प्रधानमंत्री पिक विमा योजना सहभागासाठी 31 पर्यंत मुदतवाढ
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.24: खरीप हंगाम 2018
मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत
आहे. या योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी
सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या
योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (डिजीटल सेवा केंद्र)
यांचेमार्फत विमा अर्ज दाखल करता येतील. शेतकऱ्यांनी आपला बचत खात्याचा तपशील आणि आधार
क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे. योजनेतील
सहभागासाठी नजिकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,
उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नाजिकच्या
बँक, ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (डिजीटल सेवा केंद्र) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त कृषि
महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment