शेततळ्यातील मत्स्यसंगोपन करी समृद्ध जीवन
अलिबाग,(जिमाका)दि.26:- एकीकडे भरपूर पर्जन्यमान, सुपिक जमीन, मोठा समुद्र किनारा अशी लाभलेली निसर्गसंपदा आणि दुसरीकडे केवळ खरिपात होत असलेली पारंपारिक भात शेती आणि त्यातून शेतकऱ्यांना मिळणारे तुटपुंजे उत्पन्न. अशी विसंगती. उपलब्ध निसर्गसंपदेचा आणि मेहनती शेतकऱ्यांच्या क्षमतेचा वापर करुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने 'आत्मा' प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना शेतात शेततळी करुन त्यात मत्स्य संगोपन करण्यास प्रवृत्त केले. त्याचे अत्यंत चांगले परिणाम दिसून आले आहेत. कृषि हवामानानुसार रायगड जिल्हा हा पर्जन्यमान असलेला जिल्हा असुन जांबा दगड विरहित जमिन व समुद्र सपाटीपासून सुपीक वालुकामय जमिन असलेला जिल्हा आहे. रायगड जिल्ह्यात सरासरी 3000 मि.मि पाऊस पडतो. रायगड जिल्हात 220 किलोमीटर किनारीपट्टी लाभलेला जिल्हा असुन तो उत्तेकडून दक्षिणेकडे निमुळता झालेला आहे. ...