‘अमृत’तर्फे विश्वबंधुत्व पंधरवड्याचे आयोजन विविध संस्थांनी सहभागी व्हावे
रायगड-अलिबाग,दि.10(जिमाका ):- स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्म संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणातून जगाला दिलेला सर्वधर्मसमभाव , सहिष्णुता , मानवता , परस्पर सन्मान आणि विश्वबंधुत्वाचा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत व्यापक स्वरूपात पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन , उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने सन 2026 पासून दरवर्षी दि.11 सप्टेंबर ते दि.26 सप्टेंबर 2026 दरम्यान ‘विश्वबंधुत्व पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार असून विविध संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे. आजच्या बदलत्या सामाजिक व जागतिक परिस्थितीत विविधता , मतभिन्नता आणि सामाजिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक ऐक्य , सहिष्णुता , परस्पर सन्मान आणि बंधुभावाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर विश्वबंधुत्वाचा विचार केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या उद्देशाने हा पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे. ‘ शिकागो भाषण कृती कार्यक्रम’ विशेष आकर्षण या पंधरवड्याचे प्रमुख आकर्षण ‘ शिकागो भाषण कृत...