Posts

*"माझे कुटुंब- माझी जबाबदारी" कराेनाविराेधातील लढाई सक्षमपणे लढू या* *-- जिल्हाधिकारी निधी चौधरी*

अलिबाग,जि.रायगड,दि.14 (जिमाका):- राज्यामध्ये कोविड-19 रुग्णांमध्ये व करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे मृत्यूमध्ये होत असलेली वाढ विचारात घेता यापुढे कोविड-19 नियंत्रण कार्यवाही जनतेच्या सहभागातून करण्यासाठी राज्यभर "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहीम दि.15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. कराेनाविरोधातील ही लढाई आपण सर्व मिळून सक्षमपणे लढू या,  असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज केले.        या मोहिमेंतर्गत राज्यातील शहर,गाव,पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून प्रत्येक नागरिकास  व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.       या मोहिमेची पहिली फेरी दि.15 सप्टेंबर 10 ऑक्टोबर 2020 आणि दुसरी फेरी 14 ऑक्टोबर 20 ते 24 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये होणार आहे.       या मोहिमेंतर्गत गृहभेटीद्वारे संशयित कोविड तपासणी व उपचार करणे, अतिजोखमीच्या (co-morbid) व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड-19 प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देणे, SARI/ I...

प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पर्यायी जागा शोधून ग्रामीण रुग्णालय उभारण्याचे काम तातडीने सुरू करावे --पालकमंत्री आदिती तटकरे

अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :-  सुधागड-पाली तालुक्यातील पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पर्यायी जागा शोधून ग्रामीण रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे निर्देश पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला आज येथे दिले.         सुधागड-पाली तालुक्यातील पाली येथील ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्याच्या दृष्टीने ऑनलाइन महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे उपसंचालक डॉ.गौरी राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरे, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मढवी, श्री.सुरेश खैरे, श्रीमती गीता पालरेचा, श्री.पोंगडे महाराज यांची उपस्थिती होती.          पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, या ग्रामीण रुग्णालयाच्या नियोजित जागेची मोजणी प्रक्रिया, सातबारा नोंदणी, जिल्ह...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 8 मि.मी.पावसाची नोंद

    अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.34 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3 हजार 273.25 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग-2.00 मि.मी., पेण-0.00 मि.मी., मुरुड-20.00 मि.मी., पनवेल-0.20 मि.मी., उरण-0.00 मि.मी., कर्जत-6.00 मि.मी., खालापूर-5.00 मि.मी., माणगांव-7.00 मि.मी., रोहा-7.40 मि.मी., सुधागड-5.00 मि.मी., तळा-19.00 मि.मी., महाड-7.00 मि.मी., पोलादपूर-4.00 मि.मी., म्हसळा-12.00मि.मी., श्रीवर्धन-37.00 मि.मी., माथेरान-2.20 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 133.40 मि.मी.इतके असून सरासरी 8.34 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण    पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 101.77 मि.मी.इतकी टक्के आहे. 00000

ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता विषयावरील राज्यस्तरीय बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन

  अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :-   पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून   राज्य पाणी व स्वच्छता मिशन राबविण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता या विषयाच्या अनुषंगाने बोधचिन्ह तयार करण्यासाठी राज्यात बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्हयातील कलाकार, विद्यार्थी, विविध प्रकारच्या संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा परिषद, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. या स्पर्धेची सर्वसाधारण नियमावली पुढीलप्रमाणे- लोगो ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता या विषयांचा सहज बोध होईल, असा असावा., ब्रीदवाक्य मराठीतूनच असणे बंधनकारक असेल., ब्रीदवाक्य मोजक्या शब्द मर्यादेत असावे.,या स्पर्धेत व्यक्ती,संस्था,जाहिरात संस्था सहभागी होऊ शकतील.,बोधचिन्ह (लोगो) एकरंगी,बहुरंगी प्रकारात असला तरी चालेल.,सहभागी लोगोची Soft copy पाठविणे आवश्यक असेल. त्यासोबत स्पर्धकाची संपूर्ण माहिती उदा.संपर्क क्रमांक इ. असणे आवश्यक असेल., ज्या स्पर्धकाचा लोगो अंतिम निवड होईल त्यांनी cdr (Coral Draw) फाईल्स उपलब्ध करुन देणे आवश्य्क असेल., लोगो अंतिम करण्याचे स...

मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:र्रिक्षण कार्यक्रम घोषित

    अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका) : मा.भारत निवडणूक आयोगाकडून दि. 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:र्रिक्षण कार्यक्रम जाहीर झाला असून त्याची माहिती सहायक मतदार नोंदणी अधिकारी, 192-अलिबाग विधानसभा मतदार संघ तथा अलिबाग तहसिलदार सचिन शेजाळ यांनी कळविली असून ती माहिती पुढीलप्रमाणे :-         दावे व हरकती निकाली काढणे, गुरुवार दि. 27 ऑगस्ट 2020,   अंतिम प्रसिद्धीसाठी मतदारयाद्यांची विशेष तपासणी, सोमवार दि. 7 सप्टेंबर 2020, डाटाबेसचे अद्यावतीकरण, पुरवणी याद्यांची छपाई शुक्रवार दि.18 सप्टेंबर 2020, अंतिम मतदारयादी प्रसिद्धी, शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर 2020. ०००००

जिल्ह्याचे एज्युकेशनल हब श्रीवर्धनमध्ये उभारणार* *-पालकमंत्री कु.आदिती तटकरे*

*पालकमंत्री कु.आदिती तटकरे "तेजस्विनी" पुरस्काराने सन्मानित*  अलिबाग,जि.रायगड,दि.5 (जिमाका):- अँड्रॉइड मोबाईल येण्याआधीचे शालेय जीवन खूपच सुंदर होते. परंतु काळ जसा बदलत आहे त्याप्रमाणे  शैक्षणिक व्यवस्थाही बदलण्याची  गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे एज्युकेशनल हब श्रीवर्धनमध्ये उभारण्याचा आपला संकल्प आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.       श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे शिक्षक दिनानिमित्त "तेजस्विनी पुरस्कार" व "सरस्वती भूषण पुरस्कार" वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत हाेत्या.        यावेळी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, जिल्हा परिषद सदस्य  प्रगती अदावडे, सरपंच परविन नाझ, पंचायत समिती सदस्य मंगेश काेमनाक, प्रांताधिकारी अमित शेडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव पवार, तहसिलदार सचिन गोसावी, प्राचार्य श्रीनिवास जोशी, गटविकास अधिकारी श्री.सिनारे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, सिध्दू कोस...

अन्न व नागरी पुरवठा विभाग, रायगड जिल्हा प्रशासन आणि नवी मुंबई पोलिसांची पनवेल येथे धडक कारवाई*

*सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदळाचा गैरवापरासंबंधी आराेपी रेशन दुकानदारांना तात्काळ अटक         अलिबाग,जि.रायगड,दि.5 (जिमाका) :- जिल्हयातील पनवेल तहसिलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या संयुक्त पथकाने दि.३१ जुलै २०२० रोजी टेक केअर- लॉजिस्टीक, पळस्पे, ता.पनवेल येथील पलक रेशन गोडावून येथे छापा टाकून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ११० मे.टन तांदूळ जप्त केला आहे. त्यानुषंगाने संबंधितांविरुध्द दि.०१ ऑगस्ट २०२० रोजी पनवेल शहर पोलीस ठाणे, पनवेल, नवी मुंबई येथे गुन्हा नोंद क्र. ०२७४/२०२०, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच भा.द.वि.१२० (ब), ४२०, ४६५, ४६८,४७०,४७१, ३४ व सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) आदेश २०१५ चे कलम १३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ६अ अन्वये जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे दि.१४ ऑगस्ट व ०४ सप्टेंबर २०२० रोजी सुनावणी घेण्यात आली हाेती. याबाबत पुढील अंतिम सुनावणी दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी हा...