Posts

गोवर रुबेला लसीकरण मोहिम: जिल्ह्यात आजअखेर 4 लाख 38 हजार बालकांना लसीकरण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार दि.27 पासून गोवर रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानात रायगड जिल्ह्यात सोमवार (दि.17 डिसेंबर)  अखेर जिल्ह्यातील 4 लाख 38 हजार 682  बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (सोमवार दि.17) दिवसाअखेर   जिल्ह्यातील 107 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 19 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 1594 विद्यार्थ्यांना तर 93 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 13 हजार 436 विद्यार्थ्यांना अशा एकूण 15 हजार 30 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात 7 हजार 699 मुले व 7 हजार 361 मुलींचा समावेश आहे.   तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 2 लाख 28 हजार 104 मुले   व 2 लाख 10   हजार 578 मुली असे एकूण 4 लाख 38 हजार 682 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आ...

ग्रंथोत्सवाची यशस्वी सांगताःग्रंथ वाचनाची प्रेरणा घ्यावी- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- ग्रंथ वाचन ही एक चांगली सवय असून  ती आपण विद्यार्थी दशेपासूनच अंगिकारावयास हवी. ग्रंथवाचनाने आपले विचार व्यक्त करण्याची सवय आपल्याला जडते. त्यामुळे आपले वक्तृत्व सुधारते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी  डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. दोन दिवस चाललेल्या रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाची आज यशस्वी सांगता झाली. या समारोप सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले,डॉ. आरती सूर्यवंशी, अमृत देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने हे उपस्थित होते. यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सव सोहळ्यात लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनात वाचकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. गेले दोन दिवस या सोहळ्यात विविध विषयांवर मान्यवर अभ्यासू वक्त्यांचे मार्गदर्शन वाचकांना व पुस्तकप्रेमींना ऐकता आले. या शिवाय महाराष्ट्राचे थोर गीतकार ग. दि. माडगुळकर व   साहित्यिक पु. ल. देशपांडे   यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष ...

‘वाचन वेल्हाळ’ संस्कृती निर्माण व्हावी- डॉ. आरती सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- आपली संस्कृती ही पूर्वापार गोष्टीवेल्हाळ संस्कृती आहे. आता या संस्कृतीचे रुपांतर हे ‘वाचनवेल्हाळ’ संस्कृतीत व्हावे, असे प्रतिपादन ‘डिजीटल वाचन’ या विषयावरील परिसंवादात डॉ. आरती सूर्यवंशी यांनी केले. रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ‘डिजीटल वाचन’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी   मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक डॉ. श्रीमती आरती विजय सूर्यवंशी, या होत्या.   या सत्रात   सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांनीही आपले विचार मांडले. त्यात त्यांनी ग्रंथोत्सव आयोजना मागील शासनाची भूमिका विषद करतांना   सांगितले की, या आयोजनाद्वारे विद्यार्थ्यांना आणि वाचकांना मान्यवरांचे ग्रंथ वाचनाविषयीचे विचार अभ्यासपूर्ण विचार ऐकता यावे हा होता. त्यादृष्टीने हा ग्रंथोत्सव यशस्वी झाला असे मत त्यांनी व्यक्त केले.   तर ठाणे येथील तज्ज्ञ वक्ते अमृत देशमुख   यांनी   सांगितले की, डिजीटल वाचन हे मुक्त आणि सर्वकाळ उपलब्ध आहे.   प्रत्यक्षात मोबाईल आणि त्यावरुन सोशल मिड...

गांधीजींशी मैत्री करा-विजय तांबे

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- महात्मा गांधीजींनी देशातल्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेविरुद्ध लढा उभारला,  स्वच्छता चळवळ ही गांधीजींनी उभारलेली जाती व्यवस्था निर्मूलनाची चळवळ होती, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला  अहिंसा आणि सत्य ही देणगी त्यांनी  दिली, अशा गांधीजींना समजून घ्यायचे तर त्यांच्याशी मैत्री करायला हवी, असे आवाहन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे यांनी आज येथे केले. रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ‘गांधी समजून घेतांना’ या विषयावर   ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे, यांचे व्याख्यान झाले. महात्मा गांधीविषयी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडतांना तांबे म्हणाले की,   बालपणात सामान्य विद्यार्थी, सर्व चुका केलेला मुलगा, एक अयशस्वी वकील असे गांधीजी नंतर इतके महान झाले. थोडक्यात आपण मनाशी ठरवलं तर आपणही गांधीजींसारखे होऊ शकतो. शोषणाच्या पायावर उभ्या असलेल्या संस्कृति आणि सभ्यता यांच्यामुळे भारतातली ग्रामिण अर्थव्यवस्था उध्वस्त झाली. त्यासाठी ग्राम स्वराज्याच्या पुरस्कार केला. स्वच्छता व श्रम यांचा वापर करुन त्यांना जाती ...

‘मला भावलेले गांधीजी’ मधून विद्यार्थ्यांनी सांगितली राष्ट्रपित्याची थोरवी; वक्तृत्व स्पर्धेत जहीर हसन कुरेशी प्रथम तर भाग्यदा जोशी द्वितीय

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘ग्रंथवाचनातून मला भावलेले गांधीजी’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींची थोरवी सांगितली. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी यांच्या जीवनावरील ग्रंथ वाचनाचा प्रत्यय उपस्थितांना आला. रायगड जिल्हा ग्रंथोत्सव 2018 च्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ही स्पर्धा झाली. शालेय   विद्यार्थ्यांमध्ये   वाचनाचे संस्कार रुजावेत म्हणून   राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीचे निमित्त साधून   इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ ग्रंथवाचनातून मला भावेलेले गांधीजी’   या गांधीजींच्या जीवनावरील ग्रंथ वाचन व त्या अनुष्ंगाने   वक्तृत्व स्पर्धा   शिक्षण विभागाच्या   वतीने जिल्ह्यतील सर्व शाळांमध्ये आयोजित   करण्यात आली होती.   त्यातून प्रत्येक तालुका स्तरावर एक   विद्यार्थी   निवडण्यात आला. या   विद्यार्थ्यांची   जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धा आज ग्रंथोत्सवात ...

वाचनाने व्हावा स्थूलतेकडून सुक्ष्मतेकडे प्रवास- डॉ. महेश केळुस्कर ‘माझे वाचन आणि मीः’ या परिसंवादात मान्यवरांनी उलगडला आपला वाचनप्रवास

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- पुस्तक हे आपल्या आयुष्यात हातात हात घालून सोबत असतं. त्यामुळे सदैव पुस्तकांशी मैत्री असावी. प्रत्येकाची वाचनाची सुरुवात बालपण, विद्यार्थी दशेत होतांना वाचनाचा प्रवास हा स्थूलतेकडून सुक्ष्मतेकडे व्हावा आणि आपला आंतरिक विकास व्हावा,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांनी केले. रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ‘माझे वाचन आणि मी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाचे अध्यक्ष   जेष्ठ साहित्यिक, तथा कोकण साहित्य मराठी परिषदेचे अध्यक्ष डॉ.महेश केळुसकर हे होते. या परिसंवादात   जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. फिरोज मुल्ला, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, अलिबागच्या कार्याध्यक्ष श्रीमती शैलाताई पाटील, जेष्ठ साहित्यिक व माजी आकाशवाणी केंद्र प्रमुख किशोर सोमण, या मान्यवरांनी आपला वाचन प्रवास उपस्थित वाचकांसमोर उलगडला. आपले विचार मांडतांना जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. फिरोज मुल्ला म्हणाले की, हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि मोबाईल हातात घेतला....

‘गुण गाईन आवडी’ ने रसिकांची जिंकली मने गदिमांच्या गितांमुळे अलिबागकरांची सायंकाळ ‘पुल’कित

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या अंतिम   सत्रात महाराष्ट्राचे थोर गीतकार ग. दि. माडगुळकर व   साहित्यिक पु. ल. देशपांडे   यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘गुण गाईन आवडी’ हा विशेष   सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अलिबाग शहरातील कलावंतांनी गदिमांची गिते आणि पु ल देशपांडे यांच्या ‘व्यक्ति आणि वल्ली’तील पात्रांचे रंगमंचीय सादरीकरण करुन रसिकांची मने जिंकली आणि अलिबागकरांची सायंकाळ ‘पुल’कित झाली. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग यांच्या विद्यमाने रायगड जिल्हा ग्रंथोत्सव – 2018 येथील जिल्हा सार्वजनिक वाचनालयाच्या डोंगर हॉल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात स्थानिक कलावंत विक्रांत वार्डे व श्रीमती श्रृती बोंद्रे व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमामुळे ग्रंथोत्सवाची पहिल्या दिवसाची सायंकाळ गदिमा आणि पुलंच्या स्मृतीसुगंधाने दरवळली. गीतकार ग.दि. माडगुळकर आणि साहित्यिक पु.ल.द...