झाडांचे संगोपन करुन ती झाडे जगविणे आवश्यक-- जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले
झाडांचे संगोपन करुन ती झाडे जगविणे आवश्यक -- जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.29:- (जिमाका) रायगड जिल्ह्याला झाडे लावण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे व लावलेल्या झाडांचे संगोपन करुन ती झाडे जास्तीत जास्त प्रमाणात जगवावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा वर्षनिहाय नियोजन आराखडा व कृती कार्यक्रम तयार करुन अंमलबजावणी करणे याबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. या बैठकीला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विद्याधर झुकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) उमेश पाटील, रोहा विभागाचे सहाय्यक वन संरक्षक दिपक सावंत, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या की, वृक्षलागवड कार्य