आचारसंहिता भंग होणार नाही हे पथकांनी काटेकोरपणे पाहावे कुचराई झाल्यास निवडणूक कायद्याप्रमाणे कारवाई - अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे



रायगड  दि १७: लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन ही जिल्ह्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. आचारसंहिता भंग होणार नाही हेत्यांनी काळजीपूर्वक पाहावे  यात कसूर केल्यास निवडणूक कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल असे अतिरिक्त जिल्हाधिकारी व आचारसंहिता अंमलबजावणी समितीचे प्रमुख भरत शितोळे यांनी आज सांगितले. ते आज आरसीएफ कम्युनिटी हॉल येथे विविध मतदार संघ निहाय स्थापन करण्यात आलेल्या पथकांना दिवसभर प्रशिक्षण देण्यात आले त्यावेळी बोलत होते. निवासी उप जिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे, तहसीलदार महसूल विशाल दौंडकर यावेळी उपस्थित होते.
भरत शितोळे म्हणाले कि, निवडणूक कामकाज प्रत्येकाने गांभीर्याने घ्यावयाचे असून निवडणूक आयोगाची प्रत्येक लहान मोठ्या बाबींवर नजर आहे. कोणत्याही पथकाने कामात टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा केलेला असल्यास तो कुठल्या पदावर आहे याचा विचार न करता तातडीने कारवाई केली जाईल. यावेळी त्यांनी पथकनिहाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा ही घेतला.
उपजिल्हाधिकारी वैशाली माने, भरारी पथकाचे प्रमुख लेखा अधिकारी शरद पाटील, व्हिडीओ सर्व्हेक्षण पथकाचे प्रमुख उप मुख्य लेखा अधिकारी विकास खोळपे, लेखा पथक  प्रमुख कोषागार अधिकारी फिरोझ मुल्ला, व्हिडीओ पाहणी पथक प्रमुख बाळासाहेब तट्टू, माध्यम प्रमाणीकरण व पेड न्यूज समितीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे व तहसीलदार महसूल विशाल दौंडकर यांनी एक खिडकी संदर्भात मार्गदर्शन केले. डॉ पद्मश्री बैनाडे यांनी सर्वांनी समन्वयाने हे काम पार पाडावे तसेच सातत्याने प्रशासनाला अहवाल द्यावेत, संपर्कात राहावे अशा सुचना दिल्या.
----------

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक