राष्ट्रीय लोकअदालतीत 3185 प्रकरणे निकाली

अलिबाग,(जिमाका)दि.12- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे महाराष्ट्रातील उच्च न्यायालये व खंडपीठे, सर्व जिल्हा न्यायालये, तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, इतर सर्व न्यायालये व न्यायाधिकरणे येथे  शनिवार दि.9 रोजी 'राष्ट्रीय लोक अदालत' आयोजित करण्यात आली.  या लोकअदालतीत 3185 प्रकरणे  तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यात  भूसंपादनाची 258 प्रकरणे होती, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांनी दिली आहे.
या लोक अदालतीसाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मु.गो.सेवलीकर, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर तथा सदस्य सचिव ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एल.डी.हुली, डी.आर.देशपांडे,दिवाणी न्यायाधीश व. स्तर पनवेल यांचे व जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी, इन्श्युरन्स् कंपन्या,बँका  आणि  वकील वर्ग उपस्थित होते. 

लोक अदालतीत  जिल्ह्यातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघण्याच्या दृष्टीने सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या  लोकअदालतमध्ये प्रलंबित प्रकरणांमध्ये 1406 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती त्यापैकी  भूसंपादनाची 258 प्रकरणे निकाली  काढण्यात आली तसेच वादपूर्व प्रकरणे 1779 असे एकूण 3185 प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीने निकाली काढण्यात आली,असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक