Posts

Showing posts from November 17, 2019

माणगांव तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्र.45-निजामपूर व रोहा तालुक्यतील पंचायत समिती 80- आंबेवाडी निर्वाचक गण पोट निवडणूक कार्यक्रम

अलिबाग दि.19, जिल्ह्यतील माणगांव तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्र.45-निजामपूर व रोहा तालुक्यतील पंचायत समिती 80- आंबेवाडी निर्वाचक गण पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर. निवडणूकीच्या तारखांची सूचना व निवडणूकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्दीची तारीख शुक्रवार दि.22 नोव्हेंबर, 2019, संकेतस्थळावर भरण्यांत आलेले नामनिर्देशन पत्र निर्वाचन अधिकाऱ्यांनी स्विकारण्याचा कालावधी शुक्रवार दि.22 नोव्हेंबर 2019 ते बुधवार दि.27 नोव्हेंबर 2019 पर्यंत (सकाळी 11.00 ते दु.3 पर्यंत) रविवार दि.24 नोव्हेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्रांची छाननी व त्यावर निर्णय देणे गुरुवार दि.28 नोव्हेंबर 2019 (सकाळी 11.00 वाजल्यापासून), वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यांचा दिनांक गुरुवार दि.28 नोव्हेंबर 2019 (छाननीनंतर लगेचच), नामनिर्देशन पत्राचा स्विकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबतचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांने दिलेल्या निर्णयाविरुध्द जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख सोमवार दि.02 डिसेंबर 2019, जिल्हा न्यायाधिशांन

ग्रामपरिवर्तकांनी सामान्य जनतेच्या जीवनमानात सुधारणा करणे महत्वाचे - जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग दि .19, :- ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत   विविध कामांच्या माध्यमातून ग्राम परिवर्तकांनी सामान्य जनतेच्या जीवनमानात सुधारणा करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले. जिल्हा ग्राम सामाजिक परिवर्तन अभियनांतर्गत 22 ग्रामपंचायतीमधील विकास कामांचा आढावा बैठक नियोजन भवन येथे झाली त्यावेळी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकरी दिलीप हळदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, ग्राम सामाजिक परिवर्तन   अभियानाचे व्यवस्थापक युवराज सासवडे, संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी, 22 ग्रामपंचायती मधील ग्राम परिवर्तक व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. डॉ.सूर्यवंशी म्हणाले, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून   ग्रामीण जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान, शाळा दुरुस्ती, शाळा डिजिटल करणे, शौचालय बांधकाम दुरुस्ती, आरोग्य तपासणी, कुकट पालन, मस्त्य पालन, शेळी पालन, शेत तळे आदि विविध क्षेत्रात या अभिय