निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांचे जनजीवन सुरळीत होण्यासाठी मदतीचे वाटप गतिमानतेने करावे-महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
वृत्त क्रमांक :- 612 दिनांक :- 13 जून 2020 अलिबाग,जि.रायगड, दि. 13 (जिमाका) :- जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे मुरुड, श्रीवर्धन, अलिबाग तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांचे जनजीवन सुरळीत होण्यासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या मदत निधीचे वाटप गतिमानतेने करावे, असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. चक्रीवादळामुळे जिल्हयात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात दौऱ्यावर आले होते. त्यावेळी प्रकृती रिसॉर्ट, काशिद, ता.मुरुड येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, माजी आमदार माणिक जगताप, जिल्ह