नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणःराजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11- महाराष्ट्र
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन 2019-20 या शैक्षणिक
वर्षाकरिता देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश
घेतलेल्या अनुसूचित जाति/नवबौध्द विद्यार्थ्यांकडून राजर्षी शाहू महाराज
शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या
योजनेसाठी लाभार्थी पात्रतेचे निकष याप्रमाणे-
·
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती/नवबौध्द
प्रवर्गातील असावा.
·
महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
·
कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 6.00
लाखापेक्षा कमी असावे.
·
पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याची कमाल वयोमर्यादा
25 वर्षे व पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्ष इतकी
असेल.
·
अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गाला शिकत असला पाहिजे.
तथापी त्यापुढील वर्षाचे विद्यार्थी अर्ज करु शकतील परंतु त्यांचा विचार प्रथम
वर्षाचे विद्यार्थी उपलब्ध् न झाल्यास करण्यात येईल.
·
विद्यार्थी इ. 10 व 12 वी ची परिक्षा महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परिक्षा मंडळातून
उत्तीर्ण होणे आवश्यक राहिल.
·
पदवी अभ्यासक्रमासाठी इ. 12 वीच्या परिक्षेमध्ये किमान
55% गुण मिळविणे आवश्यक राहिल व डायरेक्ट व्दितिय वर्षासाठी प्रवेशीत
विद्यार्थ्यांना डिप्लोमामध्ये 55% गुण आवश्यक.
·
पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पदवी परिक्षेमध्ये किमान
55% गुण असावेत.
·
सदर शिष्यवृत्ती देश पातळीवरील मान्यताप्राप्त
संस्थामधील अभ्यासक्रमासाठी लागू राहिल. संस्थांची यादी संकेतस्थळावरील सविस्तर
जाहिरातीतील परिशिष्ठ ‘ब’ नुसार पहावयास
मिळेल
·
वेळोवेळी या योजनेच्या अनुषंगाने निर्गमित झालेल्या
इतर अटी व शर्ती विद्यार्थ्यांना बंधनकारक
असतील.
·
या योजनेंअंतर्गत शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा अंतिम
अधिकार शासनास राहिल.
·
निवड झालेल्या विद्यार्थ्यास भारत सरकार शिष्यवृत्तीचा
लाभ मिळणार नाही.
लाभाचे स्वरुपः-
·
प्रवेशीत अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी
रु.5,000/- व शैक्षणिक साहित्य आणि इतर शैक्षणिक खर्च यासाठी एकूण रु.5,000/- असे
एकूण रु. 10,000/- प्रत्येक वर्षी देण्यात येईल.
·
शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेले पुर्ण शैक्षणिक शुल्क,
परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक शुल्क इ. देण्यात येईल.
·
शैक्षणिक संस्थेतील वसतिगृह व भोजन शुल्क याचा
त्यांच्या आकारणीप्रमाणे खर्च देण्यात येईल.
·
शैक्षणिक संस्थेच्या वसविगृहात जागेअभावी प्रवेश न
मिळाल्यास सदर विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले वसविगृह व भोजन शुल्क
देण्यात येईल.
·
वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजने प्रमाणे निर्वाहभत्ता देण्यात येईल.
रायगड
जिल्ह्यातील गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त
समाजकल्याण रविकिरण पाटील यांनी केले आहे.
-संकलनः
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड, अलिबाग.
00000
Comments
Post a Comment