अल्पसंख्याकांच्या योजना उर्दू लोकराज्यमार्फत तळागाळापर्यंत -डॉ.गणेश मुळेरोह्यातील अंजुमान माध्यमिक विद्यालयात उर्दू लोकराज्य मेळावा



अलिबाग,दि.1 (जिमाका):- उर्दू लोकराज्य हे शासन  आणि जनता यांच्यातील दुवा असून,अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने राबविलेल्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यास मदत होईल,असा विश्वास कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे  यांनी आज येथे व्यक्त केला.
कोकण विभागस्तरीय ऊर्दू लोकराज्य मेळावा येथील अंजूमान ऊर्दू माध्यमिक विद्यालय येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास कोकण विभागीय उपसंचालक (माहिती )डॉ.गणेश मुळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वसीम मुलहक सातारेकर हे होते. कोकण विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर,जिल्हा माहिती अधिकारी,ठाणे अनिरुद्ध अष्टपुत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ.मुळे यांनी सांगितले की, भाषा शिकणे हे व्यक्तीमत्व् विकासासाठी आवश्यक  आहे. ऊर्दू  लोकराज्य हे समाजातील ऊर्दू भाषिक घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांसोबतच आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक  माहितीही पोहचविण्याचे  काम करते. लोकराज्य वाचणे ही एक चांगली सवय असून स्पर्धा परिक्षांसाठीही हे मासिक उपयुक्त आहे.असेही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी प्रश्नांची उत्तरे देण्याऱ्या विद्यार्थी -विद्यार्थींनींना लोकराज्य अंक भेट देण्यात आले.
प्रास्ताविक प्राचार्य वसीम मुलहक  सातारेकर यांनी केले. सूत्रसंचालन सलिम उल्डे यांनी केले. शैलजा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा माहिती अधिकारी, रायगड मिलिंद दुसाने यांनी केले होते. कार्यक्रमाच्या आयोजननासाठी कोकण भवन येथील सहाय्यक संचालक शैलजा पाटील तसेच हिरामण भोईर, राजेंद्र मोहिते, विठ्ठल बेंदूगडे,अशोक मोरे यांनी तसेच विद्यालयाचे श्रीमती तबस्सुम दापोलकर, रमजान उस्ताद, मुश्तोरी रोहेकर यांनी परिश्रम घेतले.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड