Posts

Showing posts from May 25, 2025

अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करुन घ्यावा

रायगड(जिमाका)दि.27:-  शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचविता यावा याकरिता कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अॅग्रीस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एग्रीकल्चर) योजना राज्यात राबविण्यात येत आहे.  या योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12, 8-अ खाते उतारा, बँक खात्याचा तपशील तसेच आधार संलग्न मोबाईल क्रमांक घेऊन दि.31 मे 2025 पूर्वी आपला शेतकरी ओळख क्रमांक जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र /C.S.C. सेंटर येथे जाऊन तयार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे. अॅग्रीस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरीत्या पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे.कृषी क्षेत्रासाठी सर्व समावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्रीस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान क...

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशाकरिता अर्ज सादर करावेत

  रायगड(जिमाका)दि.27:-  शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सेक्टर 10, प्लॉट नंबर 21 ग्रीन पार्क सोसायटी समोर कळंबोली, पनवेल येथे कार्यरत आहे.    या   मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातकरिता मोफत प्रवेश देण्यात येणार असून इच्छूक विद्यार्थींनींनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पनवेल श्रीमती उषा शशिकांत गुजेला यांनी केले आहे.      या शासकीय वसतिगृहात  इ.8 वी पासून गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय अनु.जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रर्वग, आर्थिकदृष्टया मागास, अनाथ व अपंग  गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थीनींकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा-दररोज पोहे/ शिरा/उपीट इ. पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतुमानानुसार एक फळ व दूध तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार ) देण्यात येते.    ...

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी इच्छूक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

  ख्‍         रायगड(जिमाका)दि.26:- मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत पुरवणारी  “ म हाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना  ” शैक्षणिक वर्ष-2023-24 पासून प्रभावीपणे राबविली जात असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे राजेंद्र निंबाळकर यांनी केले आहे.  या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते, ही योजना मराठा- कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरेल. अर्ज प्रक्रिया आणि मदत - इच्छुक विद्यार्थ्यानी सारथीच्या  fs.maharashtra.gov.in   या  अधिकृत संकेतस्थळावर विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जून2025 आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 स...

रायगड जिल्ह्यात 25 मे ते 8 जून 2025 दरम्यान जमावबंदी लागू--अपर जिल्हादंडाधिकारी

                 रायगड(जिमाका)दि.26:- जिल्ह्याती ल कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शिफारशीनुसार आणि अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार दि.25 मे 2025 रोजी 00:01 वाजल्यापासून ते 08 जून 2025 रोजी रात्री 24:00 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.             रायगड जिल्ह्यातील खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या औद्योगिक भागांमध्ये कामगार संघटनांकडून आंदोलन व संप पुकारले जात असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय धार्मिक व जातीय तणावाचे प्रसंग, तसेच आगामी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती (31 मे), रवी रावसाहेब देशमुख, उमापूर, ता.गेवराई, जि.बीड हे किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळयाला झेड प्लस दर्जाची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने द्यावी तसेच इतर विविध मागण्याकरिता किल्ले रायगडच्या पायथ्याशी बेमुदत धरणे आंदोलन (31 मे) ...

आपदा मित्रांना सक्षम व प्रभावी बनवण्यासाठी आवश्यक ती सर्व संसाधने उपलब्ध करून देण्याचे कु.तटकरे यांचे निर्देश

    रायगड (जिमाका) दि. 26:- आपदा मित्र हे आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांना अधिक सक्षम व प्रभावी बनवण्यासाठी आवश्यक ती सर्व संसाधने, मदत जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी असे निर्देश महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिले. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात रायगड जिल्ह्यातील आपदा मित्रांची बैठक महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपवनसंरक्षक राहुल पाटील, निवासी उपजिल्हा धिकारी संदेश शिर्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांसह विविध आपदा मित्र संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. महापूर, दरड दुर्घटना, आग,रस्ते अपघात अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो या घटनांमध्ये सर्वसामान्यांचा जीव वाचविण्याचं काम आपत्ती व्यवस्थापनातील आपदा मित्र  करत आहेत. बोटी चालवने, तराबा हाकणं, दरीतील मृतदेह बाहेर काढणं, रस्ते अपघातातील जखमींना तात्काळ प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं, यासह आपत्ती काळात कराव्या लागणाऱ्या अनेक मदतीसाठी ते...

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी 'अलर्ट मोड'वर काम करावे --- महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यंदा दुर्घटना घडल्यास संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल

    रायगड (जिमाका)दि.26:-रायगड जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणावर मान्सूनपूर्व  पाऊस सुरु आहे. सद्याची पावसाची आकडेवारी पाहता संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी सर्व यंत्रणानी सदैव दक्ष रहावे. सर्व दरड क्षेत्रात येणारी गावे, जुने व धोकादायक पूल व साकव आणि पाणीसाठे यांची सर्व विभागांनी पाहणी करून अहवाल सादर करावा. आवश्यकतेनुसार सर्वांनी कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिले. यंदा पूल अथवा रस्ता दुर्घटना घडल्यास संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही कु.तटकरे यांनी यावेळी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यात निर्माण झालेल्या पावसाळी परिस्थितीचा आढावा, खबरदारी व जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी मंत्री कु.तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र तसेच जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली.  या बैठकीला  जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक आचल दलाल, अलिबाग उपवन संरक्षक राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी  संदेश शिर्के, कार्यकारी अभियंता...