मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


        मुंबई, दि. 20 : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन २०१८ च्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराकरिता राज्यातील पत्रकारांनी आपली नामांकने येत्या २५ डिसेंबर २०१८ पूर्वी पाठवावीत, असे आवाहन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
                 पुरस्कारामध्ये जीवनगौरव पुरस्कार (राज्यस्तरीय), वृत्तपत्र प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी
(राज्यस्तरीय), उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार  अशा एकूण चार पुरस्कारांचा समावेश  आहे.  शाल, श्रीफळ, मानचिन्ह, आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पत्रकारितेतील उल्लेखनीय लिखाण करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या  नामांकनाच्या प्रवेशिका यापूर्वी मिळालेल्या पुरस्काराच्या माहितीसह आणि सामाजिक कार्याच्या तपशिलासह  ( वृत्तवाहिनींच्या पत्रकारानी वृत्तांकन केलेली सी. डी. सोबत पाठविणे आवश्यक आहे ) येत्या २५ डिसेंबर  २०१८ पूर्वी अध्यक्ष, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, तळमजला, पत्रकार कक्ष, मंत्रालय, मुंबई ४०००३२ या पत्यावर पाठवाव्यात, असे आवाहन अध्यक्ष दिलीप सपाटे आणि कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी केले आहे.
पुरस्कार व निकष  )जीवनगौरव पुरस्कार ( राज्यस्तरीय ) - पत्रकाराने किमान २५ वर्षे पूर्णवेळ पत्रकारिता केलेली असावी. वय किमान ६० वर्षे पूर्ण असावे.
) राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार ( दोन ) अ) वृत्तपत्रीय प्रतिनिधी ब) इलेक्ट्रॉनिक माध्यम
प्रतिनिधी यांना देण्यात येणार आहे. पत्रकारितेत पूर्णवेळ सेवा बंधनकारक आहे. भाषेचे बंधन नाही. मागील दोन वर्षाच्या (२०१६ आणि २०१७) बातम्याची कात्रणे किंवा चित्रफित/ ध्वनीफीत पाठवाव्यात. कात्रणे किंवा ध्वनीफीत यावर अर्जदाराचे नाव तसेच संपादक किंवा संस्थेचे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडून प्रवेशिका सांक्षाकित केलेली असावी.
३)उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-(एक)
           या पुरस्कारासाठी केवळ मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांना भाग घेता येईल. एक
वर्षांची (१ जानेवारी २०१७ ते अर्ज करण्याचा दिनांक) कात्रणे / ध्वनीफीत/ चित्रफितीसह प्रवेशिका  द्याव्या लागतील.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक