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित “ दिलखुलास ” कार्यक्रमात “ करोनाशी सामना करताना ” या विषयावर रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या विशेष मुलाखतीचा भाग--2 आज (दि.25 फेब्रुवारी) रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एअर या ॲपवरून प्रसारित झाला. काल बुधवार, दि.24 फेब्रुवारी रोजी या मुलाखतीचा भाग पहिला प्रसारित झाला होता. त्यास श्रोत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.                या मुलाखतीचा भाग-3, उद्या शुक्रवार दि.26 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.25 वाजता प्रसारित होणार आहे.      प्रा.सुभाष कदम यांनी ही मुलाखत घेतली आहे.               रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून सुरू असलेल्या उपाययोजना, करोना काळात सरकारी आदेशांचे पालन, कंटेनमेन्ट झोन करताना उद्भवलेल्या अडचणी, करोना काळातील नवीन अनुभव अशा अनेक विषयांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी 'दिलखुलास' क...

राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी महाडमधील मौजे नाते येथील जागा हस्तांतरित

    अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :- सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय महाड यांनी राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना नाते, ता.महाड, जि.रायगड या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती. जिल्ह्याच्या पशूधन क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वाची असल्याने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मौजे नाते, ता.महाड, जि.रायगड येथील गट नं.955 एकूण क्षेत्र 1-34-00 हेक्टर आर. पैकी 0-05-00 हे.आर.ही जमीन ग्रामपंचायत नाते यांच्याकडून शासनाकडे पूर्नग्रहण करण्यात येऊन महसूल मुक्त व सारामाफीने पशुसंवर्धन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना नाते, ता.महाड, जि.रायगड या इमारतीच्या बांधकामाकरिता हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील पशूधन विकासाच्या दृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या दूरदृष्टीमुळे हा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ०००००

श्रीवर्धनला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याविषयीचा शासन निर्णय जारी पालकमंत्री आदिती तटकरेंचे जिल्ह्याच्या पर्यटनवाढीच्या दृष्टीने मोठे यश

    अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका) : जिल्ह्यातील श्रीवर्धन या शहराला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा काही दिवसांपूवी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. श्रीवर्धन या शहराला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात यावा, यासाठी पर्यटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला होता.               मुंबई, पुण्यापासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासास चालना देण्याच्या दृष्टीने नुकताच श्रीवर्धन या शहरास 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.   रायगड जिल्ह्यातील "श्रीवर्धन" हे पर्यटनस्थळ मुरुड जंजिरा किल्ल्याच्या दक्षिणेस सुमारे 20 कि.मी. अंतरावर तर दक्षिण काशी' म्हणून ओळखल्या जाणार्या श्रीक्षेत्र हरिहरेश्वरच्या उत्तरेस सुमारे 4.80कि.मी. अंतरावर अरबी समुद्र किनारी स्थित आहे. या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी व परिसरामध्ये असलेली प्राचीन मंदिरे, श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवे आगार व इतर आसपासच्या क्षेत्रात...

मुरुड-जंजिराला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याविषयीचा शासन निर्णय जारी पालकमंत्री आदिती तटकरेंचे जिल्ह्याच्या पर्यटनवाढीच्या दृष्टीने उल्लेखनीय यश

    अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका) : जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा या शहराला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा काही दिवसांपूवी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. मुरुड-जंजिरा या शहराला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात यावा, यासाठी पर्यटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला होता.               मुंबई, पुण्यापासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासास चालना देण्याच्या दृष्टीने नुकताच मुरुड-जंजिरा या शहरास 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील “ मुरुड-जंजिरा ” या पर्यटनस्थळाची भौगोलिक स्थिती आकर्षित करणारी आहे. शहरात प्रवेश करतानाच नबाबी नजाकतीचा राजवाडा दृष्टीस पडल्यानंतर पुढे अथांग अरबी समुद्र व याच सागरात घट्ट पाय रोवून उभा असलेला इतिहासाचा मुख्य साक्षीदार पद्मदूर्ग" तसेच विलोभनीय मुरुड समुद्र किनारा नजरेस पडतो, त्यानंतरच शहराचे वेशीवर दर्शन होते ते श्री कोटेश्वरी ग्रामदेव...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी 3 शाळांची होणार निवड महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्हा परिषद व ग्राम सामाजिक परिवर्तन करणार अमंलबजावणी

    अलिबाग,जि.रायगड,दि.24(जिमाका) :- ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील 3 शाळांची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानात निवड करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदर्श शाळा धोरणास पूरक कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत (mvstf) शालेय शिक्षण विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली व बालभारतीच्या मदतीने राज्यात जिल्हा परिषदेच्या “ मिशन 100 आदर्श शाळा ” हा उपक्रम राबविला जाणार आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गावातील शाळांमध्ये या अभियानाची अमंलबजावणी जिल्हा परिषद व ग्राम सामाजिक परिवर्तन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी करण्यात येणार असल्याचे ग्राम सामाजिक परिवर्तन चे जिल्हा समन्वयक रत्नशेखर गजभिये यांनी माहिती दिली आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवात्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, भौतिक सुविधा, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, पर्यावरणस्नेही शाळा, आरोग्य पोषण, आनंदादायी शिक्षण आदी उद्दिष्टे राहणार असून या शाळांच्या निवडीबाबत ही योजन...