13 कोटी वृक्ष लागवड अभियान : जिल्ह्यात आतापर्यंत 13 लाख 94 हजार रोपांची लागवड
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.11- राज्य
शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड अभियानात या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात
येणार आहे. रायगड जिल्ह्यात यावर्षी 31 लक्ष वृक्ष लागवड करायचे उद्दिष्ट
आहे. जिल्ह्यात मंगळवार दि. 10 जुलै अखेर
13 लाख 94 हजार 402 रोपांची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक अलिबाग
वन विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षातून प्राप्त झाली आहे. त्यात वन विभागाने 8 लाख 43 हजार 569 तर सामाजिक
वनीकरण विभागाने 2 लाख 48 हजार 30 रोपांची लागवड केली आहे. ग्राम विकास विभागाने अद्याप 1 लाख 31 हजार 203
तर अन्य विभागांनी मिळून 88 हजार 890, महसूल विभागाने 9485 असे विविध विभागांनी
रोपांची लागवड केली आहे. येत्या 31 जुलै पर्यंत हे अभियान सुरु असून त्यात
नागरिकांनी सहभागी होऊन एक तरी रोप लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात
आले आहे.
00000
Comments
Post a Comment