Posts

रायगड जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध --मंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सात मजली 300 खाटांच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न

Image
    रायगड (जिमाका)दि.5:- रायगड जिल्ह्यातील य नागरिकांना वेळेत उपचार व उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या  सात मजली 300 खाटांच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उद्योग मंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते झाले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे,  आरोग्य विभागाचे उपसंचालक अशोक नांदापुरकर, जिल्हा शल्य चिकत्सक रायगड डॉ.निशिकांत पाटील, डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे यांसह विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री...

चवदार तळ्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता कार्यक्रम दिमाखदार करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Image
  रायगड (जिमाका) दि.4:- ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा 98 वा वर्धापन दि.20 मार्चला महाड येथे साजरा होत आहे.  तसेच मोठया संख्येने अनुयायी येतात. हे लक्षात घेता आरोग्य, पाणी, स्वच्छतागृह यांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागानी नियोजन करावे. तसेच या सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. महाड चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने  सर्व शासकीय यंत्रणाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत घेतला. चवदार तळ्याचे आंतरराष्ट्रीय महत्व लक्षात घेता कार्यक्रमाचे नियोजन दर्जेदार व उत्कृष्ट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.   जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) रविंद्र शेळके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले,तहसीलदार महाड महेश शितोळे, यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी नगरपरिषदेमार्फत चवदार तळे, भीमनगर, क्रांती स्‍त...

रायगड जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केल्या स्थानिक सुट्टया

  रायगड (जिमाका) दि.04:- रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरिता 3 स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार सन-2025 या वर्षाकरिता गुरुवार, दि.13 मार्च 2025 रोजी होळी, मंगळवार, दि.2 सप्टेंबर 2025 ज्येष्ठा गौरी विसर्जन, सोमवार, दि.20 ऑक्टोबर 2025 रोजी नरक चतुर्थी या तीन स्थानिक सुट्टयांची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. ०००००

छत्रपतींच्या जयघोषात, शिवमय वातावरणात भव्य व दिमाखदार “जय शिवाजी जय भारत”पदयात्रा संपन्न

Image
    रायगड(जिमाका)दि.19:-  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 'जय शिवाजी, जय भवानी',  'हर हर महादेव' जय शिवाजी जय भारत अशा जयघोषात आज रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित भव्य जय शिवाजी जय भारत पद यात्रा मोठया उत्साहात संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या या जिल्ह्यात या पदयात्रेचे अतिशय दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अलिबाग येथील पोलीस कवायत मैदान  येथून  “ जय शिवाजी जय भारत ” पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान अलिबाग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमांच्या माध्यमातून पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम आपणा सर्वांना करावयाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपण पुढे न्यायची आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले...

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसविणे आवश्यक

  रायगड,दि.18(जिमाका) :-   वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट (HSRP) बसविणे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याची माहिती सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी व नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन HSRP ची भूमिका लक्षात घेऊन राज्य शासनाने दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत केलेल्या वाहनांना HSRP बसविण्याचा निर्णय घेतला असून अशा जुन्या वाहनांना बसविणे बंधनकारक आहे. दि.01 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर उत्पादका मार्फतच हाय सिक्युरीटी नंबर प्लेट (HSRP) बसविण्यात आल्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा नंबर प्लेट लावण्याची आवश्यकता नाही. ज्या वाहनधारकांची वाहने 01 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेली आहेत अशा सर्व संबंधित वाहन मालकांनी बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https:: transport.maharashtra. gov.in  या संकेतस्थळावर जाऊन त्याबाबत नों...

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती करिता अर्ज करावेत

    रायगड,दि.18(जिमाका) :- अल्पसंख्यांक विकास विभागांतर्गत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळण्याच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सन 2024-25 करिता पात्र विद्यार्थ्यांनी परिपूर्ण आवश्यक त्या कागदपत्रांसह  अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, रायगड सुनील जाधव यांनी केले आहे. या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व अल्पसंख्याक समुदयातील घटकतील असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे च पीएचडीसाठी 40  वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.8.00 लाखापेक्षा जास्त नसावे (विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रीत वार्षिक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर विवाहित महिला उमेदवार विधवा. घटस्फोटीता असून वडिलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवाराने वडीलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तरी कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे).पीएचडीसाठी 4 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो तथाप...

जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी आयोजन जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा लाभ

    रायगड,दि.18(जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात दि.22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल अ. शिंदे यांनी  दिली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रकरणे तसेच ग्रामपंचायतीच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकारणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्थांच्या थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. दि.22 मार्च 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि अधिकाधिक नागरिकांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड, अलिबाग ए. एस. राजदेकर यांनी केल...