महाडीबीटीवरील अर्जांबाबत सामाजिक न्याय विभागाचे आवाहन
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.27:- शासनाच्या विविध शिष्यवृत्या व
अन्य आर्थिक लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय
विभागाने महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवरुन विद्यार्थी,
महाविद्यालयांमार्फत अर्ज करणे, सामाजिक न्याय विभागामार्फत शासनाच्या विविध
शिष्यवृत्या व अन्य आर्थिक लाभ देण्यासाठी
सामाजिक न्याय विभागाने महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित केले आहे. या
पोर्टलवरुन विद्यार्थी, महाविद्यालयांमार्फत अर्ज करणे, सामाजिक न्याय
विभागामार्फत ते अपलोड करणे यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करणे व संभाव्य चुका
टाळून वेळेवर अर्ज अपलोड होण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने सुचना निर्गमित केल्या
आहेत. त्यांचा यथायोग्य वापर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील यांनी
केले आहे.
यासंदर्भात
प्रसिद्धीस देण्यात आलेले निवेदन याप्रमाणे, महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या
शिष्यवृत्तीसाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी (Mahadbt) पोर्टल
दि. 01.10.2018 रोजी नव्याने कार्यान्वीत झाले आहे. https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळाचा वापर करून अ. जा, विजा,भज, इमाव व विमाप्र
प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र
कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध
शिष्यवृत्ती / फ्रि शिप योजनांकरीता ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत केले आहेत. हे अर्ज संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करून जिल्ह्यातील सहाय्यक
आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेसाठी सादर केले जातात. महाविद्यालयाकडून
प्राप्त झालेल्या अर्जावर जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडून
ऑनलाईन मान्यता घेण्यात येते.
महाविद्यालयस्तरावर
प्रलंबित अर्ज
सद्यस्थितीत
महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
यांना तात्काळ निकाली काढण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.
रदद
(Cancel) केलेल्या अर्जाबाबत
नोंदणीकृत
झालेल्या अर्जापैकी सुमारे 20% अर्ज विद्यार्थ्यांनी अथवा महाविद्यालयाने अर्ज
मंजुर होण्यापुर्वी त्यांच्यास्तरावरून रद्द (Cancel) केले आहेत. रद्द केलेल्या
अर्जांपैकी पात्र अर्जांची त्वरीत त्रृटी पुर्तता करून असे अर्ज विद्यार्थ्यांनी
पुनश्च ऑनलाईन सादर करावेत व महाविद्यालयांनी संबंधित लॉगीनवरून मान्य करून
पुढील कार्यवाहीस्तव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे
ऑनलाईन फॉरवर्ड करावेत, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
मान्य
अर्जांची यशस्वी वितरण (Redemption) प्रक्रिया
या पोर्टलवर मान्य झालेली अर्जाची
अदायगीची प्रक्रिया यशस्वी होणेकरिता विद्यार्थ्याच्याच लॉगईनमधून “रिडम्शन प्रक्रिया “(Redemption) करणे अत्यावश्यक आहे.
सदर ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण न केल्यास मान्य झालेली विद्यार्थी व महाविद्यालयाची
शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत होणार नाही याची सर्व
विद्यार्थ्यानी व पालकांनी नोंद घ्यावी .
* “रिडम्शन व्हाउचर” जनरेट झाले असून देखील रिडम्शन प्रक्रिया न केलेल्या विद्यार्थ्यावर महाविद्यालयाने
त्यांच्यास्तरावर योग्य ती कारवाई करावी.
* विद्यार्थ्याचे बॅक खाते क्रमांक
प्रणालीमध्ये अचूक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
* नोंदणीकृत केलेले बॅक खाते
क्रमांक आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.
* अदायगीच्या प्रक्रियेमध्ये
प्रत्येक स्तरावर एस. एम. एस (SMS) येणेस्तव मोबाईल क्रमांक हा आधार तसेच
नोंदणीकृत बॅक खात्याशी संलग्न असून तो अद्यावत असणे आवश्यक आहे.
या
अनुषंगाने संबंधित विद्यार्थी, महाविद्यालय व यंत्रणेतील घटकांनी वरील सुचनांचे
पालन करावे. तसे न केल्यास शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या व
महाविद्यालयाच्या बॅंक खात्यावर न जमा झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी संबंधित
महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थ्यांची असेल,याची सर्व प्राचार्य व
विद्यार्थ्यांनी कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात
आले आहे.
सदरचे “जाहीर आवाहनही” महाविद्यालयाच्या मुख्य सुचना फलक तसेच आवश्यकता असल्यास परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध
करुन विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी. तसेच महाविद्यालयातील / विद्यापीठातील
विद्यार्थी प्रतिनिधी (UR,GS,SR) यांनीही त्यांच्या
स्तरावरून या सुचना विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना त्वरेने कळवाव्यात असे आवाहन
सामाजिक न्याय विभागाने केले आहे.
00000
Comments
Post a Comment