राष्ट्रीय लोक अदालत जिल्ह्यात 216 प्रकरणे निकाली


            अलिबाग दि.11,(जिमाका) :- राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शनिवार दि.8 रोजी जिल्हा न्यायालय,रायगड-अलिबाग येथे आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात 216 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
            यावेळी मु.गो.सेवलीकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश,रायगड  तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग,  एल.डी.हुली, दिवाणी न्यायाधीश व.स्तर, अलिबाग, तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड आणि अन्य न्यायीक अधिकारी, जिल्हा सरकारी वकील, ॲड.प्रसाद पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रविण ठाकूर, तसेच वकील वर्ग उपस्थित होते.
            सदर लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून न्यायालयातील 1522 इतकी प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 216 प्रकरणे  निकाली निघाली. त्यामध्ये 3 कोटी 21लक्ष 66हजार 551 रुपये इतकी रक्कम नुकसान भरपाई  मान्य करण्यात आली. तसेच भूसंपादन  वादपूर्व प्रकरणे 302 ठेवण्यात आली होती. त्यापैकी 42 प्रकरणे निकाली निघाली. तर वादपूर्व प्रकरणे 4624 तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती  त्यापैकी 1439 प्रकरणे निकाली निघाली. त्यामध्ये  3कोटी 21 लक्ष 7हजार 692 रुपये  रक्कम वसुल करण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी दिली आहे.

                                                                                00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक