स्वच्छ भारत अभियानात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते.
दिनांक :- 2 ऑक्टोबर 2016 वृत्त क्र. 638 स्वच्छ भारत अभियानात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते. अलिबाग दि. 2:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली. त्या अनुषंगाने रायगड जिल्हयातही दोन वर्षापासून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे .त्याचाच एक भाग म्हणून आज आपण अलिबाग समुद्र किनारा व परिसर स्वच्छ करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छ भारत अभियानात सर्व घटकांनी सहभाग घेऊन हे अभियान सुरु ठेवावे असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आज येथे केले. गांधी जयंती निमित्त अलिबाग समुद्र किनारा व परिसर स्वच्छ करण्याच्या विशेष स्वच्छता मोहिमेत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेल