स्वस्तधान्य दुकानदारांच्या मार्जिन दरात वाढ


अलिबाग,दि.16,(जिमाका):- सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नधान्य वितरणासाठी शिधावाटप,रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिन मध्ये देण्यात येत असलेल्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.
रास्त भाव दुकानदारांना ए.पी.एल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य् गट व अंत्योदय अन्न योजना अंतर्गत गहू,तांदूळ,साखर व भरड धान्याच्या वितरणासाठी सध्या मिळत असलेल्या रु.70/-प्रती क्विंटल या मार्जिनमध्ये रु.80/- इतकी वाढ करुन त्यांना रु.150/- प्रती क्विंटल या प्रमाणे मार्जिन देण्यात येईल.
प्रस्तावित वाढीव दराने मार्जिन ही अन्नधान्य व साखर विक्री ऑनलाईन व्यवहाराद्वारे करणाऱ्या रास्तभाव दुकानदारांनाच लागू करण्यात येईल . याची सर्व रास्त भाव दुकानदारांनी याची नोंद घ्यावी.असे जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड अलिबाग यांनी कळविले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक