13 कोटी वृक्ष लागवड: दोन दिवसांत 3 लाख रोपांची लागवड
अलिबाग,जि. रायगड
(जिमाका) दि.2- राज्य
शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड अभियानात या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार
आहे. रायगड जिल्ह्यात यावर्षी 31 लक्ष वृक्ष लागवड करायचे उद्दिष्ट आहे. तर प्रत्यक्षात 37 लक्ष वृक्ष लागवड करता येतील
याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्ह्यात रविवार दि. 1 जुलै रोजी
सुरु झालेल्या वृक्ष लागवड अभियानात दोन दिवसांत (काल दि.2 जुलै अखेर) 3 लाख 6
हजार 706 रोपांची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक अलिबाग वन विभाग,
अलिबाग यांच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षातून प्राप्त झाली आहे. येत्या 31 जुलै
पर्यंत हे अभियान सुरु असून त्यात नागरिकांनी सहभागी होऊन एक तरी रोप लावून त्याचे
संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment