Posts

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 38 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार

    अलिबाग ,  दि.5 ( जिमाका):-   किमान  आधारभूत किंमत धान खरेदी  योजनेंतर्गत   दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई यां च्या  मार्फत  जिल्हा पणन अधिकारी ,  रायगड  यांच्या  अखत्यारीत असलेल्या धानखरेदीदार  संस्थांमार्फत   38 खरेदी केंद्रावर  खरीप व रब्बी पणन हंगाम  2022-2023 करिता    धानाची (भाताची) खरेदी  करण्यात  येणार आहे.  अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील  दि.19 ऑक्टोबर 2022   शासन निर्णयान्वये  भात खरेदीचा   धान-खरीप पणन  हंगामाचा कालावधी  दि.19 ऑक्टोबर 2022 ते  दि. 31 जानेवारी 2023   असा असेल. तर रब्बी/उन्हाळी  हंगाम  केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार राहील . भात खरेदीच्या वेळी  शेतकऱ्यांनी  आपल्याकडील जमिनीबाबतचा 7 / 12 चा उता ऱ्या ची व गाव नमुना  8(अ) ची छायाकिंतप्रत खरेदी केंद्रावर धान विक्रीकरिता  आणणे आवश्यक आहे.  या  उताऱ्यातील  धान्य व धानाखालील क्षेत्र...

जल जीवन सर्वेक्षण 2023 अंतर्गत जिल्ह्यात “स्वच्छ जल से सुरक्षा अभियान” यशस्वीपणे राबविणार ---मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील

    अलिबाग,दि.05 (जिमाका) :  शुदध व सुरक्षित पिण्याचे पाणी ,घरोघरी नळ कनेक्शन देण्यासाठी शासनाकडून जल जीवन मिशन अभियान सुरु करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींमधील सर्व सार्वजनिक संस्थाना शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांचा उद्देश आहे. ग्रामपंचायत स्तरांवरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवणे, ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे.  यांतर्गत दि.1 डिसेंबर ते दि.31 डिसेंबर 2022 या कालावधीत केंद्र शासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या जल जीवन सर्वेक्षण 2023 अंतर्गत  “ स्वच्छ जल से सुरक्षा अभियान ”  जिल्ह्यात राबविले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार असून त्याचे अहवाल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.तसेच जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे.  महसूल गावनिहाय पाच महिलांना प्रशिक्षित करण्यात आले असून त्याच्या माध्यमांतून...

परवानाधारक रिक्षाचालकांना जाहीर केलेल्या पॅकेजसंदर्भातील योजनेची ऑनलाईन प्रणाली बंद

  अलिबाग,दि.05 (जिमाका):  राज्यात मार्च 2021 पासून कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान  “ ब्रेक द चेन ”  अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे दुर्बल घटकांना तातडीची आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी रु.1 हजार 500 एकवेळेचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऑनलाईन पध्दतीने शेवटचा अर्ज दि.31 डिसेंबर 2021 रोजी प्राप्त झाला होता. तसेच ऑफलाईन पध्दतीने दि.25 मार्च 2022 रोजी प्राप्त झाला. त्यानंतर गेल्या 4 ते 6 महिन्यापासून या योजनेत एकही अर्ज प्राप्त न झाल्याने शासन मान्यतेने परवानाधारक रिक्षाचालकांना जाहीर केलेल्या पॅकेजसंदर्भात योजनेची ऑनलाईन प्रणाली शासनाद्वारे बंद करण्यात आली असून याबाबत सर्व रिक्षा चालक-मालक संघटनांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण श्री.महेश देवकाते यांनी कळविले आहे. 00000000

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार,रोजगाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सर्वांनी योजनेचा लाभ घ्यावा --जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

   मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम     अलिबाग,दि.05 (जिमाका) :  राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक, युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगाराच्या व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला काळानुरूप वाव देणारी सर्व समावेश मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना ऑगस्ट 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे. तसेच दि. 11 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे या योजनेच्या स्वरुपाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील  जि ल्ह्या तील सुशिक्षित बेरोजगार , रोजगाराच्या प्रतिक्षेत असणा ऱ्या  सर्वां नी  योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व  जिल्हा उद्यो ग केंद्राचे  महाव्यवस्थापक  जी.एस.हरळय्या यांनी केले आहे.  योजनेची  ठळक वैशिष्टये :- योजना पूर्णत: ऑनलाईन प ध्द तीने राबविण्यात येईल तसेच विहित निर्धा रि त कालावधीत प्रत्येक ट प्प्या वरील कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. ...

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार जलतरण तलाव खेळाडू तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु

    अलिबाग,दि.02 (जिमाका) : जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहुली अलिबाग येथे असलेला 25 x21 मीटर आकाराचा जलतरण तलाव निवडणूक व कोविडमुळे सन 2018 पासून बंद होता.   आता जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार हा जलतरण तलाव खेळाडू तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु करण्यात आला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा कार्यालयाने या जलतरण तलावाची योग्य ती दुरुस्ती व साफसफाई करुन घेतली असून आता नागरिकांसाठी हा तलाव सुसज्ज झाला   आहे. या तलावामध्ये पोहण्याकरिता शालेय/महाविद्यालयीन   विद्यार्थ्यांकरिता शुल्क रु.500   व   इतर नागरिकांसाठी रु.750 असे राहील.     तलावामध्ये पोहण्यासाठी येताना पोहता येणे आवश्यक असून त्याबाबतचे हमीपत्र, आधारकार्ड व फिटनेस प्रमाणपत्र ही कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. यासंदर्भात अलिबाग तालुक्यातील तसेच इतर तालुक्यतील नागरिकांनी अधिक माहितीसाठी अभिजित भगत   यांच्या मो.9881674298 वर संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त खेळाडूंनी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांन...

परवानाधारक रिक्षाचालकांना जाहीर केलेल्या पॅकेजसंदर्भातील योजनेची ऑनलाईन प्रणाली बंद

    अलिबाग,दि.02 (जिमाका): राज्यात मार्च 2021 पासून कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान “ ब्रेक द चेन ” अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे दुर्बल घटकांना तातडीची आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी रु.1 हजार 500 एकवेळेचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऑनलाईन पध्दतीने शेवटचा अर्ज दि.31 डिसेंबर 2021 रोजी प्राप्त झाला होता. तसेच ऑफलाईन पध्दतीने दि.25 मार्च 2022 रोजी प्राप्त झाला. त्यानंतर गेल्या 4 ते 6 महिन्यापासून या योजनेत एकही अर्ज प्राप्त न झाल्याने शासन मान्यतेने परवानाधारक रिक्षाचालकांना जाहीर केलेल्या पॅकेजसंदर्भात योजनेची ऑनलाईन प्रणाली शासनाद्वारे बंद करण्यात आली असून याबाबत सर्व रिक्षा चालक-मालक संघटनांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण श्री.महेश देवकाते यांनी कळविले आहे. 00000000

महाड येथील को.ए.सो.वि.ह.परांजपे विद्यामंदिरामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे मॉकड्रिल यशस्वीरित्या संपन्न

Image
    अलिबाग,दि.02 (जिमाका): नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्यामार्फत राज्य स्कूल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील शाळांमध्ये आपत्तीचे मॉकड्रिल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यशिक्षण विभाग व युएनडीपी तसेच महाराष्ट्र आपत्ती विभाग यांच्या पुढाकाराने रिका इंडिया या संस्थेच्या सहाय्याने राज्यभरात असे मॉकड्रिल होणार आहेत. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील महाड मधील को.ए.सो. वि.ह.परांजपे विद्यामंदिर, महाड या शाळेची निवड करण्यात आली होती. त्यानुसार को.ए.सो. वि.ह.परांजपे विद्यामंदिर, महाड   येथे बुधवार दि. 30 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11.40 वा. मॉकड्रिल कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. सकाळी नागरी संरक्षण दलाचे अधिकारी व त्यांच्या सहकार्याने शाळेत सकाळी 8.00 ते 11.00 यावेळेत शाळेतील इ.9 वी च्या वर्गातील 87 विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक सरावाचे प्रशिक्षण दिले. यामध्ये विद्यार्थ्यांना धोक्याची आगविमोचन, स्थलांतर जागा, व जखमींना मदत कार्य कसे याचे प्रात्यक्षिके दाखवून नैसर्गिक आपत्तीचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर 11.40 वा. मॉक ड्रिलला सुर...