ईव्हिएम, व्हीव्हीपॅट यंत्र वापर व जनजागृतीसाठी पथक रवाना


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28:- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणकीसाठी एम-3 बनावटीचे ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व व्हीव्हीपॅट (VVPAT: Voter Verified Paper Audit Trail) मशीन वापरण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून  या मशिन वापराबाबत व त्यासंदर्भातील शंकांचे निरसन व्हावे म्हणून  जिल्ह्यात गुरुवार दि.27 पासून जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानाअंतर्गत अलिबाग तालुक्यासाठी तयार करण्यात आलेले पथक आज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रचार व जनजागृतीसाठी रवाना झाले.
आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने,  अलिबाग उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, महाड उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार तसेच विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
या जनजागृती उपक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व आपल्या मनातील शंकांचे निरसन करुन मतदान यंत्रावरील मतदानाचे प्रात्यक्षिक व सराव करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. जिल्ह्यात ज्या ज्या इलेक्र्टॉनिक मतदान यंत्रांपैकी प्रथमस्तरीय चाचणीत योग्य असलेल्या यंत्रांपैकी  प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय चार या प्रमाणे जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 3326 कंट्रोल युनिट, 3326 व्हीव्हीपॅट व 5721 बॅलेट युनिट यंत्र उपलब्ध झालेली आहेत. प्रत्यक्ष मतदारांना मतदान यंत्राचा मतदानासाठी वापर त्यासोबत असणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्राचा उपयोग याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात 39 पथके नियुक्त करण्यात आली असून  जिल्हास्तरावर एक स्थिर पथक नियुक्त करण्यात आले आहे.  प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय हा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक