Posts

Showing posts from November 1, 2020

जिल्हयातील खाजगी आस्थापनांना ऑनलाईन रोजगार मेळाव्याकरीता रिक्तपदे अधिसूचित करण्याचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका) :- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने   दि.24 ते 26 नोव्हेंबर 2020 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. त्यासा़ठी या कार्यालयाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आस्थापनांनी प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती या विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in वर दि. 23 नोव्हेंबर 2020 पर्यंत भरावी. ही माहिती भरताना प्रथम उपरोक्त वेबपोर्टल सुरु करावे. त्यातील Employment-Employer (List a Job)-Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील   Pandit Dindayal Upadhyay Job Fair   या ऑप्शनमधून दिसणा-या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्हयाच्या नावावरील View Details-Job Details-Agree and Post Vacancy-Choose Vacancy-Add New Vacancy ऑप्शनवर क्लीक केल्यानंतर रिक्तपदांची माहिती भरुन शेवटच्या पानावरील   Sav

नियमांचे पालन करीत दिवाळी साजरी करुया शासनाने दिवाळीसाठी जाहीर केली विशेष नियमावली

  वृत्त क्रमांक:- 1338                                                                दिनांक:- 06 नोव्हेंबर 202 0   अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका) :- राज्यात प्रमुख शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आजही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात कोविड साथ लक्षात घेऊन गेल्या आठ महिन्यांमध्ये आलेले सर्वच सण व उत्सव साधेपणाने, एकत्रित न जमता साजरे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे यंदा प्रकाशाचा दीपोत्सव अन्य सणांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साधेपणाने व नियम पाळून साजरा करावा, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे साजरा केला जाणारा दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, जेणेकरुन करोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही. दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाश

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी कोकणवासियांच्या मदतीला तत्परतेने धावून येणार राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक पथक महाड येथे कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यासाठी शासनाने पाठविला केंद्र शासनाला प्रस्ताव पालकमंत्री आदिती तटकरे यांचा पाठपुरावा

  वृत्त क्रमांक:- 1337                                                               दिनांक :- 05 नोव्हेंबर 202 0 अलिबाग,जि.रायगड,दि.05 (जिमाका) :- नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे.  निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी तसेच नुकत्याच घडलेल्या महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन व निर्मूलनासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) पथकाचा कायम स्वरुपी बेस कॅम्प जिल्ह्यात स्थापित करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा आपत्ती प्रसंगी आपत्ती व्यवस्थापनाचे काम जलदगतीने व्हावे तसेच आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत उपलब्ध व्हावी, म्हणून पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्य आपत्ती व्यवस्थापन  विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत महाड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) पथक कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला होता व संबंधितांना तसे आदेश देण्यात आले होते.            तसेच महाड येथे कायमस्वरूपी राष्ट्रीय आपत्ती

“कृषी पर्यटन धोरण” (भाग-2)

  विशेष लेख क्र.36                                                                          दिनांक :- 05 नोव्हेंबर 2020     कृषी पर्यटनांतर्गत शेतीसोबत पुढीलपैकी सर्व किंवा काही उपक्रम राबविता येतील: हरितगृह, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय (मत्स्यशेती, मत्स्यतळे), रोपवाटिका(नर्सरी), फळबागा, पशु-पक्षी पालन (कुक्कुटपालन, शेळीपालन, मेंढी पालन इ.), निसर्ग साहसी पर्यटन-(याकरिता स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल), वाईन टुरिझम.   कृषी पर्यटन केंद्रास शासनाकडून मिळणारे लाभ : Ø   कृषी पर्यटन केंद्रास पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळेल, Ø   कृषी पर्यटन केंद्र मालकास नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे बँक कर्ज प्राप्त करता येऊ शकेल, Ø   नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रास पर्यटन धोरण- 2016 मधील प्रोत्साहनांचा (उदा.वस्तू व सेवा कर, विद्युत शुल्क) (मुद्रांक शुल्क सवलत वगळता) इत्यादीचा लाभ घेता यईल, Ø   जलसंधारण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या शेततळे योजनेकरिता कृषी पर्यटन केंद्रास प्राधान्य देण्यात येईल, Ø   नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रास राज्य व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या

सन 2020-21 साठी वार्षिक वाहनकराच्या 50 टक्के करमाफी देण्याचा शासनाचा निर्णय जाहीर

  अलिबाग,जि.रायगड,दि.05 (जिमाका) : राज्यामध्ये वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना दि.01 एप्रिल ते दि.30 सप्टेंबर 2020 या सहा महिन्यांच्या कालावधीत   कर भरण्यापासून 100 टक्के करमाफी म्हणजे सन 2020-21 या वर्षासाठी एकूण वार्षिक कराच्या 50 टक्के करमाफी देण्यास मान्यता देण्यात यावी, असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. जर वाहनधारकाने एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीचा कर भरला असल्यास तो पुढील कालावधीकरिता म्हणजे ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीसाठी देय करात समायोजित करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. तसेच जे वाहनमालक दि.31 मार्च 2020 पर्यंतचा थकीत कर दि.31 डिसेंबर 2020 पर्यंत दंड व्याजासह भरतील, त्यांनासुध्दा करमाफीची सवलत देण्यात असल्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. ०००००

आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून वंचित असणाऱ्या जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी अनोखी भेट

  अलिबाग,जि.रायगड,दि.05 (जिमाका) : जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या ज्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे, अशा जिल्ह्यातील एकूण 119 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना हा लाभ देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या पुढाकारातून जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली व दि.4 नोव्हेंबर 2020 रोजी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे   प्रलंबित लाभ मंजूर करण्यात आले. यामध्ये जे कर्मचारी दि.01 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त, मयत झालेले आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबालादेखील याचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. शासकीय सेवेत पदोन्नतीची संधी उपलब्ध न झाल्याने ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना एकाच पदावर 10, 20 व 30 वर्षे किंवा 12 व 24 वर्षे झालेली आहेत, अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासनाने आश्वासित प्रगती योजना व सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केलेली आहे. परंतु जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्ण

“कृषी पर्यटन धोरण” (भाग-1)

  विशेष लेख क्र.35                                                                                      दिनांक :- 04 नोव्हेंबर 2020   शासनाने नवे पर्यटन धोरण जाहीर केले असून, या धोरणांतर्गत पर्यटन क्षेत्रामध्ये वार्षिक 10 टक्के उत्पन्न आणि राज्याच्या सकल उत्पन्नात पर्यटन क्षेत्राचा 15 टक्के वाटा प्राप्त करण्याचे तसेच या क्षेत्रात सन 2025 पर्यंत 1 दशलक्ष रोजगार निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी या धोरणांतर्गत ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन राबविण्याची संकल्पना समाविष्ट करण्यात आली आहे. यास अनुसरुन राज्याचे कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यासाठी शासनाने आवश्यक ती पाऊले उचलली आहेत. राज्यातील सुमारे 55 ते 60 टक्के लोक प्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेढी पालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय इ. कृषी संलग्न विषयाचा एकत्रित विचार केल्यास, ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाला निक्षितपणे चालना मिळू शकते. राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करुन देणे आणि शहरी पर्यटकाना

“पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी” योजनेचा जास्तीत जास्त गरजू पथविक्रेत्यांनी लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी निधी चौधरी

  अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) : शहरातील पथ विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी योजना राबविण्याबाबत केंद्र शासनाने राज्य शासनास सूचना दिल्या आहेत. त्यानुषंगाने शासनाने केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी- पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पंधरा नगरपालिका/नगर पंचायत क्षेत्रात ही योजना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या योजनेचा लाभ गरजू पथविक्रेत्यांना मिळावा, याकरिता सर्व मुख्याधिकारी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर या योजनेचा जिल्ह्यातील नगरपालिका/नगर पंचायत क्षेत्रातील जास्तीत जास्त  गरजू पथविक्रेत्यांनी  लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. जिल्ह्यातील विविध नगरपालिका/नगर पंचायत क्षेत्रात तालुकानिहाय प्राप्त प्रस्ताव व त्यावरील कार्यवाही याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे- महाड- प्राप्त प्रकरणे 187, मंजूर 81, वितरीत 81, नामंजूर 7 तर प्रलंबित प्रकरणे 106. तळा- प्राप्त प्रकरणे 69, मंजूर 17, वितरीत 10, प्रलंबित प्रकरणे

जिल्हा समन्वयक श्री. गजभिये यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना दिली ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाबाबतची माहिती

        अलिबाग,जि.रायगड,दि.03, (जिमाका):- राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार, आमदार महेंद्र दळवी व   जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची आज दि.28 ऑक्टोबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेवून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा समन्वयक श्री.रत्नशेखर गजभिये    यांनी जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील एकूण   22 गावांमध्ये चालू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची, विशेष प्रकल्पांची व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची सदय:स्थिती याबाबतची माहिती   राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना दिली.       यावेळी राज्यमंत्री श्री.सत्तार यांनी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान ही ग्रामविकासासाठी एक उत्तम संकल्पना असल्याचे सांगून श्री.गजभिये यांना रायगड जिल्ह्यासाठी अधिक चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ०००००

चालू खरीप व रब्बी हंगामातील कर्जतमधील मंजूर धानखरेदी केंद्रावर धान/भरडधान्य रागी (नाचणी) खरेदी होणार लवकरच सुरु

        अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) : आधारभूत किंमत खरेदी योजनेंर्गत आदिवासी उपाययोजना क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक यांनी नियुक्त केलेली अभिकर्ता संस्था उप प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय, शहापूर यांच्यामार्फत खरीप व रब्बी पणन हंगाम 2020-2021 मध्ये जिल्हयातील कर्जत तालुक्यातील सुगवे येथील मंजूर धानखरेदी केंद्रावर धान / भरडधान्य रागी (नाचणी)   खरेदी सुरु करण्यात येणार आहे.   या भात खरेदीचा कालावधी खरीप पणन हंगाम दि. 01 ऑक्टोबर 2020 ते दि .31 मार्च 2021, रब्बी पणन हंगाम दि. 01 मे 2021 ते दि.30 जून 2021, भरडधान्य (मका/ज्वारी/बाजरी/रागी):- दि.01 नोव्हेंबर 2020 ते दि.31 डिसेंबर 2020   हा आहे. धान भरडधान्य रागी/( नाचणी ) खरेदी वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतच्या 7/12 उताऱ्याची व गाव नमुना 8 (अ) ची छायांकित प्रत खरेदी केंद्रावर धान विक्रीकरीता आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान / भरडधान्य खरेदी करण्यात येईल.   शेतकऱ्यां चे 7 /12 उताऱ्यानुसार पिकाखालील क्षेत्र , या वर्षाची पीक परिस्थिती ( पैसेवारी ) , पिका