Posts

Showing posts from December 18, 2016

पाताळगंगा येथील एनआयएसएमच्या नवीन संकुलाचे उद्घाटन भांडवली बाजारातून संपत्ती निर्माण नव्हे तर नागरिकांचे कल्याण व्हावे; बॅाण्डसच्या माध्यमातून शहरांच्या विकासासाठी निधी मिळावा -- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Image
पाताळगंगा येथील एनआयएसएमच्या नवीन संकुलाचे उद्घाटन भांडवली बाजारातून संपत्ती निर्माण नव्हे तर नागरिकांचे कल्याण व्हावे;             बॅाण्डसच्या माध्यमातून शहरांच्या विकासासाठी निधी मिळावा                                       -- पंतप्रधान नरेंद्र मोदी             नवी मुंबई दि २४: मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करणे हे भांडवली बाजाराचे उद्दिष्ट्य नसावे तर राष्ट्र उभारणी आणि नागरिकांचे यातून कल्याण व्हावे. राज्यातील किमान १० स्मार्ट शहरे म्युनिसिपल बॅाण्डसच्या माध्यमातून विकसित व्हावी तसेच शेतकऱ्यांना देखील वित्तीय बाजाराचा लाभ मिळावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते आज सेबीच्या राष्ट्रीय प्रतिभूती बाजार संस्थान (एनआयएसएम)च्या नव्या संकुलाचे उद्घाटन करतांना बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अरुण राम मेघवाल यांची उपस्थिती होती. पाताळगंगा ( रायगड) औद्योगिक वसाहतीतील एनआयएसएम नव्या संकुलाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. देशातील भांडवली ( वित्ती

स्मारक शिवछत्रपतींचे महाराष्ट्राच्या अस्मितेचे

दिनांक :-  22 डिसेंबर 2016                                                  लेख क्र-64 स्मारक शिवछत्रपतींचे महाराष्ट्राच्या अस्मितेचे                छत्रपती शिवराय महाराष्ट्रातील प्रत्येकाचे आराध्य दैवत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक.  त्यांचे मुंबई अरबी समुद्रात होत असलेले आंतरराष्ट्रीय स्वरुपाचे स्मारक म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेची आणि महाराष्ट्राची अस्मिता होय.              मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या स्मारकाच्या भुमिपुजन व जलपुजनाचा समारंभ शनिवार दि.24 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 3 वाजता संपन्न होत आहे. त्या निमित्ताने हा लेख..               राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई लगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय   2002   मध्ये घेतला.   मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने याबाबत कार्यवाही करुन्‍ स्मारकाच्या कामास गती दिली.  अरबी समुद्रातील जागा निश्चित करुन ज्या जागेवर  स्मारक उभारणीस  28 फेब्रुवारी 2014 ला मान्यता दिली..             राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील   बेटावर जग

रस्त्यांमुळे गाव समृध्द होईल ----राज्यमंत्री रविंद्र चव्हाण

Image
रस्त्यांमुळे गाव समृध्द होईल                                                               ----राज्यमंत्री रविंद्र चव्हाण अलिबाग दि.21 :- (जिमाका)   मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार होणाऱ्या रस्त्यामुळे प्रत्येक गाव शहराला जोडले जाऊन गावामध्ये समृध्दी येईल. या योजनेतून संपूर्ण जिल्ह्यासाठी  निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  या अंतर्गत रस्त्याची कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे  रस्ते बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण  यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पेण-बोरगाव ते विराणी धनगरमाळ या रस्त्याच्या कामाच्या भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते.   यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार धैर्यशील पाटील,  जि.प.माजी अध्यक्षा निलिमा पाटील, पेण प्रांताधिकारी श्रीमती पी.एस.जैतू, तहसिलदार श्रीमती वंदना मकू आदि उपस्थित होते. पुढे बोलताना श्री.चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रायगड जिल्ह्यातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्या

आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार फवारणी करण्याचे आवाहन

आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार फवारणी करण्याचे आवाहन अलिबाग दि.20 :- (जिमाका)  कृषि विभागामार्फत 1 डिसेंबर पासून आंबा पिक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (हॉर्टसॅप) सुरु करण्यात आलेला आहे.  या प्रकल्पाद्वारे नियमित निरीक्षणे घेऊन किड व रोगाच्या नियंत्रणासाठी सल्ला देण्याचे काम करण्यात येत आहे.  दिवसेंदिवस हवामानामध्ये होणारा अचानक बदल यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.  ढगाळ वातावरण व कोंडत हवामान राहिल्यास  आंबा पिकावरील तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढ होत असते.   मोहोरावरील तुडतुडे मोहोरातील कोवळया  फळातील रस शोषून घेतात.  त्यामुळे मोहोर गळून पडतात.  याशिवाय तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात याला स्थानिक भाषेत चिकटया किंवा गोडया असे देखील म्हणतात.  तर पानांवर त्यावर काळी बुरशी वाढते, त्यामुळे झाडे, फळे काळी पडतात.  तुडतुडे व भुरी यांच्या नियंत्रणासाठी सुधारित वेळापत्रकाप्रमाणे  औषधे फवारावीत असे आवाहन दिलीप ढवळे उपविभागीय कृषि अधिकारी अलिबाग यांनी केले आहे. फवारणी कालावधी, किटकनाशक औषधे व 10 लि.पाण्यातील प्रमाण याबाबतची मा

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ

Image
दिनांक:- 20/12/2016                                                                                                               वृत्त क्र. 816 सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ अलिबाग, दि.20 :- रायगड जिल्ह्यातील सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन-2016 कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा वन अधिकारी श्रीमती जयंती बॅनर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत  जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कमांडर (निवृत्त ) सोपान डोके, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक एच.एन. बडे, ॲड. प्रविण ठाकूर चिटणीस श्री.देशमुख  तसेच विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी अनेक  सैनिक आपले बलिदान देतात.  अशा सैनिक /माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा. देशाच्या सिमेचे रक्षण आपले सैनिक करत असतात.    म्हणूनच सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी संकलनात सहभाग