Posts

Showing posts from March 26, 2017

रायगड जिल्हयाची 101 टक्के महसूल वसूली उद्दिष्टपूर्ती -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

रायगड जिल्हयाची 101 टक्के महसूल वसूली उद्दिष्टपूर्ती                                                      -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.31 (जिमाका), रायगड जिल्हयासाठी शासनाने दिलेल्या महसूल वसूली उद्दिष्टांची 101.88 टक्के अशी विक्रमी वसूली करण्यात आली. या वसूली बद्दल जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी जिल्हयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. सन 2016-17 या वर्षासाठी रायगड जिल्हयाला अ पत्रकासाठी 86 कोटी, गौण खनिजासाठी 115 कोटी व करमणूक करासाठी 12.50 कोटी असे एकूण 213.47 कोटी एवढे वसूलीचे उद्दिष्ट शासनामार्फत देण्यात आले होते. 31 मार्च, 2017 अखेर या उद्दिष्टांपैकी अ पत्रक 95.58 कोटी, गौण खनिज 105.57 कोटी, करमणूक 15.71 कोटी असे एकूण 217.48 कोटी एवढी वसूली साध्य केलेली आहे. दिलेल्या वसूली उद्दिष्टांच्या 101.88 टक्के एवढी वसूली जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे. सन 2016-17 या आर्थिक वर्षात रायगड जिल्हयातील  विविध रेती गटाचे लिलाव झालेले नव्हते. त्यामुळे गौण खनिज वसूली पूर्ण करणे हे अवघड उ

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता स्पर्धा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक

Image
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता स्पर्धा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला  राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक अलिबाग दि.31, (जिमाका)  राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धेत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयास सन 2016 या वर्षाकरीता राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या मार्गदर्शनात गतवर्षी राबविण्यात आलेल्या  प्रशासकीय उपक्रमाची शासनाने दखल घेवून हे पारितोषिक जाहिर केले आहे. या पारितोषिक मिळाल्या बद्दल गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले व जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले आहे.  जिल्हा व राज्य स्तरावर 2002 पासून प्रतिवर्षी या अभियान अंतर्गत स्पर्धा घेतली जाते.  त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आपला सहभाग नोंदविला होता. सन -2016 मध्ये रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत प्रशासकीय सुधारणेबाबत पुढील बाबींकडे विशेष लक्ष पुरविलेले गेले.  1) कार्यालयीन वातावरणात सुधारणा व स्वच्छता 2) कार्यपध्दतीचे सुलभीकरण 3) ई-गर्व्हनस 4) अनुत्पादक खर्चात काटकसर 5) महसूल

लाट उष्णतेची-घ्या काळजी आरोग्याची- डॉ.राजू पाटोदकर

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग फोन नं.222019 ई-मेल :- dioraigad@gmail.com dioabg@rediffmail.com फेसबुक :- dioraigad  ट्विटर :- dioraigad ब्लॉग :- dioraigad लेख क्र.15                                                                                                   दिनांक :- 30  मार्च 2017 लाट उष्णतेची-घ्या काळजी आरोग्याची आपल्या आरोग्याची काळजी  घेणे आपल्याच हाती असते. केवळ आपलं किंवा आपलेच कुटूंबिय नव्हे तर आपले हितसंबंधी आणि पर्यायाने संपूर्ण समाजाची  जबाबदारी   कळत नकळत आपल्यावर असतेच ना.  कारण आपण याच समाजाचा एक घटक असतो.   तेंव्हा या सर्वांची थोडी काळजी  घेणे गरजेचे आहेच.  सध्या उष्माघाताची मोठी लाट सर्वत्र आलेली आहे. त्यापासून बचाव हे आपले पहिले कर्तव्य आहे. त्यासाठी थोडी काळजी घ्याच… अगदी साध्या आणि सोप्या उपाययोजनांद्वारे आपण उष्माघातापासून आपले संरक्षण करु शकतो.  चला तर मग काळजी घेऊ,उष्माघातापासून संरक्षण करु यासाठी ऐवढेच करा… काय करावे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे हे सांगतांना अगदी साध्या बाब