राष्ट्रीय लोकअदालत : 398 प्रकरणात तडजोडीने 10 कोटी रुपयांची वसूली



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.11- येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार दि.8 रोजी राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  जिल्ह्यात आयोजित लोकअदालतील एकूण  प्रलंबित 398 प्रकरणात तडजोड होऊन  10 कोटी 10 लाख 28 हजार 925 रुपये रकमेची वसूली करण्यात आली. तर दाखलपूर्व 13 हजार 766 प्रकरणात  4 कोटी 83 लाख 80 हजार 175 रुपये इतक्या रकमेची वसुली झाली. अशी एकूण 14 कोटी 94 लाख 9 हजार 100 रुपये रकमेची वसूली झाली.
 यासंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे  सचिव जयदीप मोहिते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार,  रायगड जिल्ह्यात लोकदालत उपक्रमात 398 प्रकरणात एकूण 10 कोटी 10 लाख 28 हजार 925 रुपयांची वसूली करण्यात आली. त्यात न्यायालयात प्रलंबित भूसंपादनाच्या 59 प्रकरणात 4 कोटी 27 लाख रुपये, मोटार अपघात दाव्यांच्या 37 प्रकरणात  1 कोटी 75 लाख 3 हजार रुपये तर अन्य 302 प्रकरणात तडजोडीने 4 कोटी 8 लाख 25 हजार 925 रुपये इतकी रक्कम तडजोडीने मान्य झाली. अशी एकूण  10 कोटी 10 लाख 28 हजार 925 रुपये रकमेची तडजोडीने वसूली झाली  तर दाखलपूर्व 13 हजार 766 प्रकरणात तडजोडीने 4 कोटी 83 लाख 80 हजार 175 रुपयांची वसूली करण्यात आली.  अशी एकूण 14 कोटी 94 लाख 9 हजार 100 रुपयांची वसूली झाली.
 या लोकअदालतीत भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, कलम 138. एन. आय ॲक्ट विवाह प्रकरणे,  तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे,  दिवाणी व फौजदारी अपिले, सहकार न्यायालय, कामगार न्यायालय प्रकरणे,  दूरसंचार, ग्रामपंचायती अशी वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.
या लोक अदालतीचे कामकाज पाहण्यासाठी 31 कक्षांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीयकृत बॅंका, टेलिफोन कंपन्या, महावितरण, विमा कंपन्या, भूसंपादन अधिकारी तसेच सर्व पक्षकारांनी सहभाग घेतला. जिल्हा न्यायालयाचे न्यायिक अधिकारी, विधीज्ञ मंडळ, न्यायलयीन कर्मचारी यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक