महाड दुर्घटना बस शोधण्यास तपास यंत्रणेला यश

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
      दिनांक :- 11 ऑगस्ट, 2016                                                        वृत्त क्र.515
महाड दुर्घटना
बस शोधण्यास तपास यंत्रणेला यश

            अलिबाग दि.11 :- महाड येथील सावित्री नदीवरील पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्ती व वाहनांचा शोध घेणाऱ्या पथकाला एम.एच.40, एन.9739 राजापूर-बोरीवली या बसचा शोध लावण्यास यश मिळाले असून घटनास्थळापासून साधारणत: 200 मीटर अंतरावर ही बस आढळून आली. 10-12 तासाच्या अथक प्रयत्नानंतर नौदलाच्या पथकाला बसच्या काही भागाचा शोध होता. त्यानंतर  क्रेनच्या मदतीने ही बस पाण्याबाहेर काढण्यात आली.
            शोध मोहिमेमध्ये एन.डी.आर.एफ. चे जवान,  तसेच के.एम.बी. कम्युनिकेशन डिव्हाईस 8 डायव्हर्स तसेच सोनार यंत्रणेसह स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य करीत आहेत. 9 बोटी, 8 डायव्हर्सद्वारे, 5 राफ्टरर्स, 6 केकेज् टीम, स्थानिक मच्छिमार बांधव अशी सर्व मंडळी आपले शर्थीचे प्रयत्‍न करीत आहेत. नौदलाच्या तपास यंत्रणेतील पाणबुडयांच्या विशेष प्रशिक्षित पथकामार्फत शोध सुरु आहे. त्यांना बसचा काही भाग आढळून आल्याचे नौदलाच्या शोध मोहिम प्रमुखांनी सांगितले. त्यानुसार क्रेनद्वारे सदरील बसला बाहेर काढण्यात आले.
 शोध कार्य सुरु असून जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले व जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक  शोध तथा मदत कार्यावर नियंत्रण ठेवून आहेत.
आरोग्य मंत्र्यांची भेट

                        महाड येथील शोध मोहिम व मदत कार्य केंद्राला काल आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी भेट दिली. तेथे उपस्थित आपतग्रस्तांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.  मदत केंद्रात सुरु असलेल्या  कार्याचा सविस्तर आढावा घेऊन,  होत असलेल्या कामा बद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार भरतशेठ गोगावले, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.एस.नागांवकर उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी श्रीमती सुषमा सातपुते, यांनी शोध कार्याची माहिती मंत्री महोदयांना दिली. आरोग्य मंत्र्यांनी त्यानंतर महाड येथील शासकीय रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली.
दुर्घटना स्थळ परिसरातील नागरिकांनी त्यांना काही आढळून आल्यास प्रशासनास तात्काळ कळवून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून तेथील टोल फ्री क्रमांक 1077 व  दूरध्वनी क्रमांक 02141-222118 असा आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक